शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
2
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
3
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
4
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
5
'अडीज कोटीत ईव्हीएम हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
6
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
7
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात ५ वाजेपर्यंत सरासरी ५३.४० टक्के मतदान
8
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
9
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
10
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
11
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
12
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
13
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
14
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
15
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
16
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
17
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
18
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
19
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
20
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...

Amit Shah, Article 370: "रक्ताचे पाट वाहतील म्हणणारे लोक साधा छोटासा दगडही मारू शकले नाहीत"; ३७० कलमाबाबतच्या निर्णयावर अमित शाह यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 8:27 PM

सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावरही केलं भाष्य

Amit Shah, Article 370: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५ ऑगस्ट २०१९ रोजी काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० रद्द केले. केंद्र सरकार आपल्या भूमिकेवर ठाम होती. अनेकांनी त्यावेळी या कलमाबाबतच्या निर्णयाचा विरोध केला. आंदोलने करून प्रश्नाला हिंसक वळण देण्याचा प्रयत्नदेखील करण्यात आला. पण ज्या लोकांनी मोठ्या मोठ्या गप्पा रंगवल्या, ते लोक केंद्र सरकारच्या ठाम भूमिकेमुळे नंतर काहीच करून शकले नाहीत, अशा शब्दांत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गुरुवारी विरोधकांवर निशाणा साधला. ३७० कलम रद्द केल्यास रक्ताचे पाट वाहतील (खून की नदी बहेंगे) अशा शब्दांत लोकांची माथी भडकवण्याचा प्रयत्न करणारे नंतर साधा छोटा दगड मारण्याचंही धाडस करू शकले नाहीत", असेही ते म्हणाले. दिल्लीत 'आइडिया ऑफ इंडिया फ्रॉम स्वराज टू न्यू इंडिया' या परिसंवादात ते बोलत होते.

"पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ५ ऑगस्ट २०१९ ला अतिशय सहजपणे ३७० कलम रद्द केले. त्यावेळी अनेक जण धमक्या देऊन लोकांची माथी भडकवत होते. कलम रद्द झाल्यास रक्ताच्या नद्या वाहतील असं म्हणणारे लोक सरकारने केलेल्या धोरणांपुढे साधा एक छोटासा दगडही मारू शकले नाहीत", अशा शब्दांत अमित शाह यांनी थेट विरोधकांवर टीका केली.

सुरक्षा धोरण आणि सर्जिकल स्ट्राईक...

अमित शाह यांनी सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्द्यावर बोलताना देशांतर्गत सुरक्षा धोरणावर भाष्य केले. "नरेंद्र मोदी देशाचे पंतप्रधान होण्याआधी भारताकडे ठोस सुरक्षा धोरण (defence policy) नव्हते. जरी एखादे धोरण असेल तरीही त्यात परराष्ट्र धोरणाचीच छबी दिसत असायची. आधी दहशतवादाला पाठिंबा देणाऱ्या संघटना आपल्या देशात दहशतवादी पाठवायचे आणि हल्ले घडवून आणायचे. उरी आणि पुलवामा असे हल्लेही आपल्या देशात घडले. पण त्यानंतर दहशतवाद्यांना भारताने सर्जिकल स्ट्राईकच्या माध्यमातून प्रत्युत्तर दिले आणि देशाचे सुरक्षा धोरण किती मजबूत आहे याची प्रचिती जगाला आली", असेही शाह यांनी नमूद केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहNarendra Modiनरेंद्र मोदीJammu Kashmirजम्मू-काश्मीर