शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

अमेठी सिंगापूर बनली का? स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2019 4:54 PM

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे.

अमेठी - काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज आपल्या पारंपरिका अमेठी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राहुल गांधी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर आरोप प्रत्यारोपांनाही उत आला आहे. अमेठीला सिंगापूर बनवू असा वारंवार दावा करणाऱ्या राहुल गांधींना स्मृती इराणी यांनी टोला लगावला आहे. अमेठी सिंगापूर बनली का? असा सवाल त्यांनी राहुल गांधींना विचारला आहे.  राहुल गांधी हे अमेठी मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले आहेत. दरम्यान, आज नामांकन दाखल करण्यापूर्वी राहुल गांधी यांनी मोठा रोड शो करून शक्तिप्रदर्शन केले. यावेळी त्यांची बहीण प्रियंका गांधी, भाओजी रॉबर्ट वाड्रा आणि भाचा रिहान आणि भाची मिराया हेसुद्धा उपस्थित होते. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी दोन मतदारसंघांमधून निवडणूक लढवत असून, काही दिवसांपूर्वीच त्यांनी वायनाड येथून उमेदवारी अर्ज दाखल केला होता.  दरम्यान, अमेठी लोकसभा मतदारसंघातून राहुल गांधी यांना आव्हान देणाऱ्या  स्मृती इराणी या गुरुवारी आपल्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत. ''राहुल गांधी यांनी अमेठीतील जनतेची फसवणूक केली आहे. भाजपाच्या गेल्या पाच वर्षांच्या कार्यकाळात अमेठीमध्ये विकास कामे झाली आहेत. इथे जो काही विकास झाला आहे तो भाजपामुळे झाला आहे.''असा दावा स्मृती इराणी यांनी केला आहे. आपण अमेठी सोडून जाणार नाही. येथील जनतेची लढाई त्यांच्यासोबत राहूनच लढू असा टोलाही स्मृती इराणी यांनी लगावला.  राहुल गांधी हे 2004 मध्ये प्रथमच अमेठी मतदारसंघातून निवडून आले होते. तेव्हापासून ते अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.  2004 आणि 2009 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी सहजपणे विजय मिळवला होता. मात्र 2014 मध्ये स्मृती इराणी यांनी राहुल गांधींसमोर मोठे आव्हान उभे केले आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकSmriti Iraniस्मृती इराणीRahul Gandhiराहुल गांधीamethi-pcअमेठीUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरा प्रदेश लोकसभा निवडणूक 2019congressकाँग्रेसBJPभाजपा