शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
भारतीय तज्ज्ञाचा मोदी सरकारला सल्ला, इस्रायलचं उदाहरण देत सांगितलं पाकिस्तानवरील हल्ल्यादरम्यान भारताचं नेमकं कुठे चुकलं?
3
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
4
Mumbai Local Accident: लोकल ट्रेनमधून उतरताना फलाटाच्या फटीत अडकून प्रवाशाचा मृत्यू; घाटकोपरमधील घटना
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार 'ही' दिग्गज कंपनी; रेकॉर्ड डेट सोमवारी, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
6
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
7
जुन्या वादातून मित्राचा मित्राकडूनच खून; धारदार शस्त्राने केले वार, पोलिसांनी केली अटक
8
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
9
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
10
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
11
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
12
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
13
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
14
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
15
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
16
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
17
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
18
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
19
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
20
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम

अमरिंदर सिंग-अमित शाह यांच्या भेटीने काँग्रेसमध्ये खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2021 06:09 IST

जुन्या नेत्यांनी केली बैठकीची मागणी; पक्षाच्या अडचणी वाढल्या

ठळक मुद्देजुन्या नेत्यांनी केली बैठकीची मागणी; पक्षाच्या अडचणी वाढल्या

नवी दिल्ली/चंदीगड : अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांनी प्रदेशाध्यक्षपदाचा दिलेला राजीनामा मागे न घेतल्याने नवा अध्यक्ष नेमावा का, अशी चर्चा काँग्रेसमध्ये सुरू असतानाच पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी बुधवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याने काँग्रेस नेते हबकून गेले आहेत. ते भाजपला मदतच करतील, अशी भीती काँग्रेस नेत्यांना वाटत आहे.

कॅप्टन व शाह यांच्यात पाऊण तास चर्चा झाली. कॅप्टननी त्याबाबत काहीही भाष्य करण्यास नकार दिला. ते भाजपमध्ये जाणार, की काँग्रेसमध्ये राहूनच भाजपला मदत करणार, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. सरकार नवे कृषी कायदे मागे घेईपर्यंत कॅप्टन भाजपमध्ये जाणार नाहीत, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. मात्र नवज्योत सिद्धूच अन्य पक्षात जातील, असे कॅप्टन सांगत आहेत.

दुसरीकडे सिद्धू यांनी राजीनामा मागे घ्यावा, यासाठी मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांनी आज त्यांच्याशी चर्चा केली. मंत्री परगटसिंग यांनाही मुख्यमंत्र्यांनी सिद्धू यांच्याकडे पाठवले. मात्र सिद्धू अडून आहेत. सरकारपेक्षा पक्ष व विचारसरणी अधिक महत्त्वाची असते. त्यामुळे सिद्धू यांचे नेतृत्व आपणास मान्य आहे, असे (पान ७ वर)

सिद्धूंची मनधरणी नकोच

नवज्योतसिंग सिद्धू यांची मनधरणी करू नये, असा मतप्रवास काँग्रेसमध्ये आहे. राहुल गांधी केरळमधून परतल्यावर नवा प्रदेशाध्यक्ष नेमायचा का, यावर निर्णय होईल, असे समजते. माजी प्रदेशाध्यक्ष सुनील जाखड यांचे नाव आघाडीवर आहे. ते नाव कॅप्टन अमरिंदर सिंग यांनाही चालू शकेल. पण राहुल गांधी काँग्रेसचे खासदार व तरुण नेते रणवीरसिंग बिट्ट यांच्या नावाचा विचार करतील, असे सांगण्यात येते. ते ४६ वर्षांचे आहेत. पक्षाचे नेते हरीश रावत यांनी मात्र पंजाबमधील संकट लवकरच दूर होईल, असे सांगितले.

‘पूर्ण वेळ अध्यक्ष नसल्याने निर्णायकी स्थिती’ नवी दिल्ली : काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्षच नसल्याने ही निर्णायकी स्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी केली आहे. पक्षाचे आणखी एक नेते मनीष  तिवारी यांनीही मंगळवारी अशाच आशयाचे विधान केले होते. 

राजस्थानात सचिन पायलट यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, तर ते पद त्यांना दिल्यास मुख्यमंत्री अशोक गेहलोत व त्यांचे समर्थक बंड करतील, अशी शक्यता दिसत आहे. त्यामुळे सर्वच बाजूंनी काँग्रेसची पार कोंडी झाली आहे. ज्योतिरादित्य सिंदिया, जितीन प्रसाद, सुष्मिता देव, केरळचे व्ही. एम. सुधीरन यांनी पक्ष सोडूनही श्रेष्ठींना जाग आली नाही. अमरिंदर यांचा राजीनामा घेताना, नवा मुख्यमंत्री ठरवताना पक्षात चर्चा झाली नाही, नवज्योतसिंग सिद्धू यांच्यासह चार जणांनी पदे सोडली, पण पक्ष गप्पच आहे. अशा स्थितीत पक्ष दीर्घकाळ राहणे योग्य नसल्याचे सिब्बल यांनी नमूद केले. पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी कार्यकारिणीची लगेच बैठक बोलावून परिस्थितीवर चर्चा करावी, अशी मागणी कपिल सिब्बल व गुलाम नबी आझाद यांनी केली आहे. 

आनंद शर्मा यांच्यासह अनेक नेत्यांचा त्यांना पाठिंबा आहे. सिब्बल यांनी तर रणदीप सुरजेवाला व के. सी. वेणुगोपाल हेच पक्षाचे सर्व निर्णय घेतात, अशी सूचक टीका केली आहे.

टॅग्स :Punjabपंजाबcongressकाँग्रेसBJPभाजपाAmit Shahअमित शाहkapil sibalकपिल सिब्बलSonia Gandhiसोनिया गांधी