शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हवाई दलाच्या दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2019 13:27 IST

अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.

ईटानगर- अरुणाचल प्रदेशमधल्या सियांग जिल्ह्यात हवाई दलाचं दुर्घटनाग्रस्त विमान एएन-32मधल्या सर्व 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. एएनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, विमानाच्या अवशेषांपर्यंत बचाव पथक पोहोचल्यानंतर हवाई दलानं सर्व प्रवाशांचा मृत्यू झाल्याची खातरजमा केली आहे. या अपघातात सर्वच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची सूचना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंतही पोहोचवण्यात आली आहे. हवाई दलानं ट्विट करत याची माहिती दिली आहे.तत्पूर्वी 15 सदस्याचं बचाव पथक आज सकाळी दुर्घटनाग्रस्त विमानाच्या अवशेषापर्यंत पोहोचलं. अवशेषाची तपासणी केली असता विमानातील कोणताही सदस्य जिवंत राहिला नसल्याचं हवाई दलानं स्पष्ट केलं आहे. या बचाव पथकामध्ये एअरफोर्स, लष्कराचे जवान आणि गिर्यारोहकांचा समावेश होता. बचाव पथकाला एअरलिफ्ट करून विमानाच्या अवशेषांपर्यंत नेण्यात आलं, त्यानंतर त्यांना हेलिड्रॉप केलं. मंगळवारी भारतीय हवाई दलाच्या बेपत्ता विमान  AN-32 अवशेष अरुणाचलमधील सियांग जिल्ह्यात दिसले होते. दुर्घटनाग्रस्त विमान फारच उंचावर आणि घनदाट जंगलामध्ये आहे. अशा ठिकाणी पोहोचणं हे आव्हानात्मक होतं.भारतीय हवाई दलाच्या ३ जून रोजी कोसळलेल्या मालवाहू विमानाच्या अवशेषाचा काही भाग अरुणाचल प्रदेशच्या सियांग जिल्ह्यातील पायुमजवळील दुर्गम भागात आढळले होते. हे विमान आसामच्या जोरहाटहून अरुणाचल प्रदेशच्या मेचुका या लष्करी तळाकडे निघाले होते.या विमानात 8 कर्मचारी व 5 प्रवासी, असे 13 जण होते. एका आठवड्यानंतर विमानाचे अवशेष सापडल्याने त्यातील कर्मचारी जिवंत असण्याची शक्यता धूसर आहे. हे विमान कशामुळे कोसळले, याचाही आता तपास करण्यात येईल. हे विमान ३ जून रोजी दुपारी 12 वाजून 25 मिनिटांनी जोरहाटहून निघाले होते; पण दुपारी एक वाजण्याच्या सुमारात त्याचा संपर्क तुटला.या विमानाचे अवशेष पायुमजवळील दुर्गम भागात आढळल्याचे हवाई दलाने ट्विटद्वारे कळविले आहे. हे रशियन बनावटीचे अँटोनोव एएन-32 जातीचे विमान होते, यापूर्वीही अशा विमानांना अपघात झाले आहेत. या विमानाचा संपर्क तुटताच हवाई दलाने सर्वत्र शोध सुरू केला होता. त्यात नौदल, तसेच लष्कराचे जवान व इंडो-तिबेट बॉर्डर फोर्सचे पोलीसही मदत करीत होते.  

टॅग्स :airforceहवाईदलindian air forceभारतीय हवाई दल