शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

आखाती देशांत १ कोटी भारतीय अडकले; नौदलाला युद्धनौका तयार ठेवण्याचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 15:31 IST

CoronaVirus कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे.

नवी दिल्ली : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे देशांतर्गत विमान वाहतुकीबरोबरच आंतरराष्ट्रीय वाहतूकही बंद करण्यात आली आहे. मात्र, या आधी चीनमध्ये अडकलेल्या शेकडो भारतीयांना देशात आणण्यात आले होते. तसेच युरोप, अमेरिकेच्या भारतात अडकलेल्या नागरिकांना नेण्यासाठी त्या-त्या देशांनी विमाने पाठविली होती. आता आखाती देशांत जवळपास १ कोटी भारतीय अडकले आहेत. 

कोरोना व्हायरसमुळे आखाती देशांमध्ये नोकरी, काम धंद्यासाठी गेलेल्या या लोकांना मायदेशी आणण्यासाठी भारतीय नौदल तयार असल्याचे सरकारी सुत्रांनी एएनआय न्यूज एजन्सीला सांगितले आहे. जर गरज वाटली तर युद्धनौका आयएनएस जलाश्व आणि मगर श्रेणीतील दोन युद्धनौकांना आखाती देशांत पाठविले जाऊ शकते. सरकारने या युद्धनौका तयार ठेवण्यास सांगितल्या आहेत. या बोटींमधून १५०० लोकांना एकावेळी आणले जाऊ शकते.

 आयएनएस जलाश्व सध्या विशाखापट्टनमहून खूप लांब आहे. तर मगर श्रेणीतील युद्धनौका पश्चिमी समुद्रामध्ये तैनात आहेत.  इराण, इराक, कुवेत, सौदी अरेबिया, कतार, युएई आणि ओमानसह अन्य खाडी किनाऱ्यावरील देशांना आखाती देश म्हटले जाते. या ठिकाणी जवळपास १ कोटी भारतीय कामगार राहतात. यामध्ये जास्तीत जास्त लोक तेल कंपन्या आणि बांधकाम क्षेत्रात काम करतात. 

एअर इंडियालाही सूचना?एएनआयला सुत्रांनी दिलेल्य़ा माहितीनुसार एअर इंडियालाही तयारीचे आदेश देण्यात आले आहेत. नौदल आणि एअर इंडियाने तातडीने गल्फ देशांमधील अडकलेल्या भारतीयांना सुखरुप परत आणण्यासाठी एक योजना तयार करावी, असे सांगण्यात आले आहे. यावर एअर इंडिया ५०० विमाने आणि नौदल तीन युद्धनौका तयार ठेवणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. ही योजना सरकारसमोर मांडण्यात येणार असून परवानगी मिळाल्यानंतर लगेचच काम सुरु होणार असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

CoronaVirus चीनने १८४ देशांना नरक बनविले; डोनाल्ड ट्रम्प भडकले

फोर्ड संकटात! तब्बल दोन अब्ज डॉलरचा तोटा; नुकसान पाच अब्जांवर जाण्याची भीती

CoronaVirus पुण्याच्या प्रसिद्ध कंपनीने घेतली मोठी 'रिस्क'; 1000 रुपयांत कोरोना लस आणणार

देशासाठी काहीपण! आजारी बालकासाठी रेल्वेने १५०० किमींचे अंतर कापत १ लीटर दूध पोहोचवले

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsaudi arabiaसौदी अरेबियाIranइराणindian navyभारतीय नौदलAir Indiaएअर इंडिया