शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

एअर इंडियाची संपूर्ण निर्गुंतवणूक; विमान कंपनी पूर्णपणे विकणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 04:11 IST

५0 हजार कोटींचे कर्ज; सरकारचा अधिकार राहणार नाही

नवी दिल्ली : गेली अनेक वर्षे कर्जाच्या बोज्याखाली असलेल्या सरकारी मालकीच्या एअर इंडियाच्या १00 टक्के निर्गुंतवणुकीला मान्यता देण्यात आली आहे. नागरी विमान वाहतूकमंत्री हरदीपसिंग पुरी यांनी ही माहिती दिली आहे. एअर इंडियाचा १00 टक्के हिस्सा कोणी विकत घेतल्यास या विमान कंपनीवर सरकारचा अजिबात मालकी हक्क राहणार नाही.

एअर इंडियावर ५0 हजार कोटी रुपयांहून अधिक कर्ज आहे. अनेकदा कर्मचाऱ्यांचे पगार देणेही कंपनीला शक्य होत नाही. काही वेळा एअर इंडियाने केंद्र सरकारकडे आर्थिक पॅकेजचीही मागणी केली होती. तसेच आताही २४00 कोटी रुपयांचा निधी उभारण्यासाठी एअर इंडियाने केंद्र सरकारकडे हमीची विनंती केली आहे.

या कंपनीच्या निर्गुंतवणुकीचा निर्णय केंद्र सरकारने आधीच घेतला आहे. सुरुवातीला पुढे आलेल्या कंपन्यांनी आयत्या वेळी माघार घेतल्याने व्यवहार झाला नाही. तोट्यातील कंपनीला अर्थसाह्य करण्यापेक्षा तिचे खासगीकरण करणे म्हणजेच ती विकून टाकणे अधिक व्यवहार्य ठरेल, असे केंद्राचे मत आहे.

एअर इंडियाच्या विक्रीसाठी स्पेसिफिक अल्टरनेटिव्ह मेकॅनिझमची यंत्रणा तयार करण्यात आली होती. तिने कंपनीच्या १00 टक्के निर्गुंतवणुकीला मान्यता दिली आहे. या कंपनीचे खासगीकरण झाल्यानंतर सरकारी सेवांसाठी तिचा वापर केला जाईल की स्वतंत्र विमान यंत्रणा उभी केली जाईल, हे स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासाठी आतापर्यंत एअर इंडियाच्या खास विमानांचाच वापर होत आला आहे. अर्थात ही कंपनी कोण विकत घेणार, यावरच बरेच काही अवलंबून असेल.

इंडिगोच आता मोठी

याआधी जेट एअरवेज व किंगफिशर एअरलाइन्स या दोन खासगी विमान कंपन्या बंद पडल्या. त्यामुळे अनेक वैमानिक तसेच अन्य कर्मचारी व अधिकारी बेकार झाले आहेत. त्यापैकी अनेक जण अद्यापही नोकरीच्या शोधात आहेत. पण मंदीमुळे नोकºया मिळणे अवघड आहे. सध्या इंडिगो ही सर्वांत मोठी विमान कंपनी मानली जाते. तिचा विस्तारही जोमाने सुरू आहे.

टॅग्स :Air India Disinvestmentएअर इंडिया निर्गुंतवणूकCentral Governmentकेंद्र सरकारIndiaभारतAir Indiaएअर इंडिया