शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
Maharashtra Rain: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
3
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
4
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
5
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
6
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
7
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
8
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
9
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
10
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
11
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
12
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
13
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
14
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
15
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
16
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
17
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
18
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
19
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
20
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले

जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:43 IST

Air India Flight AI171 Crash: भाजपा आणि काँग्रेसने सर्व कार्यक्रम, सभा रद्द केल्या आहेत. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह नागरी उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अहमदाबाद विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातामध्ये आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक जखमींवर उपचार सुरु आहेत. भाजपा आणि काँग्रेसने सर्व कार्यक्रम, सभा रद्द केल्या आहेत. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह नागरी उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

यावेळी स्वामी यांनी लाल बहादूर शास्त्रींचा हवाला दिला आहे. मोदी आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत जे काही करत आहेत ते सर्व भ्रामक आहे जे थांबले पाहिजे, असे स्वामी म्हणाले आहेत. 

१९५० च्या दशकात जेव्हा एक ट्रेन रुळावरून घसरली तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्याच नैतिकतेनुसार मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतो. जेणेकरून या विमान अपघाताची मुक्त आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. मोदी आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत जे काही करत आहेत ते सर्व भ्रामक आहे जे थांबले पाहिजे, असे स्वामी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे. 

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह, मंत्री नायडू हे अहमदाबादला पोहोचले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादला निघाल्याचे समजते आहे. या अपघात ग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. तसेच हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याने अनेक इंटर्न डॉक्टरांनाही प्राण गमवावे लागल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीPlane Crashविमान दुर्घटनाAmit Shahअमित शाहAir Indiaएअर इंडियाBJPभाजपा