शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

जेव्हा ट्रेन रुळावरून घसरलेली तेव्हा लाल बहादूर शास्त्रींनी...; सुब्रमण्यम स्वामींकडून मोदी, शाह यांच्या राजीनाम्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 19:43 IST

Air India Flight AI171 Crash: भाजपा आणि काँग्रेसने सर्व कार्यक्रम, सभा रद्द केल्या आहेत. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह नागरी उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

अहमदाबाद विमानतळावरील एअर इंडियाच्या विमानाच्या अपघातामध्ये आतापर्यंत २०० जणांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. अनेक जखमींवर उपचार सुरु आहेत. भाजपा आणि काँग्रेसने सर्व कार्यक्रम, सभा रद्द केल्या आहेत. अशातच भाजपाचे राज्यसभा खासदार सुब्रमण्यम स्वामींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासह नागरी उड्डाण मंत्री नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

यावेळी स्वामी यांनी लाल बहादूर शास्त्रींचा हवाला दिला आहे. मोदी आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत जे काही करत आहेत ते सर्व भ्रामक आहे जे थांबले पाहिजे, असे स्वामी म्हणाले आहेत. 

१९५० च्या दशकात जेव्हा एक ट्रेन रुळावरून घसरली तेव्हा लाल बहादूर शास्त्री यांनी राजीनामा दिला होता. त्याच नैतिकतेनुसार मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि नागरी उड्डाण नायडू यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करतो. जेणेकरून या विमान अपघाताची मुक्त आणि निष्पक्ष चौकशी व्हावी. मोदी आणि त्यांचे सहकारी आतापर्यंत जे काही करत आहेत ते सर्व भ्रामक आहे जे थांबले पाहिजे, असे स्वामी यांनी एक्सवर पोस्ट करत म्हटले आहे. 

एअर इंडियाच्या विमान अपघातानंतर केंद्रीय मंत्री अमित शाह, मंत्री नायडू हे अहमदाबादला पोहोचले आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी देखील अहमदाबादला निघाल्याचे समजते आहे. या अपघात ग्रस्त विमानात गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी देखील होते. तसेच हे विमान बीजे मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलवर कोसळल्याने अनेक इंटर्न डॉक्टरांनाही प्राण गमवावे लागल्याचे सांगितले जात आहे. 

टॅग्स :Subramanian Swamyसुब्रहमण्यम स्वामीNarendra Modiनरेंद्र मोदीPlane Crashविमान दुर्घटनाAmit Shahअमित शाहAir Indiaएअर इंडियाBJPभाजपा