शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

'अग्निपथ'वरून वाद; BJP-JDU युती राहणार की तुटणार? भाजप नेत्याचं जेडीयूला आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2022 21:22 IST

अग्निपथ योजनेवरून जेडीयू आणि प्रमुख मित्रपक्ष असलेला भाजप यांच्यातील दुरावा वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नेते राज्यातील सुशासनावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत...

केंद्राच्या अग्निपथ योजनेवरून बिहारमधील वातावरण जबरदस्त तापले आहे. यामुळे नितीश कुमार यांचा जेडीयू आणि प्रमुख मित्रपक्ष असलेला भाजप यांच्यातील दुरावाही वाढताना दिसत आहे. दोन्ही पक्षांतील नेते राज्यातील सुशासनावरून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. भाजप अध्यक्ष संजय कुमार जायसवाल यांच्यानंतर, नीतीश कॅबिनेट मधील मंत्री आणि भाजप नेते नीरज कुमार सिंह बबलू यांनीही जेडीयूच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एवढेच नाही, तर त्यांनी जेडीयू नेत्यांना युतीतून बाहेर पडण्याचेही आव्हान दिले आहे. 

भाजपनं जेडीयूवर केले आहेत असे आरोप - बिहारमध्ये अग्निपथ योजनेच्या विरोधात झालेल्या हिंसक आंदोलनादरम्यान, भाजप नेत्यांच्या घरांनाही लक्ष्य करण्यात् आले होते. भाजपच्या अनेक नेत्यांच्या घरांवर आंदोलकांनी हल्ले केले. यानंतर केंद्राने भाजपच्या 10 नेत्यांना Y दर्जाची सुरक्षा दिली. भाजप अध्यक्ष संजयकुमार जायस्वाल यांनी निदर्शने आणि हिंसक घटनांसंदर्भात बोलताना, हे बिहार पोलिसांचे अपयश आहे, असे म्हटले होते.

जेडीयूचा भाजपवर पलटवार - संजय जायस्वाल यांच्या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी जेडीयूचे प्रवक्ते आणि एमएलसी नीरज कुमार पलटवार करत म्हणाले होते, की यूपीमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने अग्निपथ भरती योजनेला विरोध करणाऱ्या तरुणांवर बुलडोझर का चालवले नाही? अलिगडमध्ये पोलीस ठाणे पेटवणाऱ्या आंदोलकांवर कडक कारवाई का केली गेली नाही? 

तसेच, रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण करणे, ही प्रामुख्याने रेल्वे संरक्षण दलाची (आरपीएफ) जबाबदारी आहे, जे केंद्राच्या अखत्यारीत येते. आरपीएफने आंदोलनाच्या नावावर नष्ट करण्यात आलेल्या आणि लुटण्यात आलेल्या रेल्वेच्या संपत्तीचे संरक्षण करायला हवे होते. भाजपचे पदाधिकारी आरपीएफच्या अपयशासंदर्भात का बोलत नाहीत? असा प्रश्नही नीरज कुमार यांनी केला होता.

भाजप नेत्याचे जेडीयूला आव्हान -जेडीयू प्रवक्त्यांच्या नाराजीचा उल्लेख करत, भाजप नेते मंत्री बबलू म्हणाले, त्यांचे (जेडीयू नेते) पाय पकडून, त्यांना युतीत राहण्यासाठी कुणीही थांबवले नाही. जर काही लोकांनी कुठल्या ना कुठल्या बहान्याने एनडीएतून बाहेर जाण्याचे ठरवलेच असले, तर ते पुढे जाऊ शकतात. तसेच, भाजप प्रदेशाध्यक्षांनी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षिततेसंदर्भात पोलिसांच्या अपयशावर बोट ठेवले, तर त्यात चूक काय होते? असेही बबलू म्हणाले.

 

टॅग्स :BJPभाजपाAgneepath Schemeअग्निपथ योजनाBiharबिहारNitish Kumarनितीश कुमार