शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
5
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
6
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
7
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
8
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
9
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
10
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
11
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
12
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
13
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
14
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
15
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
16
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
17
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
18
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
19
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
20
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले

UGCविरुद्ध आदित्य ठाकरे सर्वोच्च न्यायालयात, युवक काँग्रेसनंही दिला पाठिंबा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2020 2:42 PM

यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली.

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या निर्णयानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) अंतिम वर्षातील देशभरात विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या घेतलेल्या निर्णयाला आव्हान देत राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयासमोर याचिका दाखल केली. परंतु कोर्टाने अद्याप ही याचिका सुनावणीसाठी स्वीकारलेली नाही. ठाकरे सरकारने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्यासाठी यापूर्वीच पॅरामीटर्स बनवले होते. त्यामुळे यूजीसीच्या नव्या निर्णयानंतर राज्य सरकार संतप्त झालं आहे.विशेष म्हणजे युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनीसुद्धा आदित्य ठाकरेंच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाविरोधात आदित्यजी ठाकरे यांच्या माध्यमातून युवा सेनेच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे, त्यास युवक काँग्रेसचा पाठिंबा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परीक्षा घेणे म्हणजे असंवेदनशीलतेचा कळस असल्याचंही सत्यजित तांबे म्हणाले आहेत.  यूजीसीच्या 30 सप्टेंबरपूर्वी परीक्षा घेण्याच्या सूचनाकोरोना विषाणूच्या साथीमुळे शालेय ते महाविद्यालयीन स्तरापर्यंतच्या परीक्षांचा देशभर परिणाम झाला. बोर्डाच्या परीक्षादेखील शाळांमध्ये रद्द केल्या गेल्या, परंतु केंद्र सरकारने विद्यापीठामध्ये अंतिम वर्षाची किंवा सेमेस्टर परीक्षा घेण्याचे ठरविले होते. 6 जुलै रोजी यूजीसीने विद्यापीठ परीक्षांबाबत सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जारी केली, ज्या अंतर्गत सर्व विद्यापीठांना 30 सप्टेंबरपूर्वी अंतिम वर्ष किंवा सेमेस्टर परीक्षा पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्याविरोधात विद्यार्थी आपला निषेध नोंदवत आहेत. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या आदेशानंतर आतापर्यंत देशभरातील 194 विद्यापीठांनी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेतल्या आहेत. यूजीसीने अंतिम वर्षाच्या परीक्षेची माहिती विचारण्यासाठी विद्यापीठांकडे नुकताच संपर्क साधला होता आणि 755 विद्यापीठांकडून त्यांना उत्तरही मिळालं होतं.पुढील महिन्यात 366 विद्यापीठांत परीक्षायूजीसीने एक प्रसिद्धिपत्रक जारी करून त्याच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांविषयी सांगितले आहे. यूजीसीच्या प्रसिद्धीपत्रकात असे सांगितले आहे की, त्यांनी मार्गदर्शक तत्त्वांवर केलेल्या कारवाईबाबत देशातील सर्व विद्यापीठांमध्ये (मानद, खासगी आणि सरकारी) संपर्क साधला होता आणि त्यातील 755 विद्यापीठांचा प्रतिसाद मिळाला होता. यूजीसीच्या म्हणण्यानुसार, त्यांना 120 डीम्ड, 274 खासगी, 40 केंद्रीय आणि 321 राज्य सरकारी विद्यापीठांकडून प्रत्युत्तरे मिळाले आहे, त्यापैकी 194ने विद्यापीठांनी परीक्षा आतापर्यंत पूर्ण केल्या आहेत. त्याचबरोबर, इतर 366 विद्यापीठे ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये परीक्षांचे आयोजन करण्याची योजना आखत आहेत.

हेही वाचा

रेल्वे प्रवाशांसाठी खूशखबर! वेटिंगची झंझट लवकरच संपणार अन् मिळणार फक्त कन्फर्म तिकीट

CoronaVirus : टेन्शन वाढलं! कोरोनावरच्या 'त्या' औषधांनी मोठा धोका; WHOचा गंभीर इशारा

लेहमध्ये बेपत्ता झालेले IES सुभान अली २५ दिवसांनंतरही गायबच, वडिलांचा सरकारवर गंभीर आरोप

रेकॉर्ड ब्रेक! डिझेलची किंमत पुन्हा भडकली, पेट्रोललाही मागे सोडलं

जिओनं दोन सर्वात स्वस्त प्लॅन केले बंद, लगेचच जाणून घ्या...  

उलवेत बनावट रॉयल्टी चलनप्रकरणी सात जणांविरोधात गुन्हा दाखल 

टाटा सन्सच्या मंडळामध्ये नोएल यांचा होऊ शकतो समावेश

मोदी सरकारच्या 'या' योजनेतून थेट शेतकर्‍यांच्या खात्यात पाठविले जातात पैसे; जाणून घ्या सर्व काही

इराणचा भारताला आणखी एक दे धक्का! महत्त्वाकांक्षी प्रकल्पातून ONGC बाहेर

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेSatyajit Tambeसत्यजित तांबे