शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने नवरदेव संतापला, मित्रांच्या मदतीने खून केला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2018 17:22 IST

लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने एका संशयित व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

बदायूं ( उत्तर प्रदेश) - लग्नात चप्पल चोरीस गेल्याने संतापलेल्या नवरदेवाने मित्रांच्या मदतीने एका संशयित व्यक्तीचा खून केल्याची धक्कादायक घटना उत्तर प्रदेशमधील बदायूं जिल्ह्यात घडली आहे. या प्रकरणी मृत व्यक्तीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून नवरदेव आणि त्याच्या मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नवरदेव आणि त्याचे मित्र विवाह सोहळ्यामधील रीतिरिवाज पूर्ण करण्यासाठी सासरी आले होते. त्यावेळी ही घटना घडली.  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बदायूं जिल्ह्यातील बिल्सी येथील हा प्रकार आहे. येथील सुरेंद्र नावाच्या तरुणाचा विवाह सूरजपूर गावात होणार होता. बुधवारी सुरेंद्र वऱ्हाड घेऊन गावात आला. तेथे विवाहासाठी त्याने पायातील चपला काढून ठेवल्या. विवाहातील विधी पूर्ण झाल्यानंतर सुरेंद्रचा चपला हरवल्याचे समोर आले. त्यामुळे नवरदेव सुरेंद्र आणि त्याच्या मित्रांनी गोंधळ घालण्यास सुरुवात केली. त्यांनी तेथेच उभ्या असलेल्या रामसरणवर चपला चोरल्याचा आरोप केला. वादावादी वाढताच त्यांनी रामसरण याल मारहाण करण्यास सुरुवात केली. तेथे उपस्थित असलेली मंडळी मध्यस्ती करून रामसरणला वाचवेपर्यंत नवरदेव आणि त्याच्या मित्रांनी रामसरणला रक्तबंबाळ केले. गंभीर अवस्थेत त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारांदरम्यान त्याची प्राणज्योत मालवली.  त्यानंतर मृत रामसरण याची पत्नी मीरा देवी हिने नवरदेवर सुरेंद्र आणि त्याच्या चार मित्रांवर हत्येचा आरोप करत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलियांनी या सर्वांवर हत्येचा गुन्हा दाखल केला. दरम्यान, रामसरण याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.  

टॅग्स :Crimeगुन्हाMurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेश