शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

'आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, महिलांमध्ये जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न'; PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 21:17 IST

जेव्हा तीन तलाक विरोधात कायदा आणला गेला, तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?'' असा सवालही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

या लोकांनी महिला आरक्षण विधेयक तीन दशकांपर्यंत रोखून ठेवले होते. आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, विरोधक महिलांमध्ये जाती, धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते वडोदरा येथे "नारी शक्ती वंदनशी" संबंधित एका कार्यक्रमात बोलत होते.

महिला आरक्षणासंदर्भात काँग्रेस, सपा, जेडीयू आणि आरजेडीसह इतरही काही विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयकात ओबीसी आरक्षण जोडण्याची मागणी केली आहे. याच बरोबर विरोधकांनी महिला आरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा अशी मागणीही केली आहे.

तत्पूर्वी, आदिवासी बहूल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोदेली येथे जनसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, माझ्या नावावर घर नाही, पण मी देशातील अनेक मुलींच्या नावावर घरे होण्यासाठी काम केले. आमच्या सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे, जे तीन दशकांपासून पडून होते. गरिबांना घर, पाणी, रस्ते, वीज आणि शिक्षण देण्याला आमचे प्राधान्य आहे. आज गरिबांसाठी देशभरात चार कोटींहून अधिक पक्की घरे बांधण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर आदिवासी समाजासाठी त्यांच्या इच्छेनुसार घरे बांधण्यात आली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

"तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?" -मोदी म्हणाले, ''त्यांनी (विरोधी पक्षांनी) उज्ज्वला योजनेची खिल्ली उडवली. जेव्हा आम्ही मुस्लीम महिलांना तीन तलाकपासून मुक्ती देण्यासंदर्भात बोलत होतो, तेव्हा त्यांना राजकीय समिकरणाची चिंता होती. त्यांना मुस्लीम महिलांच्या इधिकाराची काळजी नव्हती. त्यांना केवळ आपल्या मतपेटीची चिंता होती. एवढेच नाही, तर जेव्हा तीन तलाक विरोधात कायदा आणला गेला, तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?'' असा सवालही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीWomen Reservationमहिला आरक्षणWomenमहिलाEducationशिक्षणBJPभाजपा