'आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, महिलांमध्ये जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न'; PM मोदींचा हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2023 09:17 PM2023-09-27T21:17:19+5:302023-09-27T21:17:55+5:30

जेव्हा तीन तलाक विरोधात कायदा आणला गेला, तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?'' असा सवालही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

After reservation bill passed attempt to divide women on caste and religion says PM Narendra Modi | 'आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, महिलांमध्ये जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न'; PM मोदींचा हल्लाबोल

'आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, महिलांमध्ये जाती-धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न'; PM मोदींचा हल्लाबोल

googlenewsNext

या लोकांनी महिला आरक्षण विधेयक तीन दशकांपर्यंत रोखून ठेवले होते. आरक्षण विधेयक मंजूर झाल्यानंतर, विरोधक महिलांमध्ये जाती, धर्माच्या नावावर फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. ते वडोदरा येथे "नारी शक्ती वंदनशी" संबंधित एका कार्यक्रमात बोलत होते.

महिला आरक्षणासंदर्भात काँग्रेस, सपा, जेडीयू आणि आरजेडीसह इतरही काही विरोधी पक्षांनी महिला आरक्षण विधेयकात ओबीसी आरक्षण जोडण्याची मागणी केली आहे. याच बरोबर विरोधकांनी महिला आरक्षण कायदा लवकरात लवकर लागू करण्यात यावा अशी मागणीही केली आहे.

तत्पूर्वी, आदिवासी बहूल छोटा उदयपूर जिल्ह्यातील बोदेली येथे जनसभेला संबोधित करताना मोदी म्हणाले, माझ्या नावावर घर नाही, पण मी देशातील अनेक मुलींच्या नावावर घरे होण्यासाठी काम केले. आमच्या सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आणले आहे, जे तीन दशकांपासून पडून होते. गरिबांना घर, पाणी, रस्ते, वीज आणि शिक्षण देण्याला आमचे प्राधान्य आहे. आज गरिबांसाठी देशभरात चार कोटींहून अधिक पक्की घरे बांधण्यात आली आहेत. एवढेच नाही, तर आदिवासी समाजासाठी त्यांच्या इच्छेनुसार घरे बांधण्यात आली आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.

"तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?" -
मोदी म्हणाले, ''त्यांनी (विरोधी पक्षांनी) उज्ज्वला योजनेची खिल्ली उडवली. जेव्हा आम्ही मुस्लीम महिलांना तीन तलाकपासून मुक्ती देण्यासंदर्भात बोलत होतो, तेव्हा त्यांना राजकीय समिकरणाची चिंता होती. त्यांना मुस्लीम महिलांच्या इधिकाराची काळजी नव्हती. त्यांना केवळ आपल्या मतपेटीची चिंता होती. एवढेच नाही, तर जेव्हा तीन तलाक विरोधात कायदा आणला गेला, तेव्हा ते मुस्लीम महिलांच्या अधिकारांसाठी का उभे राहिले नाही?'' असा सवालही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

Web Title: After reservation bill passed attempt to divide women on caste and religion says PM Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.