शहरं
Join us  
Trending Stories
1
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
2
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
3
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
4
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
5
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
6
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
7
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
8
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
9
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
10
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
11
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
12
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी
13
'आता सगळ्याचे दाखले पुराणात शोधण्याच्या काळात अशी माणसं...'; राज ठाकरेंची जयंत नारळीकरांबद्दल पोस्ट
14
२०२५ मध्ये शनैश्चर जयंती कधी आहे? ‘या’ गोष्टी आवर्जून करा; पाहा, महत्त्व, महात्म्य, मान्यता
15
अखेर परेश रावल यांनी सांगितलं 'हेरा फेरी ३' सोडण्यामागचं कारण; म्हणाले, "मला ही भूमिका..."
16
Jyoti Malhotra : 'लव्ह यू खुशमुश'...! ज्योतीला पोलीस घरी घेऊन गेले, ती रुममधून बाहेर पडताच पोलिसांना पत्र मिळाले
17
‘या’ ३ गोष्टी नेहमी लक्षात ठेवा, अखंडित सेवा करा; स्वामी शुभफल देतील, अढळ विश्वास असू द्या!
18
मदरशांत ऑपरेशन सिंदूरचे धडे शिकविले जाणार; उत्तराखंड सरकारचा निर्णय
19
प्लास्टिक, काच की स्टील... फ्रिजमध्ये कोणती पाण्याची बाटली ठेवणं आरोग्यासाठी फायदेशीर?
20
"खरंतर शरीफ यांच्या घरी बिर्याणी खायला गेलेल्यांना निशान ए पाकिस्तान मिळाला पाहिजे’’, काँग्रेसचा टोला   

आयुक्तांच्या झाडाझडतीनंतर पावसाळी कामांना वेग

By admin | Updated: June 8, 2016 01:50 IST

पुणे : मान्सूनचे आगमन होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असतानाही अद्याप पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्‍यांची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर पावसाळी कामे पूर्ण करण्यास वेग आला आहे. येत्या ३ दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश कुणाल कुमार यांनी काढले आहेत. यापार्श्वभुमीवर शहराच्या अनेक भागांमध्ये नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे.

पुणे : मान्सूनचे आगमन होण्यास दोन दिवसांचा कालावधी उरला असतानाही अद्याप पावसाळी कामे पूर्ण न झाल्याने महापालिकेचे आयुक्त कुणाल कुमार यांनी क्षेत्रिय कार्यालयातील अधिकार्‍यांची झाडाझडती घेतल्यानंतर अखेर पावसाळी कामे पूर्ण करण्यास वेग आला आहे. येत्या ३ दिवसात ही सर्व कामे पूर्ण करण्याचे निर्देश कुणाल कुमार यांनी काढले आहेत. यापार्श्वभुमीवर शहराच्या अनेक भागांमध्ये नाले, पावसाळी गटारे यांच्या सफाईची कामांना वेग आल्याचे दिसून येत आहे.
प्रत्येक क्षेत्रिय कार्यालयाने केलेल्या नालेसफाईच्या कामाची तपासणी करण्यासाठी कुणाल कुमार यांनी मुख्य खात्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांची नियुक्ती करून त्यांना त्याचा अहवाल तातडीने सादर करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. दरवर्षी नाले, पावसाळी गटारे सफाईची कामे ३१ मे पर्यंत पूर्ण करण्याची डेडलाइन दिली जाते, मात्र ही डेडलाइन पाळली गेली नाही. त्यानंतर आता १० जून पर्यंत सर्व पावसाळी कामे पूर्ण करण्याची डेडलाइन आखून देण्यात आली आहे.
नगरअभियंता प्रशांत वाघमारे, सहायक आयुक्त श्रीनिवास बोनाला, व्ही.जी.कुलकर्णी, मदन आढारी, संदिप खांडवे, राजेंद्र राऊत, अनिरुध्द पावसकर, प्रविण गेडाम, हेंमत देवधर, विजयकुमार शिंदे, नरेंद्र साळुंखे, युवराज देशमुख, श्रीकृष्ण चौधरी आणि नंदकिशोर जगताप या अधिकार्‍यांवर क्षेत्रिय कार्यालयनिहाय जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी सफाईच्या कामाांची तपासणी करायची आहे. त्याचबरोबर आपत्ती व्यवस्थापनाचाही आढावा घेण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.
क्षेत्रिय कार्यालयांना पावसाळी कामे पूर्ण करण्यासाठी येणार्‍या अडचणींचा यावेळी आढावा घेण्यात आला. काही क्षेत्रिय कार्यालयांना यंत्रसामुग्री कमी पडत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या. त्यानुसार त्यांना तातडीने त्याची व्यवस्था करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले. आत्पकालीन व्यवस्थापनाबाबतही चर्चा करण्यात आली.
पीएमसी केअरच्या माध्यमातून क्षेत्रिय कार्यालय निहाय व विविध खातेनिहाय प्राप्त झालेल्या आकडेवारीचा आढावा आयुक्तांनी घेतला. दैनंदिन कामकाजाच्या अनुषंगाने पीएमसी केअर तसेच सोशल मिडीया व मनपा संकेतस्थळ, स्वागत कक्ष, लोकशाही दिन या विविध माध्यमातून येणार्‍या तक्रारींचे जलद निवारण करण्याचेही आदेश तयांनी दिले आहेत. स्वच्छ भारत अभियानांर्तगत घनकचरा व्यवस्थापनाकरीता कामकाज स्तर वाढविणे, घरोघरी कचरा उचण्याच्या प्रमाणात वाढ करणे, जादा व सातत्याने कचरा होणार्‍या जागांचे नियोजन करून कचर्‍यामध्ये घट करणे आदी उपाय योजना करण्यास यावेळी सांगण्यात आले.