शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

"थांबू नका, कारवाई सुरुच ठेवा"; शहीद विनय नरवालच्या पत्नीने दहशतवाद्यांना शिक्षा देण्यासाठी केली मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2025 11:36 IST

ऑपरेशन सिंदूरनंतर शहीद नौदल अधिकारी विनय नरवाल यांच्या पत्नीने कारवाई सुरुच ठेवण्याची मागणी केली आहे.

Operation Sindoor:ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करून पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला आहे. या कारवाईचे देशभरातून कौतुक होत आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेले नौदल अधिकारी विनय नरवाल यांची पत्नी हिमांशी नरवाल ऑपरेशन सिंदूरची बातमी ऐकून भावुक झाल्या. त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. हिमांशीने सरकारला दहशतवाद्यांविरुद्धची कारवाई थांबवू नये असे आवाहन केले.

करनाल येथील रहिवासी लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या आई, वडील आणि पत्नीने पाकिस्तान आणि पीओकेमधील दहशतवादाविरुद्ध भारताच्या कारवाईचे स्वागत केले. दहशतवाद्यांनी विनय नरवाल यांना त्यांची पत्नी हिमांशी नरवाल यांच्यासमोर तीन गोळ्या घालून हत्या केली होती. त्यानंतर आता हिमांशी नरवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सैन्याचे आणि सरकारचे कौतुक केले. ही कारवाई इथेच थांबू नये तर दहशतवाद पूर्णपणे नष्ट होईपर्यंत सुरू ठेवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

"माझे पती सैन्य दलात होते आणि जेव्हा ते सामील झाले तेव्हा त्यांना देशात शांतता हवी होती. निष्पापांचे प्राण जाऊ नयेत, या देशात द्वेष आणि दहशत नसावी अशी त्यांची भावना होती. त्यांची हीच भावना या ऑपरेशन सिंदूरमध्ये आहे. सरकार दहशतवाद आणि द्वेष सहन करू शकत नाही," असं हिमांशी नरवाल यांनी म्हटलं.

"मी सरकारचे आभार मानते, पण मी एक विनंती करते की ही एवढीच कारवाई राहू नये. जोपर्यंत दहशतवाद पूर्णपणे नष्ट होत नाही तोपर्यंत कारवाई थांबवता कामा नये. ही तर फक्त सुरुवात आहे. मी ज्या वेदना सहन करत आहे त्या वेदना दुसऱ्या कोणालाही सहन करायला लागू नयेत असे मला वाटते. दहशतवाद्यांना आणि त्यांच्या प्रमुखांना चोख प्रत्युत्तर देऊन, आपल्या सैन्याने आणि मोदी सरकारने हे सिद्ध केले की  आपल्याला जे सहन करावे लागले ते आता पाकिस्तानला करावे लागेल," असे हिमांशी म्हणाल्या.

"मी दहशतवाद्यांना विनंती केली होते की माझ्या लग्नाला फक्त सहा दिवस झाले आहेत, आमच्यावर दया करा. पण त्यांचे उत्तर होते मोदीजींना सांगा आणि आज मोदीजी आणि आपल्या सैन्याने उत्तर दिले आहे. आमचा विनय आणि इतर २६ निष्पाप नागरिकांचे हौतात्म्य व्यर्थ गेले नाही याबद्दल आम्हाला समाधान आहे," असेही नरवाल यांनी म्हटलं. 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तान