शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : Video - "दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेसचं भ्याड सरकार जगभर रडायचं, आज पाकिस्तान रडतंय..."
2
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
3
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
4
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
5
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
6
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
7
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
8
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
9
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 
10
"रोज उशिरा येतेस..."; मुख्याध्यापिकेने अडवताच शिक्षिका संतापली, हाणामारीचा Video व्हायरल
11
Gautam Adani : श्रीलंका, ऑस्ट्रेलिया आणि इस्रायलनंतर आता अदानींनी फिलिपिन्सकडे मोर्चा वळवला, काय आहे प्लॅन?
12
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
13
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
14
PHOTOS: IPL मध्ये पृथ्वीच्या गर्लफ्रेंडचा जलवा; स्टार खेळाडूला चीअर करताना दिसली निधी
15
"भाऊ वडिलांना अग्नी देत होता अन् मी हास्यजत्रेच्या...", प्रसाद ओकने सांगितला भावनिक प्रसंग
16
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
17
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
18
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
19
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
20
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित

'फनी' वादळानंतर मोदी सरकारला 'नवीन' बळ; सत्तेचं गणित होणार सोपं? 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2019 12:37 PM

दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत.

ठळक मुद्देनरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता पटनायक यांनी व्यक्त केली आहे.हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाचा आता फक्त शेवटचा टप्पा उरलाय. १९ मे रोजी आठ राज्यांमधील ५९ जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे प्रचाराचा धुरळा उडतोच आहे, आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडतच आहेत. असं असताना, निवडणुकीच्या मैदानात आमनेसामने उभे ठाकलेले दोन मोठे नेते निकालाआधीच एकमेकांचं कौतुक करू लागल्यानं राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या आहेत. या 'नवीन' समीकरणाला कारणीभूत ठरलं आहे, ते फनी चक्रीवादळ.

गेल्या शुक्रवारी फनी चक्रीवादळानं ओडिशामध्ये हाहाकार उडवला. या चक्रीवादळात ४१ जणांचा मृत्यू झाला असून मोठी वित्तहानीही झाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या परिस्थितीची हवाई पाहणी करून १ हजार कोटींची तातडीची मदतही जाहीर केली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, नरेंद्र मोदी आणि ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्यातील जवळीक वाढत असल्याचं पाहायला मिळतंय. 

फनी चक्रीवादळाआधी नागरिकांच्या स्थलांतराचे आणि नंतर मदत आणि पुनर्वसनाचे काम ओडिशा सरकारने उत्तम प्रकारे केल्याचं प्रशस्तीपत्रक नरेंद्र मोदी यांनी नवीन पटनायक यांना दिलं होतं. त्यांच्या या पत्राला पटनायक यांनी उत्तर पाठवलंय आणि त्यात केंद्राचे आभार मानलेत. गरजेच्या वेळी राज्याच्या पाठीशी उभे राहिल्याबद्दल धन्यवाद, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे. निवडणुकीच्या रणसंग्रामात एकमेकांवर टीकास्त्र सोडणाऱ्या या दोन नेत्यांमधील हे कौतुकाचे बोल भविष्यातील राजकीय समीकरणांची नांदी ठरू शकतात, असं जाणकारांना वाटतंय. 

फनी वादळावर या मराठमोळ्या अधिकाऱ्याचा 'विजय' : वाचवले तीन लाख नागरिकांचे प्राण 

लोकसभा निवडणुकीत बहुतांश प्रादेशिक पक्षांनी आपला गट जाहीर केला आहे. परंतु, बीजू जनता दलाचे नेते नवीन पटनायक यांनी आपले पत्ते उघडलेले नाहीत. गेल्या वेळी ओडिशातील २१ पैकी २० खासदार बीजेडीचे होते. यावेळीही त्यांना तसंच यश मिळेल, असा अंदाज आहे. त्यामुळे लोकसभा त्रिशंकू झाल्यास त्यांची भूमिका निर्णायक असेल. बीजू जनता दलाच्या स्थापनेपासून आत्तापर्यंत कधीच नवीन पटनायक यांनी काँग्रेसशी 'हात'मिळवणी केलेली नाही. परंतु, यावेळच्या निवडणुकीत ते भाजपापासूनही दूरच राहिले होते. या पार्श्वभूमीवर, मोदी आणि पटनायक यांच्यातील पत्रव्यवहार, भले औपचारिक असला तरी मैत्रीचे पूल बांधणारा ठरू शकतो.

दरम्यान, फनी चक्रीवादळाचा तडाखा अनेक भागांना बसलाय. सुमारे ५ लाख घरांचं नुकसान झालंय. ही घरं बांधण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत निधी देण्याची विनंती नवीन पटनायक यांनी केली आहे. या योजनेतील नव्या तरतुदीनुसार, घरबांधणीचा ९० टक्के खर्च केंद्र सरकार देतं. आता पंतप्रधान ही विनंती मान्य करून जवळीक आणखी वाढवतात का, हे पाहावं लागेल.

टॅग्स :Fani Cyclone फनी वादळLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Odisha Lok Sabha Election 2019ओडिशा लोकसभा निवडणूक निकाल 2019Narendra Modiनरेंद्र मोदी