शहरं
Join us  
Trending Stories
1
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
2
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
3
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
4
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
5
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
6
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
7
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
8
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
9
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
10
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
11
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
12
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
13
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
14
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
15
Hardik-Natasa Divorce : हार्दिक पांड्याबरोबरच्या घटस्फोटाच्या चर्चांवर नताशाने दोन शब्दात दिलं उत्तर, म्हणाली...
16
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
17
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
18
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
19
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
20
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल

दिल्लीतील पराभवानंतर भाजपकडून प्रादेशिक पक्षांना जवळ करण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2020 3:25 PM

आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते.

नवी दिल्ली - दिल्ली विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर भारतीय जनता पक्ष देशातील प्रादेशिक पक्षांशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करत आहे. दिल्लीतील निवडणुकीच्या निकालानंतर भाजपविरोधी पक्ष आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात एकत्र येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. ही शक्यता नष्ट करण्यासाठी भाजपकडून प्रादेशिक पक्षांसोबत जवळीक साधण्याचा प्रयत्न होत असल्याचे सांगण्यात येत आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच वायएसआर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्याशी सुमारे दीड तास चर्चा केली. यावरून आगामी काळात वायएसआर काँग्रेस आणि तामिळनाडूमधील डीएमके यांना एनडीएमध्ये सामील करून घेण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होण्याची शक्यता आहे. 

दरम्यान वायएसआर काँग्रेस आणि भाजप एकत्र आल्यास दोन्ही पक्षांचा फायदाच होणार आहे. भाजपला राज्यसभेत महत्त्वपूर्ण कायदे संमत करून घेण्यासाठी प्रादेशिक पक्षांची गरज भासणारच आहे. तर वायएसआर काँग्रेसला राज्यातील विधान परिषदे समाप्त करण्यासाठी भाजपच्या मदतीची गरज आहे. विधान परिषदेत तेलगु देसम पक्षाचे बहुमत आहे. जगन रेड्डी यांनी नुकतेच राज्याला तीन राजधानी करण्याचा ठराव केला होता. मात्र विधान परिषदेत हा ठराव मंजुर झाला नाही. त्यामुळे नाराज झालेल्या जगन रेड्डींनी राज्यातील विधान परिषदच समाप्त करण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे. 

वायएसआर काँग्रेस पक्ष लोकसभेत चौथा सर्वात मोठा पक्ष आहे. तसेच येणाऱ्या काळात राज्यसभेत वायएसआर काँग्रेसचे वर्चस्व वाढणार आहे. त्यातच भाजपच्या हातून एकापाठोपाठ एक राज्य निसटत आहे. अशा स्थितीत राज्यसभेत भाजपला प्रादेशिक पक्षांची गरज भासणार आहे. राज्यसभेत वायएसआर काँग्रेसकडे दोन खासदार आहे. मात्र एप्रिल महिन्यात ही संख्या सहा होणार आहे. तर 2022 पर्यंत हा आकडा 10 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. तर लोकसभेत वायएसआरचे 22 खासदार आहेत.

दरम्यान दिल्लीत झालेल्या पराभवानंतर प्रादेशिक पक्षांची मदत घेणे भाजपसाठी अपरिहार्य झाले आहे. मग तो पक्ष सत्तेत असो वा विरोधात. आमचे मुख्य लक्ष्य, भाजपविरोधी गट एकत्र येण्यापासून रोखणे हेच असल्याचे भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले. यावरून भाजपने आता प्रादेशिक पक्षांसोबत मैत्री करण्याकडे आपला मोर्चा वळवल्याचे स्पष्ट होते.