शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

आईच्या निधनानंतर ५ मुलं बनली अनाथ, कलेक्टर साहेबांनी दिला मदतीचा हाथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2020 19:09 IST

पाच वर्षांपूर्वीच पतीचे निधन झाल्यानंतर, जंगलातून लाकडं आणून आपला उदरनिर्वाह भागवणारी, आपल्या ५ मुलांचा सांभाळ करणाऱ्या मालतीचे निधन झाले.

रांची - आई-वडिलाच्या मृत्यूनंतर अनाथ बनलेल्या ५ मुलांची भेट घेऊन तीन मुलांचा शाळेत दाखला करण्याचं काम महाराष्ट्राचे सुपुत्र आणि कोडरमा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी केलंय. कोरडमा शहरातील छोटगी बागी वार्ड नंबर १ मधील एका गरीब कुटुंबातील मालती या महिलेचे निधन झाले. अगोदरच वडिलांचे निधन झाले होते. आता, आईही सोडून गेली. त्यामुळे या कुटुंबातील ५ मुलांसमोर जगण्याचा, भविष्याचा प्रश्न पडला होता. मात्र, कोडरमाचे संवेदनशील जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी तात्काळ पीडित कुटुंबाला भेट देऊन या पाचही मुलांची प्रशासनाच्या वतीने जबाबदारी घेतली. 

पाच वर्षांपूर्वीच पतीचे निधन झाल्यानंतर, जंगलातून लाकडं आणून आपला उदरनिर्वाह भागवणारी, आपल्या ५ मुलांचा सांभाळ करणाऱ्या मालतीचे निधन झाले. त्यामुळे, घरातील मोठे असलेल्या १८ वर्षीय मानिसकदृष्ट्या कमकुवत असलेला मुलगा अन् ९ वर्षीय मुलाच्या जीवनातही अंधकार निर्माण झाला होता. आईचा आधार गेल्याने एकाच कुटुंबातील ५ मुले निराधार बनले होते. याबाबत, कोडरमाचे जिल्हाधिकारी रमेश घोलप यांना माहिती मिळताच पीडित कुटुबींयाच्या घरी जाऊन ते या चिमुकल्यांचा आधार बनले. घोलप यांनी स्वत: पालक बनून कुटुंबातील तीन मुलांचा कस्तुरबा बालिका निवासी विद्यालयात प्रवेश घेतला. काजलकुमारी १५ वर्षे, सुनिता कुमारी १३ वर्षे आणि अनिता कुमारी ११ वर्षे यांना इतर शालेय साहित्य व कपडेही देऊ केले. 

निराधार बनलेल्या तीन मुलींना सनदी अधिकारी रमेश घोलप यांच्यामुळे सुरक्षेसह शिक्षणाचा आधार मिळाला आहे. घोलप यांनी तात्काळ जिल्हा प्रशासनातील काही अधिकारी व स्वताकडून पीडित कुटुंबाला १० हजार रुपयांची मदत केली. तसेच, राष्ट्रीय कौटुंबिक लाभ योजनेतून २० हजार रुपयांचा लाभही दिला. या पीडित कुटुंबातील तीन मुलांना बाल संरक्षण योजनेच्या माध्यमातून दरमहा २००० रुपये मदत मिळेल, अशी व्यवस्थाही घोलप यांनी केली आहे.  आयुष्यमान भारत योजनेंतर्गत पाचही मुलांचं उत्तम आरोग्य व वैद्यकीय मदतीसाठी गोल्डन कार्डही बनवून देण्यात आले आहे. रमेश घोलप हे अतिशय संवेदनशील अधिकारी असून यापूर्वीही त्यांच्या कार्याची, त्यांच्या ऑन द स्पॉट मदतीची प्रचिती कोडरमा जिल्ह्याने अनुभवली आहे. झारखंड राज्यातील कार्यक्षेत्रात पेन्शवाला साहब अशी त्यांची ओळख बनली आहे. घोलप यांनीही अंत्यंत प्रतिकुल परिस्थितीचा सामना करत इथपर्यंत मजल मारल आहे. त्यामुळे, पावलोपावली त्यांच्यातील माणूसकी पाहायला मिळते. घोलप यांच्या या संवेदनशीलपणामुळे मोठ्या मुलीने साहेबांचे आभार मानले. या पाचही मुलांना आशीर्वाद देत, आपल्या आई-वडिलांचं स्वप्न साकार करा, असे घोपल यांनी म्हटले. या संवेदनशील प्रकारामुळे जिल्हा प्रशासनाकडूनही कलेक्टरसाहेबांचं कौतुक होत असून वाडीतील गरिबांनाही आनंद झाला आहे.  

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJharkhandझारखंडranchi-pcरांची