शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

CoronaVirus News : पैशांसाठी काय पण! आधी कोरोना मृताचा मृतदेह स्वीकारण्यास कुटुंबीयांचा नकार अन् आता मदतीसाठी पसरले हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2021 08:46 IST

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास कोणी आलं नाही आणि आता मृतांच्या नातेवाईकांना जी मदत केली जातेय ती घेण्यासाठी एकाच व्यक्तीच्या तीन मुलांनी क्लेम केल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशामध्ये कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या तीन कोटींवर पोहोचली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल चार लाख लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. वेगाने पसरणाऱ्या कोरोनामुळे लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी कोरोनाचा धसका घेतला असून आपल्या नातेवाईकांचे मृतदेह स्वीकारण्यास नकार दिला आहे. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मृतदेह स्वीकारण्यास कोणी आलं नाही आणि आता कोरोना मृतांच्या नातेवाईकांना जी मदत केली जातेय ती घेण्यासाठी एकाच व्यक्तीच्या तीन-तीन नातेवाईकांनी त्यासाठी क्लेम केल्याची घटना समोर आली आहे.

कोरोनामुळे मृत्यू झाल्यावर रुग्णांकडे पाठ फिरवणारे नातेवाईक आता मात्र मदत मिळावी म्हणून कायदेशीर बाबी करण्याची खटपट करताना पाहायला मिळत आहेत. यामुळे प्रशासनाच्या कामकाजात अनेक समस्या निर्माण होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पारू येथील एका कुटुंबातील वृद्ध व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. उपचारासाठी कुटुंबीयांनी त्यांना एसकेएमसीएच रुग्णालयात दाखल केलं. मात्र त्यानंतर कोरोनाचा संसर्ग आपल्याला देखील होईल या भीतीने कोणीही साधं त्यांना रुग्णालयात पाहायला देखील आलं नाही किंवा त्यांच्या तब्येतीची विचारपूरसही केली नाही.

वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यानंतरही त्याचा मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईक पुढे आले नाही. पण आता कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मिळणारी मदत मागण्यासाठी मात्र कुटुंबीयामध्येच स्पर्धा निर्माण झाली आहे. वृद्धाच्या पत्नीचं देखील निधन झालं आहे. त्याला तीन मुलं आणि मुली आहेत. त्या तिघांनीही आता मृत्यूनंतर मिळणाऱ्या मदतीसाठी प्रशासनाकडे धाव घेतली आहे. पतीचा मृत्यू झाला तर पत्नीला आणि पत्नीचा मृत्यू झाला तर पतीला अशा स्वरुपाची मदत मिळते. मात्र हे दोघेही नसल्यास पुढच्या पीढीला म्हणजेच त्यांच्या मुलांना ही रक्कम मिळते. त्यामुळे मृत्यूनंतर आता मुलांनी मदतीसाठी हात पसरले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

बापरे! कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये वाढतोय ब्रेन हॅमरेजसारख्या आजारांचा धोका; रिपोर्टमधून मोठा खुलासा

कोरोनातून बऱ्या झालेल्या लोकांमध्ये ब्रेन हॅमरेजसारख्या भयंकर आजारांचा धोका वाढत असल्याची माहिती आता समोर आली आहे. त्यामुळे रुग्णांना आरोग्यविषयीच्या आणखी समस्यांचा सामना करावा लागत आहे. दिल्लीतील एका रुग्णालयाने आपल्या रिपोर्टमधून याबाबत दावा केला आहे. कोरोनातून ठीक झाल्यानंतर रुग्णांमध्ये न्यूरोल़ॉजिकल समस्यांचा अधिक घातक स्वरूपात वाढत असल्याचं दिसून येत आहे. रुग्णालयातील सीनियर न्यूरोसर्जन डॉ. आशा बक्शी यांनी 37 टक्के रुग्णांमध्ये डोकेदुखी सारखी लक्षणं दिसून येत आहेत. तर 26 टक्के रुग्णांमध्ये चव समजत नसल्याचं समोर आलं आहे. आरोग्यविषयीच्या या समस्यांमुळे रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यचे प्रमाण वाढत आहे. कोरोना व्हायरस हा फक्त फुफ्फुसाचा आजार नाही तर न्यूरोलॉजिकल समस्या देखील असल्याचं डॉक्टर बक्शी यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याBiharबिहारIndiaभारतMONEYपैसाhospitalहॉस्पिटल