शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:37 IST

चुकीच्या माहितीळा आळा घालण्यासाठी भारत सरकारने तुर्कीच्या टीआरटी वर्ल्डचे सोशल मिडिया हँडल ब्लॉक केले आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान, भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील तुर्की सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाबाबत आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत चुकीची माहिती पसरवणे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आधी भारताने चीनच्या सरकारी प्रचार वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले होते, त्यानंतर तुर्कीच्या टीआरटीवरही कारवाई केली.

टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्सवर भारताविरुद्ध दिशाभूल करणारे आणि प्रक्षोभक मजकूर पसरवण्याचा आरोप आहे. या पाकिस्तान समर्थक देशांच्या न्यूज पोर्टल्सना त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित खोट्या बातम्या पसरवताना आढळले आहे, यामुळे यावर कारवाई केली आहे. 

मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार

भारत सरकारविरोधात प्रचार

भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'ला आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि प्रमुख वापरकर्त्यांसह ८,००० हून अधिक खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले. ही खाती चुकीची माहिती पसरवत होती जी राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सामाजिक सौहार्दासाठी हानिकारक होती. टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्समधील अकाउंट्स या कारवाईचा भाग आहेत, असे सरकारचे मत आहे.

ग्लोबल टाईम्स आणि इतर काही खात्यांवर पाकिस्तान समर्थक प्रचाराचा प्रचार केल्याचा आरोप आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात चुकीच्या माहितीचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. तुर्कीयेचे टीआरटी वर्ल्डवर भारतविरोधी कव्हरेजचाही आरोप आहे. प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी आणि परकीय प्रचार रोखण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. 

तुर्की पाकिस्तानचा समर्थक 

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील तणाव वाढला. ऑपरेशन सिंदूर ७-८ मे २०२५ च्या रात्री सुरू झाले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी ही कारवाई झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. 

भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनांच्या तळांचा समावेश होता. भारताने केलेल्या कारवाईचा तुर्कीने निषेध करत पाकिस्तानला पाठिंबा दिला.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनOperation Sindoorऑपरेशन सिंदूर