शहरं
Join us  
Trending Stories
1
"आईला कदाचित फाशीची शिक्षा देतील, पण लक्षात ठेवा..."; शेख हसीना यांच्या मुलाचा गंभीर इशारा
2
Lalu Yadav: राजदच्या पराभवानंतर लालू यांच्या घरात फूट; मुलींनी सोडले घर, तेजस्वी यादव यांच्यावर आरोप
3
पत्नीच्या नावे पोस्टाच्या ‘या’ स्कीममध्ये उघडा खातं; दर महिन्याला ₹९२५० चं मिळेल व्याज
4
Accident: राज्यात नऊ महिन्यांत ११ हजार ५३२ मृत्यू; मुंबईत सर्वाधिक अपघात, 'हे' ठिकाण अत्यंत धोकादायक!
5
पालघर साधू हत्याकांडात ज्यांच्यावर गंभीर आरोप केले, त्यांनाच भाजपाने दिला पक्षात प्रवेश
6
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
7
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
8
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
9
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
10
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
11
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
12
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
13
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
14
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
15
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
16
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
17
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
18
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
19
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
20
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
Daily Top 2Weekly Top 5

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:37 IST

चुकीच्या माहितीळा आळा घालण्यासाठी भारत सरकारने तुर्कीच्या टीआरटी वर्ल्डचे सोशल मिडिया हँडल ब्लॉक केले आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान, भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील तुर्की सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाबाबत आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत चुकीची माहिती पसरवणे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आधी भारताने चीनच्या सरकारी प्रचार वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले होते, त्यानंतर तुर्कीच्या टीआरटीवरही कारवाई केली.

टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्सवर भारताविरुद्ध दिशाभूल करणारे आणि प्रक्षोभक मजकूर पसरवण्याचा आरोप आहे. या पाकिस्तान समर्थक देशांच्या न्यूज पोर्टल्सना त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित खोट्या बातम्या पसरवताना आढळले आहे, यामुळे यावर कारवाई केली आहे. 

मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार

भारत सरकारविरोधात प्रचार

भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'ला आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि प्रमुख वापरकर्त्यांसह ८,००० हून अधिक खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले. ही खाती चुकीची माहिती पसरवत होती जी राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सामाजिक सौहार्दासाठी हानिकारक होती. टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्समधील अकाउंट्स या कारवाईचा भाग आहेत, असे सरकारचे मत आहे.

ग्लोबल टाईम्स आणि इतर काही खात्यांवर पाकिस्तान समर्थक प्रचाराचा प्रचार केल्याचा आरोप आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात चुकीच्या माहितीचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. तुर्कीयेचे टीआरटी वर्ल्डवर भारतविरोधी कव्हरेजचाही आरोप आहे. प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी आणि परकीय प्रचार रोखण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. 

तुर्की पाकिस्तानचा समर्थक 

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील तणाव वाढला. ऑपरेशन सिंदूर ७-८ मे २०२५ च्या रात्री सुरू झाले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी ही कारवाई झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. 

भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनांच्या तळांचा समावेश होता. भारताने केलेल्या कारवाईचा तुर्कीने निषेध करत पाकिस्तानला पाठिंबा दिला.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनOperation Sindoorऑपरेशन सिंदूर