शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग वापरकर्त्यांना नवीन वर्षात मोठे गिफ्ट! १ फेब्रुवारीपासून 'KYV' ची कटकट संपणार; NHAI चा मोठा निर्णय
2
एक चूक आणि बँक अकाउंट रिकामं! सायबर फसवणूक करणाऱ्यांच्या ५ पद्धती जाणून घ्या अन् काळजी घ्या
3
नैनीतालमध्ये गर्लफ्रेंडसोबत फिरत होता नवरा, अचानक समोर आली बायको; मग जे झालं...
4
१ फेब्रुवारी २०२६ पासून सिगरेट महागणार, कोणत्या Cigarette ची किती वाढणार किंमत?
5
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
6
Indian Bank मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२२,४२० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीमचे डिटेल्स
7
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
8
एअर इंडियाच्या पायलटचा कॅनडात 'हायव्होल्टेज' ड्रामा; उड्डाणापूर्वीच झिंगला, मग जे घडलं ते धक्कादायक!
9
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
10
कर महसुलात महाराष्ट्रच ‘किंग’; देशाच्या एकूण तिजोरीत २२% वाटा एकट्या महाराष्ट्राचा
11
‘फॅमिली फर्स्ट’! शिंदेसेनेच्या मुंबईतील उमेदवारांत नेत्यांच्या नातेवाईकांचाच भरणा; माजी आमदार चक्क नगरसेवक पदासाठी रिंगणात 
12
कर्जाच्या जाळ्यात अडकली तरुणाई, विना गॅरंटी कर्जाची थकबाकी वाढतेय; बँकांवर ताण - आरबीआय
13
फडणवीस-शिंदे यांचा उद्या मुंबईत संयुक्त मेळावा, मुंबई महापालिका निवडणूक प्रचाराचा नारळ फुटणार
14
ग्रंथदिंडीतून साहित्याचा जागर; तब्बल ५६ चित्ररथांच्या दोन किलोमीटर ग्रंथदिंडीने फेडले डोळ्याचे पारणे
15
आजचे राशीभविष्य २ जानेवारी २०२६ : नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी आजचा मुहूर्त उत्तम
16
महापालिका निवडणूक : मिशन 'थंड'खोरी! आमचे काय चुकले..? निष्ठावंतांचा सवाल
17
बंडोबांना थंड करून बिनविरोध निवडीचा नवा फंडा; मांडवली, पदांचे आमिष नाहीतर...; काही बंडखोर अज्ञात स्थळी रवाना 
18
‘मी कुठे चुकले, प्रश्न विचारण्याचा मला हक्क’; भाजपच्या इच्छुक उमेदवाराचा घरचा आहेर
19
‘शिंदेसेनेचे उमेदवार बिनविरोध यावे म्हणून विरोधकांचे उमेदवारी अर्ज करताहेत बाद’
20
मला मराठीचा आदर, मुंबईचा महापौर मराठीच होणार; भाजपनेते कृपाशंकर सिंह यांनी अखेर नमते घेतले
Daily Top 2Weekly Top 5

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:37 IST

चुकीच्या माहितीळा आळा घालण्यासाठी भारत सरकारने तुर्कीच्या टीआरटी वर्ल्डचे सोशल मिडिया हँडल ब्लॉक केले आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान, भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील तुर्की सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाबाबत आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत चुकीची माहिती पसरवणे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आधी भारताने चीनच्या सरकारी प्रचार वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले होते, त्यानंतर तुर्कीच्या टीआरटीवरही कारवाई केली.

टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्सवर भारताविरुद्ध दिशाभूल करणारे आणि प्रक्षोभक मजकूर पसरवण्याचा आरोप आहे. या पाकिस्तान समर्थक देशांच्या न्यूज पोर्टल्सना त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित खोट्या बातम्या पसरवताना आढळले आहे, यामुळे यावर कारवाई केली आहे. 

मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार

भारत सरकारविरोधात प्रचार

भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'ला आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि प्रमुख वापरकर्त्यांसह ८,००० हून अधिक खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले. ही खाती चुकीची माहिती पसरवत होती जी राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सामाजिक सौहार्दासाठी हानिकारक होती. टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्समधील अकाउंट्स या कारवाईचा भाग आहेत, असे सरकारचे मत आहे.

ग्लोबल टाईम्स आणि इतर काही खात्यांवर पाकिस्तान समर्थक प्रचाराचा प्रचार केल्याचा आरोप आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात चुकीच्या माहितीचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. तुर्कीयेचे टीआरटी वर्ल्डवर भारतविरोधी कव्हरेजचाही आरोप आहे. प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी आणि परकीय प्रचार रोखण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. 

तुर्की पाकिस्तानचा समर्थक 

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील तणाव वाढला. ऑपरेशन सिंदूर ७-८ मे २०२५ च्या रात्री सुरू झाले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी ही कारवाई झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. 

भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनांच्या तळांचा समावेश होता. भारताने केलेल्या कारवाईचा तुर्कीने निषेध करत पाकिस्तानला पाठिंबा दिला.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनOperation Sindoorऑपरेशन सिंदूर