शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:37 IST

चुकीच्या माहितीळा आळा घालण्यासाठी भारत सरकारने तुर्कीच्या टीआरटी वर्ल्डचे सोशल मिडिया हँडल ब्लॉक केले आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान, भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील तुर्की सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाबाबत आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत चुकीची माहिती पसरवणे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आधी भारताने चीनच्या सरकारी प्रचार वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले होते, त्यानंतर तुर्कीच्या टीआरटीवरही कारवाई केली.

टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्सवर भारताविरुद्ध दिशाभूल करणारे आणि प्रक्षोभक मजकूर पसरवण्याचा आरोप आहे. या पाकिस्तान समर्थक देशांच्या न्यूज पोर्टल्सना त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित खोट्या बातम्या पसरवताना आढळले आहे, यामुळे यावर कारवाई केली आहे. 

मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार

भारत सरकारविरोधात प्रचार

भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'ला आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि प्रमुख वापरकर्त्यांसह ८,००० हून अधिक खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले. ही खाती चुकीची माहिती पसरवत होती जी राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सामाजिक सौहार्दासाठी हानिकारक होती. टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्समधील अकाउंट्स या कारवाईचा भाग आहेत, असे सरकारचे मत आहे.

ग्लोबल टाईम्स आणि इतर काही खात्यांवर पाकिस्तान समर्थक प्रचाराचा प्रचार केल्याचा आरोप आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात चुकीच्या माहितीचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. तुर्कीयेचे टीआरटी वर्ल्डवर भारतविरोधी कव्हरेजचाही आरोप आहे. प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी आणि परकीय प्रचार रोखण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. 

तुर्की पाकिस्तानचा समर्थक 

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील तणाव वाढला. ऑपरेशन सिंदूर ७-८ मे २०२५ च्या रात्री सुरू झाले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी ही कारवाई झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. 

भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनांच्या तळांचा समावेश होता. भारताने केलेल्या कारवाईचा तुर्कीने निषेध करत पाकिस्तानला पाठिंबा दिला.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनOperation Sindoorऑपरेशन सिंदूर