शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; पित्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
"अरुणाचल प्रदेश आमचा होता, आहे आणि राहणार", चीनच्या 'त्या' नापाक कृत्यावर भारताने ठणकावले!
4
संतापलेले भारतीय तुर्कस्तान, अझरबैजानचा 'मालदीव' करणार; पाकिस्तानला मदत करणारे इन्कम गमावून बसणार
5
युक्रेन सोडा, आता 'या' देशावर कब्जा करण्याचा पुतिन यांचा प्लॅन; सॅटेलाईट इमेजनं सीक्रेट उघडलं
6
मुंबईच्या नालेसफाईची पोलखोल, मनसेने कार्यकर्ते साकिनाक्यातील नाल्यात उतरुन व्हॉलीबॉल खेळले!
7
'बिग बॉस' हिंदी नंतर रिजेक्शचाच सामना करावा लागला, निक्की तांबोळी म्हणाली, "त्यानंतर मी..."
8
Guru Gochar 2025: गुरु गोचरमुळे आठ वर्षात बदलणार जगाचा चेहरा मोहरा, व्हायरसचीही भीती!
9
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
10
७६६ कोटी रुपयांची कमाई तरीही रेमंडचे शेअर्स ६६% आपटले; काय आहे कारण?
11
सॅल्यूट! अ‍ॅसिड हल्ल्याने गेली दृष्टी, मानली नाही हार; बारावीत मिळवले ९५%, IAS होण्याचं स्वप्न
12
"तुम्हा सर्वांना सलाम..."; तेजस्वी यादव यांचा शहीद जवान रामबाबू सिंह यांच्या भावाला Video कॉल
13
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
14
अबब! तब्बल ४ लाखांची पोपटाची पर्स घेऊन 'कान्स फिल्म फेस्टिव्हल'मध्ये पोहोचली उर्वशी रौतेला, सर्वजण पाहतच राहिले
15
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
16
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
17
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
18
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
19
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
20
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...

चीननंतर आता भारताची तुर्कीवर मोठी कारवाई; टीआरटी वर्ल्डच्या सोशल मिडिया हँडलबाबत मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2025 13:37 IST

चुकीच्या माहितीळा आळा घालण्यासाठी भारत सरकारने तुर्कीच्या टीआरटी वर्ल्डचे सोशल मिडिया हँडल ब्लॉक केले आहे.

भारत-पाकिस्तानमधील तणावादरम्यान, भारत सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. भारतातील तुर्की सरकारी टीव्ही चॅनेल टीआरटी वर्ल्डचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले. भारत आणि पाकिस्तानमधील सुरू असलेल्या तणावाबाबत आणि प्रादेशिक सुरक्षेबाबत चुकीची माहिती पसरवणे थांबवण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे. आधी भारताने चीनच्या सरकारी प्रचार वृत्तपत्र ग्लोबल टाईम्सचे सोशल मीडिया हँडल ब्लॉक केले होते, त्यानंतर तुर्कीच्या टीआरटीवरही कारवाई केली.

टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्सवर भारताविरुद्ध दिशाभूल करणारे आणि प्रक्षोभक मजकूर पसरवण्याचा आरोप आहे. या पाकिस्तान समर्थक देशांच्या न्यूज पोर्टल्सना त्यांच्या सोशल मीडिया हँडलद्वारे भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'शी संबंधित खोट्या बातम्या पसरवताना आढळले आहे, यामुळे यावर कारवाई केली आहे. 

मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार

भारत सरकारविरोधात प्रचार

भारत सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स'ला आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था आणि प्रमुख वापरकर्त्यांसह ८,००० हून अधिक खाती ब्लॉक करण्याचे आदेश दिले. ही खाती चुकीची माहिती पसरवत होती जी राष्ट्रीय सुरक्षा, परराष्ट्र संबंध आणि सामाजिक सौहार्दासाठी हानिकारक होती. टीआरटी वर्ल्ड आणि ग्लोबल टाईम्समधील अकाउंट्स या कारवाईचा भाग आहेत, असे सरकारचे मत आहे.

ग्लोबल टाईम्स आणि इतर काही खात्यांवर पाकिस्तान समर्थक प्रचाराचा प्रचार केल्याचा आरोप आहे. भारत-पाकिस्तान तणावाच्या काळात चुकीच्या माहितीचा प्रसार झपाट्याने वाढला आहे. तुर्कीयेचे टीआरटी वर्ल्डवर भारतविरोधी कव्हरेजचाही आरोप आहे. प्रादेशिक स्थिरता राखण्यासाठी आणि परकीय प्रचार रोखण्यासाठी भारताने हे पाऊल उचलले आहे. 

तुर्की पाकिस्तानचा समर्थक 

'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान तुर्कीने उघडपणे पाकिस्तानला पाठिंबा दिला. यामुळे भारत आणि तुर्की यांच्यातील तणाव वाढला. ऑपरेशन सिंदूर ७-८ मे २०२५ च्या रात्री सुरू झाले. पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांवर हल्ला करण्यासाठी ही कारवाई झाली. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटकांचा मृत्यू झाला. 

भारतीय सशस्त्र दलांनी ऑपरेशन सिंदूर अंतर्गत नऊ दहशतवादी अड्डे उद्ध्वस्त केले, यामध्ये जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबा सारख्या संघटनांच्या तळांचा समावेश होता. भारताने केलेल्या कारवाईचा तुर्कीने निषेध करत पाकिस्तानला पाठिंबा दिला.

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तानchinaचीनOperation Sindoorऑपरेशन सिंदूर