लग्नाच्या ३ महिन्यांनंतर पत्नीच्या घरी वरात घेऊन पोहोचला नवरा, पाहताच सासरेबुवा संतापले! नेमकं काय झालं? वाचाच...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 11:24 IST2025-06-04T11:23:45+5:302025-06-04T11:24:34+5:30
लग्नाची वरात घेऊन पत्नीच्या घरी आलेल्या वराला रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो.

लग्नाच्या ३ महिन्यांनंतर पत्नीच्या घरी वरात घेऊन पोहोचला नवरा, पाहताच सासरेबुवा संतापले! नेमकं काय झालं? वाचाच...
उत्तर प्रदेशातील मिर्झापूर जिल्ह्यात एक विचित्र घटना घडली आहे, जी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. हलिया पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनगढा गावात लग्नाची वरात घेऊन पत्नीच्या घरी आलेल्या वराला रिकाम्या हाताने परत जावे लागले आहे. यामागचे कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसू शकतो.
तीन महिन्यांपूर्वी झाले होते लग्न
मार्च महिन्यात मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजनेअंतर्गत दोघांचे विवाह सोहळा पार पडला होता. परंतु, त्या वेळी काही पारंपरिक विधी बाकी राहिल्याने वर पक्षाने सोमवारी (३ जून) पुन्हा थाटामाटात लग्नाचा कार्यक्रम ठेवला होता. वर वरात घेऊन वधूच्या घरी पोहोचला खरा, पण तेथून त्याला वधूशिवायच घरी परतावे लागले.
कशामुळे झाला वाद?
वराने वधूसाठी आवश्यक कपडे, दागिने आणि मेकअपचे सामान आणले नव्हते, हेच या वादाला कारणीभूत ठरले. वधूच्या वडिलांनी आणि संपूर्ण कुटुंबियांनी याचा तीव्र निषेध केला. तर, वधूनेदेखील लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे सासरच्यांनी वरात आल्या पावली परत पाठवली. या दरम्यान काही काळ गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र, वधूचा निर्णय अंतिम ठरला.
पोलीस काय म्हणाले?
या घटनेबाबत हलिया पोलीस स्टेशनचे एसएचओ वीरेंद्र सिंह म्हणाले की, त्यांना याबाबत कोणतीही तक्रार प्राप्त झालेली नाही. तक्रार नोंद झाल्यास योग्य ती कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
संपूर्ण परिसरात चर्चेचा विषय
या अनोख्या घटनेने स्थानिक परिसरात चांगलीच खळबळ उडवली आहे. लग्न झाल्यानंतर पुन्हा एकदा विधी करण्याचा प्रयत्न, आणि त्यात वधूचा स्पष्ट नकार – ही संपूर्ण कथा आता सामाजिक चर्चेचा विषय बनली आहे.