शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
4
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
5
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
6
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
7
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
8
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
9
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
10
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
11
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
12
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
13
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
14
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
15
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
16
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
17
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
18
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
19
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
20
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स

मोदींच्या करिष्म्यासोबतच 'या' खास रणनीतीने भाजपाला उत्तर प्रदेशात मिळवून दिले बंपर यश 

By बाळकृष्ण परब | Updated: May 26, 2019 10:02 IST

 नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला.

- बाळकृष्ण परबनवी दिल्ली -  नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. अगदी 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला. ती रणनीती म्हणजे मिशन 50 टक्के+. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्यासाठी आखलेली खास योजना. उत्तर प्रदेशात सपा-बसपा महाआघाडी झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या मतांची गोळाबेरीज करून भाजपाच्या पराभवाचे गणित मांडले जात होते. साधारण वर्षभरापूर्वीपासून येत असलेल्या विविध ओपिनियन पोलमधूनही तेच चित्र दिसत होते. त्यामुळे मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांचे व्यापक ऐक्य करून मतांचे गणित साधण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर तोडगा म्हणून आपला मतदार वाढवून 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याची रणनीती आखली गेली.विशेषत: उत्तर प्रदेशात महाआघाडीच्या मतांच्या गोळाबेरीजेवर मात करण्यासाठी भाजपाने प्रत्येक मतदारसंघात 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याच्या मोहिमेवर काम सुरू केले. त्यासाठी बुथप्रमुख आणि पन्नाप्रमुख अशा अगदी छोट्या पातळीवर नियोजन केले गेले. त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी सुमारे सहा ते सात टक्क्यांनी वाढली. त्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशात भाजपाला 62 जागा जिंकता आल्या. तर महाआघाडीच्या मतांची गोळाबेरीज करून भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांना जबर धक्का बसला. अगदी सपा, बसपा, रालोदसोबत काँग्रेसही आली असती तरी भाजपाला फारसे नुकसान झाले नसते.  मतदारसंघनिहाय विचार केल्यास उत्तर प्रदेशातील सुमारे 40 च्या आसपास मतदारसंघात भाजपाला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. तर पाच ते सहा मतदारसंघात भाजपाची मतांची टक्केवारी 49 ते 50 टक्क्यांच्यादरम्यान राहिली. उत्तर प्रदेशच नाही तर देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपाची मतांची टक्केवारी 50 टक्क्यांहून अधिक राहिली. त्या राज्यांमध्ये गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमध्ये भाजपाने 50 टक्के मतांचा टप्पा ओलांडला. तसेच भाजपाच्या निवडून आलेल्या 303 खासदारांपेकी 170 हून अधिक खासदारांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. भाजपाची ही मतांची वाढती टक्केवारी विरोधी पक्षांसाठी चिंतेची बाब आहे. कारण ही टक्केवारी कायम राखल्यास सर्वपक्षीय ऐक्यानंतरही भाजपाला पराभूत करणे विरोधी पक्षांना कठीण होणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाyogi adityanathयोगी आदित्यनाथ