शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
2
‘भाजपा ४०० जागा कदाचित चंद्रावर जिंकेल, भारतात मात्र…’ आदित्य ठाकरेंचा खोचक टोला 
3
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
4
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
5
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
6
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
7
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
8
Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा
9
दरमहा लाखोंची कमाई; तरीही महिन्याच्या शेवटी खर्चाला पैसे उरत नाही? आर्थिक तज्ञांनी सांगितलं खरं कारण
10
घर घ्यायचंय? फ्लॅट घेताना स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशनचा खर्च किती येतो? कुठे होईल पैशांची बचत
11
लिव्ह-इन पार्टनरच्या सांगण्यावरून रुग्णालयातून बाळ चोरलं, पण परत येताना रस्ताच विसरली! आणखी एक चूक केली अन्...
12
"रोहित आर्यने जो मार्ग स्वीकारला तो चुकीचा, पण..." काँग्रेसचे उपस्थित केले गंभीर प्रश्न
13
"मी मालिकेत येईन पण...", शिल्पा शिंदे 'भाभीजी घर पर है'मध्ये कमबॅक करणार? दिली प्रतिक्रिया
14
World Cup 2025 FINAL: टीम इंडियाला नडू शकते आफ्रिकन कर्णधार लॉरा वोल्वार्ड, जाणून घ्या रेकॉर्ड
15
भयानक! 'तो' वाद टोकाला गेला! बायकोने फेसबुक वापरल्याने नवरा संतापला, थेट जीवच घेतला
16
५ वर्षांसाठी ₹१० लाखांचं कार लोन घेतल्यास कोणत्या बँकेत किती पडेल EMI? पाहा संपूर्ण गणित
17
७-८ नव्हे तर 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमा बनवण्यासाठी लागले तब्बल 'इतके' कोटी; महेश मांजरेकर म्हणाले- "बजेट वाढलं कारण..."
18
पृथ्वीच्या 'महाविनाशा'चा धोका टळला? शास्त्रज्ञांचा नवीन अभ्यास समोर आला...
19
सोने महागले! मागणी १६% ने घटली; लोक आता ज्वेलरीपेक्षा 'या' फॉर्ममध्ये करतायेत मोठी गुंतवणूक
20
जेमिमा रॉड्रीग्ज, गौतम गंभीर अन् माखलेली जर्सी... १४ वर्षांपूर्वीचा भारताचा 'विजयी' योगायोग

मोदींच्या करिष्म्यासोबतच 'या' खास रणनीतीने भाजपाला उत्तर प्रदेशात मिळवून दिले बंपर यश 

By बाळकृष्ण परब | Updated: May 26, 2019 10:02 IST

 नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला.

- बाळकृष्ण परबनवी दिल्ली -  नुकत्याच आटोपलेल्या लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला. अगदी 2014 पेक्षाही वरचढ कामगिरी करताना भाजपाने तीनशेपार मजल मारली. भाजपाच्या या यशामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिष्म्याबरोबरच एका खास रणनीतीचाही वाटा मोलाचा ठरला. ती रणनीती म्हणजे मिशन 50 टक्के+. म्हणजेच प्रत्येक ठिकाणी 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्यासाठी आखलेली खास योजना. उत्तर प्रदेशात सपा-बसपा महाआघाडी झाल्यानंतर दोन्ही पक्षांच्या मतांची गोळाबेरीज करून भाजपाच्या पराभवाचे गणित मांडले जात होते. साधारण वर्षभरापूर्वीपासून येत असलेल्या विविध ओपिनियन पोलमधूनही तेच चित्र दिसत होते. त्यामुळे मोदी आणि भाजपाला पराभूत करण्यासाठी विरोधकांचे व्यापक ऐक्य करून मतांचे गणित साधण्याची चर्चा सुरू झाली होती. त्यावर तोडगा म्हणून आपला मतदार वाढवून 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याची रणनीती आखली गेली.विशेषत: उत्तर प्रदेशात महाआघाडीच्या मतांच्या गोळाबेरीजेवर मात करण्यासाठी भाजपाने प्रत्येक मतदारसंघात 50 टक्क्यांहून अधिक मते मिळवण्याच्या मोहिमेवर काम सुरू केले. त्यासाठी बुथप्रमुख आणि पन्नाप्रमुख अशा अगदी छोट्या पातळीवर नियोजन केले गेले. त्याचा परिणाम म्हणून या निवडणुकीत भाजपाच्या मतांची टक्केवारी सुमारे सहा ते सात टक्क्यांनी वाढली. त्याचा परिणाम म्हणून उत्तर प्रदेशात भाजपाला 62 जागा जिंकता आल्या. तर महाआघाडीच्या मतांची गोळाबेरीज करून भाजपाला धक्का देण्याच्या तयारीत असलेल्या मायावती आणि अखिलेश यादव यांना जबर धक्का बसला. अगदी सपा, बसपा, रालोदसोबत काँग्रेसही आली असती तरी भाजपाला फारसे नुकसान झाले नसते.  मतदारसंघनिहाय विचार केल्यास उत्तर प्रदेशातील सुमारे 40 च्या आसपास मतदारसंघात भाजपाला 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. तर पाच ते सहा मतदारसंघात भाजपाची मतांची टक्केवारी 49 ते 50 टक्क्यांच्यादरम्यान राहिली. उत्तर प्रदेशच नाही तर देशातील बहुतांश राज्यांमध्ये भाजपाची मतांची टक्केवारी 50 टक्क्यांहून अधिक राहिली. त्या राज्यांमध्ये गुजरात, राजस्थान, दिल्ली, हरियाणा, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश, कर्नाटक, छत्तीसगड या मोठ्या राज्यांमध्ये भाजपाने 50 टक्के मतांचा टप्पा ओलांडला. तसेच भाजपाच्या निवडून आलेल्या 303 खासदारांपेकी 170 हून अधिक खासदारांना 50 टक्क्यांहून अधिक मते मिळाली. भाजपाची ही मतांची वाढती टक्केवारी विरोधी पक्षांसाठी चिंतेची बाब आहे. कारण ही टक्केवारी कायम राखल्यास सर्वपक्षीय ऐक्यानंतरही भाजपाला पराभूत करणे विरोधी पक्षांना कठीण होणार आहे.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालUttar Pradesh Lok Sabha Election 2019उत्तरप्रदेश लोकसभा निवडणूक निकाल 2019BJPभाजपाNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शहाyogi adityanathयोगी आदित्यनाथ