शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

राजीव गांधी यांच्या हत्येला भाजपा जबाबदार? काँग्रेसने केला पलटवार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 11:44 IST

दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरुन काँग्रेस-भाजपामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधीवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे.

नवी दिल्ली - दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरुन काँग्रेस-भाजपामध्ये राजकीय वातावरण तापू लागलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधीवर केलेल्या टीकेनंतर काँग्रेसकडून भाजपाला प्रत्युत्तर देण्यात आलेलं आहे. काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी राजीव गांधी यांच्या हत्येला भाजपा जबाबदार असल्याचं विधान करत भाजपावर जोरदार पलटवार केला आहे. तत्कालीन सरकारने राजीव गांधी यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यास नकार दिला होता त्या सरकारला भाजपाने पाठिंबा दिल्याची आठवण अहमद पटेल यांनी केली आहे. 

राजीव गांधी यांची हत्या झाली त्यावेळी केंद्रात डीएमके सरकार होतं. त्या सरकारला भाजपाने पाठिंबा दिला होता. त्यामुळे काँग्रेसने थेट राजीव गांधी यांच्या हत्येसाठी भाजपाला जबाबदार धरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांचे आयुष्य भ्रष्टाचारी नंबर 1 म्हणून संपलं अशी टीका जाहीर सभेत केली होती त्यानंतर काँग्रेस आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु झाल्या. 

काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, शहीद पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावर टीका करणं म्हणजे हे भाजपा कमकुवत झाल्याचं लक्षण आहे. मात्र त्यांच्या हत्येला जबाबदार कोण? भाजपा समर्थित वी.पी.सिंह सरकार त्यावेळी सत्तेत होतं. राजीव गांधी यांच्या जीवाला धोका असूनही त्या सरकारने त्यांना अतिरिक्त सुरक्षा देण्यास नकार दिला होता. गुप्तचर खात्याने राजीव गांधी यांच्या सुरक्षेला धोका असल्याची माहिती सरकारला दिली होती पण त्याकडे दुर्लक्ष केले गेले. आज राजीव गांधी त्यांच्या तिरस्कारामुळे हयात नाही आणि त्यांच्या टीकेला उत्तर देण्यासाठी ते आपल्यामध्ये नाही म्हणून त्यांच्यावर आरोप लावले जात आहेत असा आरोप अहमद पटेल यांनी केला. 

बुधवारीही रामलीला मैदानावर भाषण करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर पुन्हा एकदा निशाणा साधला. यामध्ये बोलताना मोदी यांनी राजीव गांधी यांना पुन्हा लक्ष्य केले. जे लोक आज सांगत आहेत की, सेना कोणाची जहागीर नाही त्याच कुटुंबीयांनी आयएनएस विराट या युद्धनौकेचा वापर खाजगी सुट्ट्यांसाठी केला होता असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला होता. आयएनएस विराटला सागरी सीमांच्या रक्षणासाठी तैनात केले गेले आहे. राजीव गांधी आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या सुट्यांसाठी एका बेटावर घेऊन जाण्यासाठी विराटला पाठवले गेले होते. एवढे काय त्यांच्या सासरवाडीचेही लोक आयएनएस विराटवर होते. हा प्रकार राष्ट्रीय सुरक्षेशी तडजोड करणारा नव्हता का? असा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थित केला होता.  

टॅग्स :Rajiv Gandhiराजीव गांधीAhmed Patelअहमद पटेलNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक