Farmers Protest: “आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2021 09:39 AM2021-10-04T09:39:38+5:302021-10-04T09:45:31+5:30

विरोधकांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

aap sanjay singh criticised centre modi govt over farmers protest | Farmers Protest: “आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक

Farmers Protest: “आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी?”; लखीमपूर घटनेवरून विरोधक आक्रमक

googlenewsNext
ठळक मुद्देसत्तेची अशी नशा, धुंदी आजपर्यंत कुणी पाहिली नसेलआणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजीआंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले

नवी दिल्ली: वादग्रस्त केंद्रीय कृषी कायद्यांविरोधात गेल्या १० महिन्यांपासून शेतकऱ्यांचे दिल्लीतील सीमांवर आंदोलन सुरू आहे. केंद्रातील मोदी सरकार आणि आंदोलक शेतकरी नेते आपापल्या भूमिकांवर ठाम असल्यामुळे अद्याप यावर तोडगा निघालेला नाही. अलीकडेच शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदला उत्तरेतील राज्यांत सकारात्मक प्रतिसाद मिळाला. यानंतर आता उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खिरी जिल्ह्यात शेतकरी आंदोलनात वाहन शिरल्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे, तर काही शेतकरी जखमी झाले आहेत. यावरून विरोधकांनी उत्तर प्रदेशातील योगी सरकार आणि केंद्रातील मोदी सरकारवर निशाणा साधला असून, आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी, अशी विचारणा केली आहे. (aap sanjay singh criticised centre modi govt over farmers protest)

उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य आणि गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी यांच्याविरोधात लखीमपूर खिरी जिल्ह्यात काही शेतकऱ्यांनी आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात एक कार घुसली आणि यामध्ये दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला, तर आठ शेतकरी जखमी झाले. दुसरीकडे भारतीय किसान युनियन यांनी दावा केला आहे की, या दुर्घटनेत ३ शेतकरी मारले गेले आहेत. शेतकरी आंदोलनानंतर परतत असताना त्यांच्यावर वाहनाने हल्ला करण्यात आला, असा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. 

आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी

या प्रकारानंतर आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी केंद्रातील मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. सत्तेची अशी नशा, धुंदी आजपर्यंत कुणी पाहिली नसेल किंवा ऐकीवात नसेल. आंदोलक शेतकऱ्यांवर मंत्र्याच्या मुलाने कार चढवली. यामध्ये तीन आंदोलक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. आणखी किती शेतकऱ्यांचे जीव घेणार आहात PM मोदीजी. गुन्हेगारांना अटक करून सीबीआयच्या माध्यमातून चौकशी करण्यात यावी. कुटुंबांना नुकसानभरपाई द्या, अशी मागणी सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 

दरम्यान, आंदोलन थोपवता आले नाही, म्हणून आता शेतकऱ्यांनाच चिरडून टाकले. या नरसंहारावर जी लोक मूग गिळून गप्प बसलीत, त्यांनी या कालचक्राचा फेरा कायम स्मरणात ठेवावा, त्यांनाही अशाच प्रकारे एक दिवस निशाण्यावर घेतले जाईल. या प्रकरणाला सरळपणे पंतप्रधान मोदी आणि उत्तर प्रदेशचे गृह राज्यमंत्री अजय मिश्र टोनी जबाबदार आहेत, या शब्दांत युथ काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रीनिवास बी. वी. यांनी हल्लाबोल केला. 
 

Web Title: aap sanjay singh criticised centre modi govt over farmers protest

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.