शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी तेव्हा त्याच रूममध्ये होतो..."; ट्रम्प यांच्या युद्धविरामासंदर्भातील दाव्यावर एस जयशंकर यांची अमेरिकेतून पहिली प्रतिक्रिया
2
मोहम्मद शमीला हायकोर्टाचा झटका, पत्नी-मुलीला दर महिन्याला द्यावे लागणार लाखो रुपये; सात वर्षांचं कर्जही...! 
3
धक्कादायक...! धावत्या ट्रेनमध्ये टीसीला कपडे फाडून मारहाण! एलटीटी-हटिया एक्सप्रेसमधील घटना
4
“मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करायची ताकद कुणाच्या बापात नाही”; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
5
शशी थरूर भाजपमध्ये प्रवेश करणार? निशिकांत दुबे यांचा मोठा खुलासा, स्पष्टच बोलले
6
डोंबिवलीचे आमदार झाले भाजपाचे नवे प्रदेशाध्यक्ष! कल्याण डोंबिवलीत यंदा महापौर कोणाचा?
7
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
8
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
9
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
10
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
11
तो टीम इंडियाचा प्रॉब्लेम!; दुसऱ्या टेस्टआधी बेन स्टोक्सनं पंतसंदर्भातही केलं मोठं वक्तव्य
12
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
13
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
14
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
15
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
16
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
17
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
18
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
19
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
20
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी

‘आप’ची बंडाळी न्यायालयात

By admin | Updated: March 29, 2015 01:31 IST

आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घटनाबाह्ण आणि अवैध असल्याचे बंडखोर रेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक घटनाबाह्ण आणि अवैध असल्याचे बंडखोर रेते योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण यांनी म्हटले आहे. आपल्या निष्कासनाविरुद्ध न्यायालयात धाव घेण्याची शक्यता या नेत्यांनी फेटाळून लावली नाही. ‘आम्ही न्यायालय किंवा निवडणूक आयोगाकडे धाव घेऊ शकतो किंवा राष्ट्रीय कायरकारिणीची दुसरी बैठकही बोलावू शकतो, हे खरे आहे. सर्व पर्याय खुले आहेत,’ असे भूषण यांनी पत्रकारांना सांगितले.राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीनंतर यादव यांनी रामदास यांचे पक्ष नेतृत्वाला लिहिलेले पत्र सार्वजिनक केले. ‘संघर्ष टाळण्यासाठी बैठकीला उपस्थित राहू नका’, असा सल्ला रामदास यांना ‘आप’कडून देण्यात आला होता. त्याबाबत रामदास यांनी या पत्रात पक्षाकडे विचारणा केली आहे. राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक सुरू असताना केजरीवाल आणि बंडखोर नेत्यांचे पक्षाचे शेकडो कार्यकर्ते चॅलिस्टा रिसॉर्टबाहेर जमले होते आणि ते परस्परांविरुद्ध घोषणा देत होते. यादव आणि भूषण यांच्या हकालपट्टीचे वृत्त बैठकीबाहेर येताच केजरीवाल समर्थकांनी जल्लोष केला. (प्रतिनिधी)मेधा पाटकर यांची सोडचिठ्ठीआम आदमी पार्टीच्या उभारणीत महत्त्वाची जबाबदारी सांभाळणारे प्रशांत भूषण आणि योगेंद्र यादव यांच्या हकालपट्टीचा निषेध नोंदवत मेधा पाटकर यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे. पक्ष नेतृत्वावर टीका करत पाटकर यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला. ‘आप’मध्ये सध्या सुरु असलेला वाद आणि याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची भूमिका अनपेक्षित असून पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना धक्काबुक्की होणे, ही दुर्दैवी घटना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांचे समर्थन करत पाटकर यांनी केजरीवाल यांच्यावर तोफ डागली. निष्ठावान नेत्यांना देण्यात आलेली वागणूक अत्यंत दुर्दैवी असून पक्षाला भविष्यात त्याचा तोटा सहन करावा लागेल, असेही त्या म्हणाल्या.च्वाराणसी : आम आदमी पार्टीने दिल्लीच्या जनतेला दिलेली आश्वासने पाळली पाहिजे आणि पक्षाने परिपक्वता सोडू नये. अपरिपक्व राजकारण करून संधी गमावू नये, असे वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटले आहे. ‘आप’च्या अंतर्गत कलहावर भाष्य करताना जेटली बोलत होते.च्दिल्लीकरांनी मोठ्या आशेने अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वाखालील आम आदमी पार्टीच्या बाजूने मतदान केले आहे आणि त्यांना आता अशाप्रकारच्या राजकारणाची अपेक्षा नाही. एक नव्या पद्धतीचे राजकारण समोर आले आहे. एक नेता बोलतो आणि त्याचे म्हणणे टॅप केले जाते. असे राजकारण मी कधी पाहिलेले नाही, असे जेटली म्हणाले.