शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

'आप'च्या आमदारांची बाजू ऐकून घ्या; न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2018 15:56 IST

'ईडी'च्या शिफारसीवरून राष्ट्रपतींनी 'आप'च्या या आमदारांना लाभाची पदे भुषविल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवले होते.

नवी दिल्ली: दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिलेल्या निकालामुळे निवडणूक आयोगाकडून अपात्र ठरवण्यात येणाऱ्या आम आदमी पार्टीच्या (आप) 20 आमदारांना मोठा दिलासा मिळाला. हा निकाल देताना न्यायालयाने राष्ट्रपतींची अधिसूचना रद्द ठरवत अंमलबजावणी संचलनालयाला (ईडी) 'आप'च्या आमदारांची बाजू पुन्हा ऐकून घेण्याचे आदेश दिले. 'ईडी'च्या शिफारसीवरून राष्ट्रपतींनी 'आप'च्या या आमदारांना लाभाची पदे भुषविल्याच्या आरोपावरून अपात्र ठरवले होते. मात्र, न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती चंदर शेखर यांच्या खंडपीठाने हा निर्णय रद्दबातल ठरवला. अपात्रतेची कारवाई करण्यापूर्वी निवडणूक आयोगाने आमची बाजू ऐकूनच घेतली नाही. हे आमच्या नैसर्गिक हक्काचे उल्लंघन असल्याचे आपच्या आमदारांचे म्हणणे होते. न्यायालयाने त्यांचा हा युक्तिवाद ग्राह्य धरत निवडणूक आयोगाला या आमदारांचे म्हणणे ऐकून घेण्याचा आदेश दिला. त्यामुळे या आमदारांचे विधानसभा सभागृहातील स्थान कायम राहणार आहे. केजरीवाल सरकारसाठी ही मोठी दिलासा देणारी गोष्ट आहे. 'आप'च्या आमदारांनी उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले होते की, कंत्राटी तत्त्वावर असलेल्या कामगारांनाही गैरवर्तनाच्या आरोपाखाली पूर्ण चौकशी केल्याशिवाय पदावरून दूर केले जात नाही. मात्र, आम्हाला कोणतीही बाजू मांडण्याची संधी न देताच अपात्र ठरवण्यात आले, असे या आमदारांनी याचिकेत म्हटले होते.न्यायालयाच्या या निर्णयानंतर 'सत्याचा विजय झाला,' असे टि्वट आपचे संयोजक, मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आहे. सत्याचा विजय झाला आहे. दिल्लीच्या लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधींना चुकीच्या पद्धतीने निलंबित करण्यात आलं होतं. दिल्ली उच्च न्यायालयाने दिल्लीकरांना न्याय दिला आहे. हा दिल्लीकरांचा मोठा विजय आहे, असे केजरीवाल यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

टॅग्स :AAPआपBJPभाजपाEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयElectionनिवडणूक