गुजरातमध्ये सकाळी ८ वाजता आणंद आणि वडोदराला जोडणारा नदीवरील पूल कोसळला. या घटनेत चारपेक्षा जास्त वाहने नदीत कोसळले. या घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला. दरम्यान, या घटनेबाबतीत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये जिल्हा पंचायत सदस्य हर्षद सिंह परमार यांनी या पुलाबद्दल सरकारला केलेला लेखी अर्ज चर्चेत आहे. या अर्जात पुलाच्या जीर्ण अवस्थेबद्दल माहिती देण्यात आली होती. जर या तक्रारीकडे वेळीच लक्ष दिले असते तर अनेकांचे जीव वाचू शकले असते.
दरम्यान, हर्षद सिंह परमार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या. यावेळी त्यांनी म्हटले आहे की, सरकार जाणूनबुजून लोकांचे जीव घेते. या घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा अशी माझी मागणी आहे.
आकाशात मोठा स्फोट झाला आणि..., राजस्थानमध्ये मोठा विमान अपघात, चुरू येथे विमान कोसळले
हर्षद सिंह परमार म्हणाले की, ज्या ठिकाणी हा पूल तुटला आहे ते माझे गाव आहे. माझे घर या पुलापासून फक्त ५०० मीटर अंतरावर आहे. मी येथील जिल्हा पंचायतीचा सदस्य आहे. ऑगस्ट २०२२ मध्ये आम्ही या पुलाच्या जीर्ण अवस्थेबाबत सरकारला एक लेखी निवेदन दिले होते. यामध्ये आम्ही म्हटले होते की, आम्ही विनंती केली होती की जर या पुलाचे ब्लॉक इतके हलत असतील की काहीतरी अनुचित घडू शकते. म्हणून, हा पूल बंद करून नवीन पूल बांधावा, अशी मागणी आम्ही केली होती.
सिंह म्हणाले, "आमच्या अर्जानंतर गांधीनगर येथील आर अँड बी विभागाचे अधिकारी येथे आले. त्यांनी त्या जागेची पाहणी केली आणि सांगितले की कंपन सामान्यपेक्षा थोडे जास्त आहे. यावेळी आम्ही सांगितले की पुलाची दुरुस्ती करा किंवा जनहितार्थ चाचणी अहवाल प्रकाशित करा. जर असा दोष असेल तर तुम्ही पूल कसा चालवू शकता? पण या लोकांनी पूल सुरूच ठेवला.
"मी हा मुद्दा अनेक वेळा उपस्थित केला आहे. सरकारच्या गंभीर दुर्लक्षामुळे लोकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशाप्रकारे सरकार जाणूनबुजून लोकांचे प्राण घेते".
हर्षद सिंह परमार, जिल्हा पंचायत सदस्य