शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिणेत तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मित्रपक्षाने साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:11 IST

BJP News: गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री  मोडण्याचे संकेत दिले आहे.

२०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी केंद्रातील सत्ताधारी भाजपासमोरील आव्हानं वाढताना दिसत आहेत. गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री  मोडण्याचे संकेत दिले आहे. तामिळनाडूमध्ये २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपा आणि एआयएडीएमके (ईपीएस गट) यांच्यात मतभेद उफाळून आले आहे. इरोड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी ईपीएस गटाने भाजपापासून स्वत:ला वेगळे केले आहे. तसेच पक्षाच्या कार्यालयावर लागलेल्या पोस्टरमधूनही भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही काढून टाकला आहे. 

एवढंच नाही तर एआयएडीएमके (ईपीसएस गट) ने आपल्या आघाडीचं नावही बदललं आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी हे नाव बदलून राष्ट्रीय लोकशाही प्रगतीशील आघाडी असं केलं आहे. या बदलानंतर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानं काही वेळ मौन पाळलं होतं. मात्र आता त्यांनी ईपीएस गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. 

तर एआयडीएमकेच्या एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भाजपावर टीका केली आहे. या नेत्याने भाजपावर टीका करताना एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, ईपीएसने भाजपाला स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपाला तामिळनाडूमधील आपली पात्रता माहिती असली पाहिजे. गेल्या विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी ४ जागा जिंकल्यानंतर भाजपाने स्वत:ला मुख्य विरोधी पक्ष म्हणवून घेण्यास सुरुवात केल्यापासून तामिळनाडूच्या राजकारणात भाजपा आणि ईपीएसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, दिवंगत नेत्या जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये दोन गट आहेत. त्यातील एका गटाचं नाव ओ. पन्निरसेल्वम आहे. तर दुसऱ्या गटाचं नाव ई. पलानीस्वामी आहे.  येथे भाजपा ईपीएस गटासोबत आघाडीमध्ये आहे. मात्र इरोडमधील निवडणुकीत ओपीएसने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच भाजपाकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. तसेच भाजपाने आपला उमेदवार उतरवल्यास आपण उमेदवार मागे घेऊ अशी गुगलीही टाकली आहे. ईपीएस आणि भाजपामध्ये वाद सुरू असतानात ओपीएस गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडूAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम