शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

दक्षिणेत तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मित्रपक्षाने साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:11 IST

BJP News: गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री  मोडण्याचे संकेत दिले आहे.

२०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी केंद्रातील सत्ताधारी भाजपासमोरील आव्हानं वाढताना दिसत आहेत. गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री  मोडण्याचे संकेत दिले आहे. तामिळनाडूमध्ये २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपा आणि एआयएडीएमके (ईपीएस गट) यांच्यात मतभेद उफाळून आले आहे. इरोड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी ईपीएस गटाने भाजपापासून स्वत:ला वेगळे केले आहे. तसेच पक्षाच्या कार्यालयावर लागलेल्या पोस्टरमधूनही भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही काढून टाकला आहे. 

एवढंच नाही तर एआयएडीएमके (ईपीसएस गट) ने आपल्या आघाडीचं नावही बदललं आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी हे नाव बदलून राष्ट्रीय लोकशाही प्रगतीशील आघाडी असं केलं आहे. या बदलानंतर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानं काही वेळ मौन पाळलं होतं. मात्र आता त्यांनी ईपीएस गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. 

तर एआयडीएमकेच्या एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भाजपावर टीका केली आहे. या नेत्याने भाजपावर टीका करताना एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, ईपीएसने भाजपाला स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपाला तामिळनाडूमधील आपली पात्रता माहिती असली पाहिजे. गेल्या विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी ४ जागा जिंकल्यानंतर भाजपाने स्वत:ला मुख्य विरोधी पक्ष म्हणवून घेण्यास सुरुवात केल्यापासून तामिळनाडूच्या राजकारणात भाजपा आणि ईपीएसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, दिवंगत नेत्या जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये दोन गट आहेत. त्यातील एका गटाचं नाव ओ. पन्निरसेल्वम आहे. तर दुसऱ्या गटाचं नाव ई. पलानीस्वामी आहे.  येथे भाजपा ईपीएस गटासोबत आघाडीमध्ये आहे. मात्र इरोडमधील निवडणुकीत ओपीएसने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच भाजपाकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. तसेच भाजपाने आपला उमेदवार उतरवल्यास आपण उमेदवार मागे घेऊ अशी गुगलीही टाकली आहे. ईपीएस आणि भाजपामध्ये वाद सुरू असतानात ओपीएस गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडूAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम