शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

दक्षिणेत तामिळनाडूमध्ये भाजपाला मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी मित्रपक्षाने साथ सोडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2023 14:11 IST

BJP News: गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री  मोडण्याचे संकेत दिले आहे.

२०२४ मध्ये होणारी लोकसभेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे. तसतशी केंद्रातील सत्ताधारी भाजपासमोरील आव्हानं वाढताना दिसत आहेत. गेल्या काही काळात विविध राज्यांमधील मित्र पक्ष साथ सोडत असताना आता दक्षिणेतील तामिळनाडूमध्येही एका मित्र पक्षाने भाजपासोबतची मैत्री  मोडण्याचे संकेत दिले आहे. तामिळनाडूमध्ये २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विधानसभेच्या पोटनिवडणुकीपूर्वी भाजपा आणि एआयएडीएमके (ईपीएस गट) यांच्यात मतभेद उफाळून आले आहे. इरोड विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीपूर्वी ईपीएस गटाने भाजपापासून स्वत:ला वेगळे केले आहे. तसेच पक्षाच्या कार्यालयावर लागलेल्या पोस्टरमधूनही भाजपा आणि भाजपाच्या नेत्यांचे फोटो हटवले आहेत. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटोही काढून टाकला आहे. 

एवढंच नाही तर एआयएडीएमके (ईपीसएस गट) ने आपल्या आघाडीचं नावही बदललं आहे. आता राष्ट्रीय लोकशाही आघाडी हे नाव बदलून राष्ट्रीय लोकशाही प्रगतीशील आघाडी असं केलं आहे. या बदलानंतर भाजपाच्या स्थानिक नेतृत्वानं काही वेळ मौन पाळलं होतं. मात्र आता त्यांनी ईपीएस गटाला प्रत्युत्तर दिलं आहे. 

तर एआयडीएमकेच्या एका नेत्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर भाजपावर टीका केली आहे. या नेत्याने भाजपावर टीका करताना एका वृत्तवाहिनीला सांगितलं की, ईपीएसने भाजपाला स्पष्ट संदेश दिला आहे. भाजपाला तामिळनाडूमधील आपली पात्रता माहिती असली पाहिजे. गेल्या विधानसभा निवडणुकीत २३४ पैकी ४ जागा जिंकल्यानंतर भाजपाने स्वत:ला मुख्य विरोधी पक्ष म्हणवून घेण्यास सुरुवात केल्यापासून तामिळनाडूच्या राजकारणात भाजपा आणि ईपीएसमध्ये वादाला सुरुवात झाली आहे. 

दरम्यान, दिवंगत नेत्या जयललिता यांच्या एआयएडीएमके पक्षामध्ये दोन गट आहेत. त्यातील एका गटाचं नाव ओ. पन्निरसेल्वम आहे. तर दुसऱ्या गटाचं नाव ई. पलानीस्वामी आहे.  येथे भाजपा ईपीएस गटासोबत आघाडीमध्ये आहे. मात्र इरोडमधील निवडणुकीत ओपीएसने आपल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा केली आहे. तसेच भाजपाकडे पाठिंब्याची मागणी केली आहे. तसेच भाजपाने आपला उमेदवार उतरवल्यास आपण उमेदवार मागे घेऊ अशी गुगलीही टाकली आहे. ईपीएस आणि भाजपामध्ये वाद सुरू असतानात ओपीएस गटाने घेतलेल्या भूमिकेमुळे आगीत तेल ओतण्याचे काम केले आहे.  

टॅग्स :BJPभाजपाTamilnaduतामिळनाडूAll India Anna Dravida Munnetra Kazhagamआॅल इंडिया अण्णा द्रविड मुनेत्र कझगम