शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
प्रशांत किशोर यांची भविष्यवाणी खरी होणार? बिहार निवडणुकीच्या एक्झिट पोलने केले शिक्कामोर्तब!
3
रेखा झुनझुनवालांच्या पोर्टफोलिओतील पेनी स्टॉकची पुन्हा भरारी! ६ महिन्यात तोटा भरुन काढत ३४ टक्के वाढ
4
जपानचे १,००,००० येन भारतामध्ये किती रुपये होतात? तुम्हाला फायदा होतो की नुकसान, जाणून घ्या
5
सीमेपासून अवघ्या २० किमी अंतरावर नवं आव्हान?; बांगलादेश सैन्यानं भारताला दिलेला शब्द मोडला
6
Tata घराण्यात मोठा बदल, नोएल टाटांच्या मुलाला मिळाली मोठी जबाबदारी; परदेशातून घेतलंय शिक्षण
7
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
8
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
9
दिल्लीतील स्फोटामुळे 'कॉकटेल २'चं शूट पुढे ढकललं, आजपासूनच होणार होती सुरुवात
10
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
11
धर्मेंद्र यांना रुग्णालयातून डिस्चार्ज; सनी देओलच्या टीमने दिलं स्टेटमेंट, 'त्यांचं तुमच्यावर..."
12
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
13
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
14
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
15
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
16
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
17
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
18
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
19
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
20
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश

900 वर्षे चाललेल्या दुष्काळामुळे सिंधु संस्कृतीचा विनाश- आयआयटी खरगपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 17:42 IST

ही संस्कृती 4350 वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे.

खरगपूर- जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असणाऱ्या सिंधु संस्कृती लयाला जाण्याची कारणे आजही शोधली जात आहेत. या संस्कृीताचा नाश 900 वर्षे चाललेल्या एका दुष्काळामुळे झाला असे आयआयटी खरगपूरच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ही संस्कृती 4350 वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे. आयआयटी खरगपूरचे हे संशोधन एल्सवियरच्या शोधनियतकालिकामध्ये प्रकाशित होणार आहे.भूगर्भशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्राच्या तज्ज्ञांनी केलेल्या या अभ्यासात सुमारे 5000 वर्षांपुर्वीच्या या प्रगत संस्कृतीला मान्सूनच्या अनियमिततेची झळ बसली असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सलग 900 वर्षे अत्यंत अपुरा पाऊस पडल्यामुळे सिंधु संस्कृती ज्या नद्यांवर अवलंबून होती त्या नद्यां कोरड्या पडल्या. या दुष्काळाचा परिणाम सिंधु संस्कृतीतील लोक आणि प्राणी नष्ट होण्यावर झाला.आयआयटी खरगपूरच्या भूगर्भशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि या संशोधनातील मुख्य संशोधक अनिल कुमार गुप्ता यांनी याबद्दल बोलताना सांगितले,'' आम्ही केलेल्या अभ्यासातून ख्रिस्तपूर्व 2350 (4350 वर्षांपुर्वी) ते ख्रिस्तपूर्व 1450 या काळामध्ये मान्सूनने ओढ दिल्याने मोठा दुष्काळ सिंधु संस्कृतीच्या परिसरामध्ये पडला. लोकांना आपली जागा सोडून जावे लागले असे निष्कर्ष निघत आहेत. हे लोक गंगा-यमुना नद्यांच्या खोऱ्याकडे तसेच पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्यप्रदेश आणि दक्षिणेस विंध्याचल व दक्षिण गुजरातकडे सरकले असावेत." 

टॅग्स :droughtदुष्काळIndiaभारत