शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
4
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
5
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
6
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
7
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
8
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
9
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
10
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
11
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
12
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
13
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
14
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
15
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
16
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
17
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
18
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
19
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
20
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो

900 वर्षे चाललेल्या दुष्काळामुळे सिंधु संस्कृतीचा विनाश- आयआयटी खरगपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2018 17:42 IST

ही संस्कृती 4350 वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे.

खरगपूर- जगातील प्राचीन संस्कृतींपैकी एक असणाऱ्या सिंधु संस्कृती लयाला जाण्याची कारणे आजही शोधली जात आहेत. या संस्कृीताचा नाश 900 वर्षे चाललेल्या एका दुष्काळामुळे झाला असे आयआयटी खरगपूरच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ही संस्कृती 4350 वर्षांपूर्वीच नष्ट झाली आहे. आयआयटी खरगपूरचे हे संशोधन एल्सवियरच्या शोधनियतकालिकामध्ये प्रकाशित होणार आहे.भूगर्भशास्त्रज्ञ आणि भौतिकशास्त्राच्या तज्ज्ञांनी केलेल्या या अभ्यासात सुमारे 5000 वर्षांपुर्वीच्या या प्रगत संस्कृतीला मान्सूनच्या अनियमिततेची झळ बसली असा निष्कर्ष काढण्यात आला आहे. सलग 900 वर्षे अत्यंत अपुरा पाऊस पडल्यामुळे सिंधु संस्कृती ज्या नद्यांवर अवलंबून होती त्या नद्यां कोरड्या पडल्या. या दुष्काळाचा परिणाम सिंधु संस्कृतीतील लोक आणि प्राणी नष्ट होण्यावर झाला.आयआयटी खरगपूरच्या भूगर्भशास्त्र विभागातील प्राध्यापक आणि या संशोधनातील मुख्य संशोधक अनिल कुमार गुप्ता यांनी याबद्दल बोलताना सांगितले,'' आम्ही केलेल्या अभ्यासातून ख्रिस्तपूर्व 2350 (4350 वर्षांपुर्वी) ते ख्रिस्तपूर्व 1450 या काळामध्ये मान्सूनने ओढ दिल्याने मोठा दुष्काळ सिंधु संस्कृतीच्या परिसरामध्ये पडला. लोकांना आपली जागा सोडून जावे लागले असे निष्कर्ष निघत आहेत. हे लोक गंगा-यमुना नद्यांच्या खोऱ्याकडे तसेच पूर्व आणि मध्य उत्तर प्रदेश, बिहार, बंगाल, मध्यप्रदेश आणि दक्षिणेस विंध्याचल व दक्षिण गुजरातकडे सरकले असावेत." 

टॅग्स :droughtदुष्काळIndiaभारत