शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

९ व १० वर्षाच्या मुलांनी केली २३ वर्षाच्या तरुणाची हत्या

By admin | Published: May 25, 2015 11:57 AM

दिल्लीतील गोविंदपुरी येथे ९ व १० वर्षाच्या दोघा अल्पवयीन मुलांनी क्षुल्लक कारणावरुन २३ वर्षाच्या तरुणाची हत्या केली आहे.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २५ - दिल्लीतील गोविंदपुरी येथे ९ व १० वर्षाच्या दोघा अल्पवयीन मुलांनी क्षुल्लक कारणावरुन २३ वर्षाच्या तरुणाची हत्या केली आहे. या मुलांनी तरुणाच्या छातीवर बसून बॉटलने त्या तरुणाच्या गळ्यावर वार केला असून या घटनेने अल्पवयीन वाढत्या हिंसक वृत्तीचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. 

गोविंदपुरी येथील एका मंदिराबाहेर संजय कुमार (वय २३ वर्ष) हा तरुण फुलविक्रेत्याचे काम करतो. संजय कुमार परिसरातील दुस-या दुकानाजवळ रात्री उशीरा मद्यपान करत असताना ९ व १० वर्षांची दोन अल्पवयीन मुलं त्यांच्याजवळ दान मागत होते. संजयने त्यांना पैसे देण्यास नकार दिला. यावरुन त्या मुलांसोबत संजयचा वाद झाला. यादरम्यान संजयने एकाच्या कानशिलात लगावली. संतापाच्या दोन्ही मुलांनी संजयवर हल्ला चढवत त्याच्या डोक्यावर बिअरची बॉटल फोडली तर दुस-याने धक्का मारुन संजयला खाली पाडले. यानंतर एकाने संजयच्या छातीवर बसून बिअरच्या बॉटलने संजयचा गळा चिरला. 

पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले असून त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली आहे. पोलिस चौकशीत या मुलांनी वर्षभरापूर्वी गावातून पळ काढून दिल्ली गाठल्याची कबूली दिली. त्यांचे वडिल गावी सायकल रिक्षा चालवतात. दोघेही गोविंदपुरीतील मंदिरात भीक मागतात. संजय कुमारने ब-याचदा या मुलांना जेवण दिल्याचे स्थानिकांनी सांगितले. दोन्ही मुलांना अंमलीपदार्थांचे व्यसन असल्याची चर्चा आहे.