शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बीएसएफ जवानाची पाकिस्तानी रेंजर्सच्या तावडीतून सुटका; पहलगाम हल्ल्यानंतर अनवधानाने गेला होता सीमेपार
2
आईच्या मृत्यूनंतर गतिमंद मुलीला जिवंतपणी मरणयातना; जन्मदात्यानेच बांधले जनावरांच्या गोठ्यात
3
भारताच्या हल्ल्यामुळे पाकिस्तानात न्यूक्लियर रेडिएशन लीक?; अमेरिकेचं पहिल्यांदाच भाष्य
4
पाकिस्ताननंतर भारताचा चीनविरोधात 'डिजिटल स्ट्राईक'; ग्लोबल टाईम्सचे X अकाउंट केलं BLOCK !
5
CJI BR Gavai Oath Ceremony : महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
6
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
7
'या' दिग्गज कंपनीतून बाहेर पडण्याच्या तयारीत Reliance; ५०० कोटींची केलेली गुंतवणूक, मिळणार ११,१४१ कोटी रुपये
8
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
9
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
10
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
11
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
12
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
13
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
14
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
15
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
16
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
17
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
18
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर टाकण्याची धमकी: कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
19
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
20
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू

८.६ टक्केच महिला उमेदवार

By admin | Updated: April 10, 2016 02:16 IST

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले असेल; परंतु या रणसंग्रामात एकूण उमेदवारांमध्ये फक्त ८.६ टक्केच महिला आपले राजकीय

गुवाहाटी : आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले असेल; परंतु या रणसंग्रामात एकूण उमेदवारांमध्ये फक्त ८.६ टक्केच महिला आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. मोठ्या राजकीय पक्षांनी इ.स. २०११ च्या तुलनेत यंदा कमी महिलांना तिकीट दिले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी फक्त सहा महिला जास्त आहेत. गेल्या वेळी ८५ महिला उमेदवार रिंगणात होत्या आणि त्यापैकी १४ (सर्व काँग्रेस) विजयी झाल्या होत्या. काँग्रेस, भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष आसाम गण परिषद (अगप), बीपीएफ तसेच एआययूडीएफसारख्या सर्व महत्त्वाच्या पक्षांनी महिलांवर विश्वास दाखवलेला नाही. आगपमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. या पक्षाने केवळ दोन महिलांना तिकीट दिले आहे. गेल्यावेळी पक्षाच्या आठ महिला रिंगणात होत्या. भाजपाचा अन्य मित्र पक्ष बीपीएफने २०११ साली तीन महिलांच्या तुलनेत यावेळी फक्त दोघींनाच तिकीट दिले आहे. ७४ जागांवर निवडणूक लढवित असलेला विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष एआययूडीएफने पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. माकपा,भाकपा (माले), समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि युनायटेड पीपल्स पार्टीने प्रत्येकी एका महिलेला संधी दिली आहे. तर एसयूसीआयने तीन महिलांना रिंगणात उतरविले आहे. (वृत्तसंस्था)सत्ताधारी काँग्रेसने आपल्या १२ विद्यमान आमदारांसह १६ महिलांना उमेदवारी दिली आहे. २०११ ला ही संख्या १९ होती. पक्षाच्या दोन आमदारद्वय मंदिरा राय (अलगपूर) आणि अमिया गोगोई (दुलिआजान) यांना वगळण्यात आले असून यावेळी चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात बबिता शर्मा (गुवाहाटी पूर्व), डॉ.जुरी शर्मा बारदोलई (गुवाहाटी पश्चिम), अंगकिता दत्ता (अमगुरी) आणि पल्लवी सैकिया गोगाई (टेओक)यांचा त्यात समावेश आहे. भाजपा ८९ जागांवर निवडणूक लढवित आहे. या पक्षाने यंदा केवळ सहा महिलांना रिंगणात उतरविले आहे. २०११ मध्ये पक्षाने नऊ महिलांना उमेदवारी दिली होती.