शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

८.६ टक्केच महिला उमेदवार

By admin | Updated: April 10, 2016 02:16 IST

आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले असेल; परंतु या रणसंग्रामात एकूण उमेदवारांमध्ये फक्त ८.६ टक्केच महिला आपले राजकीय

गुवाहाटी : आसाममध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले असेल; परंतु या रणसंग्रामात एकूण उमेदवारांमध्ये फक्त ८.६ टक्केच महिला आपले राजकीय भविष्य आजमावत आहेत. मोठ्या राजकीय पक्षांनी इ.स. २०११ च्या तुलनेत यंदा कमी महिलांना तिकीट दिले आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यावेळी फक्त सहा महिला जास्त आहेत. गेल्या वेळी ८५ महिला उमेदवार रिंगणात होत्या आणि त्यापैकी १४ (सर्व काँग्रेस) विजयी झाल्या होत्या. काँग्रेस, भाजपा आणि त्याचे मित्र पक्ष आसाम गण परिषद (अगप), बीपीएफ तसेच एआययूडीएफसारख्या सर्व महत्त्वाच्या पक्षांनी महिलांवर विश्वास दाखवलेला नाही. आगपमध्येही काही वेगळी परिस्थिती नाही. या पक्षाने केवळ दोन महिलांना तिकीट दिले आहे. गेल्यावेळी पक्षाच्या आठ महिला रिंगणात होत्या. भाजपाचा अन्य मित्र पक्ष बीपीएफने २०११ साली तीन महिलांच्या तुलनेत यावेळी फक्त दोघींनाच तिकीट दिले आहे. ७४ जागांवर निवडणूक लढवित असलेला विधानसभेतील मुख्य विरोधी पक्ष एआययूडीएफने पाच महिलांना उमेदवारी दिली आहे. माकपा,भाकपा (माले), समाजवादी पार्टी, तृणमूल काँग्रेस आणि युनायटेड पीपल्स पार्टीने प्रत्येकी एका महिलेला संधी दिली आहे. तर एसयूसीआयने तीन महिलांना रिंगणात उतरविले आहे. (वृत्तसंस्था)सत्ताधारी काँग्रेसने आपल्या १२ विद्यमान आमदारांसह १६ महिलांना उमेदवारी दिली आहे. २०११ ला ही संख्या १९ होती. पक्षाच्या दोन आमदारद्वय मंदिरा राय (अलगपूर) आणि अमिया गोगोई (दुलिआजान) यांना वगळण्यात आले असून यावेळी चार नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. त्यात बबिता शर्मा (गुवाहाटी पूर्व), डॉ.जुरी शर्मा बारदोलई (गुवाहाटी पश्चिम), अंगकिता दत्ता (अमगुरी) आणि पल्लवी सैकिया गोगाई (टेओक)यांचा त्यात समावेश आहे. भाजपा ८९ जागांवर निवडणूक लढवित आहे. या पक्षाने यंदा केवळ सहा महिलांना रिंगणात उतरविले आहे. २०११ मध्ये पक्षाने नऊ महिलांना उमेदवारी दिली होती.