शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

"अंकल-आंटी माफ करा, पप्पांची काळजी घ्या", 7वीच्या विद्यार्थ्याने सुसाइड नोट लिहून संपवलं जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2022 18:24 IST

उत्तर प्रदेशातील रायबरेमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे.

रायबरेली : उत्तर प्रदेशातील रायबरेमधील इयत्ता सातवीतील विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे. एक भावनिक सुसाइट नोट लिहून विद्यार्थ्याने जीवन संपवले आहे. खरं तर विद्यार्थ्याने लिहलेल्या अखेरच्या काही शब्दांमुळे अनेकांना भावूक केले आहे. घटनास्थळी पोहचलेल्या सीओ वंदना सिंग यांनी म्हटले, "मुलाच्या वडिलांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सर्व स्तरावरून अधिक तपास केला जात आहे. दोषींविरोधात कडक कारवाई करून पीडित कुटुंबाला न्याय दिला जाईल."

दरम्यान, विद्यार्थी यश मौर्य 5 वर्षांपासून आई-वडीलांपासून दूर काका-काकीसोबत राहून शिक्षण घेत होता. गुरूवारी त्याची परीक्षा होती. यामध्ये त्याला कॉपी करताना पकडले होते. यावरून शिक्षकांनी त्याला सर्वप्रथम वर्गातच शिक्षा दिली. नंतर त्याला प्राध्यापकांकडे नेण्यात आले. शिक्षकांचा छळ सहन न झाल्याने त्याने मृत्यूला कवटाळल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. तो मूळचा रायबरेलीतील बछरावन येथील सेहांगो गावाचा रहिवासी होता. 

एक संधी द्यायला हवी होतीविद्यार्थ्याने सुसाइट नोटमध्ये लिहले, "अंकल-आंटी मला माफ करा. पप्पांची काळजी घ्या. चूक झाल्यावर एक संधी जरूर द्यायला हवी. मी माझ्या चुकीमुळे रडत आहे. मला माझ्या शाळेतील मित्रांमध्ये खूप  लाज वाटते. सगळे जण शेम-शेम बोलत होते. मला आता हे आणखी सहन होत नाही." विद्यार्थ्याचे अखेरचे शब्द वाचून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू येत आहेत. याप्रकरणी शाळेवर कारवाई करून आम्हाला न्याय मिळावा, असे जवाहर विहार कॉलनीतील रहिवासी आणि मृत विद्यार्थ्याचे काका यांनी म्हटले. 

"बसमध्ये डोकं खाली घालून बसला होता दादा"भावाच्या मृत्यूनंतर शाळेत शिक्षण घेत असलेल्या यशच्या लहान बहीणीला अश्रू अनावर झाले. "शाळा सुटल्यावर दादा बसमध्ये डोकं खाली टेकवून बसला होता. घरी आल्यावर तो सरळ त्याच्या रूममध्ये गेला. यानंतर पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. "

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूStudentविद्यार्थीSchoolशाळा