शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
2
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
3
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
4
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
5
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
6
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
7
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
8
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
9
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
10
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
11
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
12
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
13
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...
14
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यापूर्वी कॅनडात खलिस्तानवाद्यांवर जोरदार कारवाई, अनेकांना अटक...
15
Raj Kushwaha : "सोनम वयाने मोठी, बॉस होती, राज फक्त नोकर"; आईने घेतली लेकाची बाजू, म्हणाली...
16
विशेष लेख: मोठ्या पवारांची भाजपच्या दारावर टकटक?
17
'PM मोदींनी आपला हट्टीपणा सोडावा', असीम मुनीरच्या अमेरिका दौऱ्यावरुन काँग्रेसची टीका
18
आजचा अग्रलेख - किती मुले केव्हा? की नकोच?
19
राज कुशवाह तर मोहरा, सोनमचं खरं प्रेम कुणीतरी दुसरंच...? राजा रघुवंशी प्रकरणात नवा 'ट्विस्ट'

देशातील ६०% गर्भपात असुरक्षित; जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून माहिती उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2017 10:44 IST

भारतातील जवळपास ६० टक्के गर्भपात असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे.

ठळक मुद्दे भारतातील जवळपास ६० टक्के गर्भपात असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटलमधील उदासीन कारभार आणि जागरुकतेचा अभाव यांच्यामुळे भारतातील बहुतांश गर्भपात असुरक्षित असल्याची बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे.

नवी दिल्ली-  भारतातील जवळपास ६० टक्के गर्भपात असुरक्षित असल्याचं समोर आलं आहे. अपुऱ्या वैद्यकीय सुविधा, हॉस्पिटलमधील उदासीन कारभार आणि जागरुकतेचा अभाव यांच्यामुळे भारतातील बहुतांश गर्भपात असुरक्षित असल्याची बाब जागतिक आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणातून उघड झाली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने गटमेकर या संस्थेसोबत जगभरात सर्वेक्षण केलं होतं. यामधून विविध देशांमधील गर्भपाताच्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यात आला होता. हॉस्पिटलमध्ये केला जाणारा  गर्भपात किती सुरक्षित आहेत, याची पडताळणी या सर्वेक्षणाच्या माध्यमातू करण्यात आली. यामध्ये गर्भपातावर अनेक निर्बंध असलेल्या 62 देशांमधील असुरक्षित गर्भपातांचं प्रमाण ७५ टक्के असल्याचे आढळून आलं. तर गर्भपाताला कायदेशीर मान्यता दिलेल्या 57 देशांमधील असुरक्षित गर्भपातांचे प्रमाण फक्त १३ टक्के इतके आहे. पण भारतातील परिस्थिती अतिशय वेगळी आणि चिंताजनक आहे.गर्भपाताला कायदेशीर मान्यता असूनही, देशातील असुरक्षित गर्भपातांचे प्रमाण खूप जास्त आहे.

गर्भपातासाठी योग्य प्रशिक्षित डॉक्टर, सहाय्यक कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. असं झाल्यास देशात सुरक्षित गर्भपातांचं प्रमाण वाढेल, असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे. ‘सुरक्षित गर्भपातांचे प्रमाण वाढवायचं असेल तर धोरणात्मक बदल करुन त्याची अंमलबजावणी करावी लागेल. यासाठी सरकारने तातडीने पावलं उचलून मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (एमपीटी) कायद्यात सुधारणा करण्याची गरड असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे.  कायद्यामध्ये योग्य ते बदल करून वैद्यकीय सेवांचा दर्जा सुधारला तर गर्भपात सुरक्षित होतील. नाहीतरी शहरी भागासह ग्रामीण दूर्गम भागातील महिलांना यापुढेही असुरक्षित गर्भपातांना सामोरं जावं लागेल, असं आयपास डेव्हलपमेंट फाऊंडेशनचे कार्यकारी संचालक विनोज मॅनिंग यांनी म्हटलं आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, २०१० ते २०१४ या काळात जगभरात ५ कोटी ५७ लाख गर्भपात झाले. यामधील ३ कोटी ६ लाख गर्भपात सुरक्षित होते. तर १ कोटी ७१ लाख गर्भपात कमी सुरक्षित होते. तर उरलेले इतर गर्भपात जास्त असुरक्षित होते.

टॅग्स :Healthआरोग्यhospitalहॉस्पिटल