शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
मुंबई उत्तर पूर्वमध्ये वादाची ठिणगी; मिहीर कोटेचा यांच्या प्रचार रॅलीवर दगडफेक केल्याचा आरोप, पोलिसांत तक्रार
5
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
6
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
7
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
8
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
9
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
10
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
11
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
12
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
13
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
14
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
15
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
16
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
17
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
18
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
19
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
20
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'

लांब पल्ल्याच्या 500 रेल्वे गाड्या होणार सुपरफास्ट, प्रवासी वेळेत दोन तासांची होणार कपात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 8:49 PM

पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे.

नवी दिल्ली- पुढच्या महिन्यापासून देशात धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या आणखी सुपरफास्ट होणार आहेत. रेल्वे प्रशासनानं 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं त्यांचा वेग वाढणार आहे. रेल्वे मंत्रालयाने याची आज घोषणा केली आहे. 500 रेल्वे गाड्यांना सुपरफास्ट एक्स्प्रेसचा दर्जा दिल्यानं या ट्रेनच्या प्रवासी वेळेत दोन तासांनी कपात होणार आहे.पुढच्या महिन्यात म्हणजेच नोव्हेंबरपासून या सुपरफास्ट एक्स्प्रेसचे वेळपत्रक जाहीर केले जाणार आहे. उशिरानं धावणा-या रेल्वे व वाढत्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर रेल्वे प्रशासनानं रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकावर अधिकाधिक लक्ष्य केंद्रित करण्याचं ठरवलं आहे. रेल्वे प्रशासनानं ट्रेनचा सर्वाधिक वापर करण्याचा दृष्टिकोन ठेवला असून, त्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. तसेच पुन्हा परतीच्या प्रवासाला निघणा-या या सुपरफास्ट दर्जाच्या एक्स्प्रेस कोणत्याही स्टेशनवर थांबवणार असल्यास त्या ट्रेनला 'लाय ओव्हर पीरियड'मध्ये थांबवण्याचा रेल्वे प्रशासनाच्या विचाराधीन आहे. नव्या वेळापत्रकानुसार सुरुवातीला 50 रेल्वे गाड्या अशा प्रकारे धावणार आहेत.रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला मंत्रालयाला याबाबत सूचना केल्या होत्या. त्यानुसार आता प्रवाशांच्या सोयीसाठी या रेल्वे गाड्यांच्या प्रवासी वेळेत 5 मिनिटांपासून 2 तासांपर्यंत कपात करण्यात येणार आहे. रेल्वे मंत्रालयाने अंतर्गत ऑडिट सुरू केले असून, याद्वारे 50 मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांना सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार आहे. रेल्वेच्या ताफ्यातील सध्याच्या लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या सरासरी वेगामध्ये वाढ करण्यात येणार आहे. तसेच या गाड्यांचा स्टेशनात थांबण्याची वेळही कमी करण्यात येणार आहे. तसेच ज्या स्थानकांत कमी प्लॅटफॉर्म आहेत, अशा स्टेशनमध्ये या गाड्या थांबवण्यात येणार नाहीत. रेल्वेतील या नव्या सुधारणांसाठी रेल्वे ट्रॅक आणि पायाभूत सुविधांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ज्या गाड्या 130 किमी प्रतितास या वेगाने धावतात. त्यांच्यासाठी स्वयंचलित सिग्नल यंत्रणा आणि नव्या बुश कोचची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अंतर्गत आॅडिट सुरू

रेल्वेगाड्यांचे अंतर्गत आॅडिट केले जात आहे. त्याद्वारे ५० मेल व एक्स्प्रेस गाड्यांना आवश्यक सुधारणा करून सुपर-फास्ट गाड्यांमध्ये परिवर्तित केले जाईल. गाड्यांचा सरासरी वेग वाढविण्याची ही प्रक्रिया आहे. रेल्वे रुळ व पायाभूत बाबींचा विकास, आॅटोमॅटिक सिग्नलिंग व १३० किलोमीटर प्रति तास वेगाने धावू शकणारे आधुनिक डबे यामुळे रेल्वेगाड्यांचा वेग वाढणे अपेक्षित आहे. आता वेगावरील बंधनावरही पुनर्विचार केला जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली.

या गाड्या लवकर पोहोचतीलभोपाळ-जोधपूर एक्स्प्रेस ९५ मिनिटे आधी पोहोचेल तर, गुवाहाटी-इंदोर स्पेशल ट्रेन २३३० किलोमीटरचा प्रवास ११५ मिनिटांपूर्वी पूर्ण करेल. तसेच, गाझीपूर-बांद्रा टर्मिनन्स एक्स्प्रेस १९२९ किलोमीटरचे अंतर ९५ मिनिटे आधी कापेल. गाड्या वेगवान करण्यासाठी रेल्वेस्थानकावर गाडी थांबविण्याच्या वेळेत कपात करण्यात येईल. तसेच, प्रवाशांची संख्या कमी असलेल्या रेल्वेस्थानकांवर गाडी उभी केली जाणार नाही.

टॅग्स :Railway Passengerरेल्वे प्रवासीpiyush goyalपीयुष गोयल