शहरं
Join us  
Trending Stories
1
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मॅसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
2
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
3
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
4
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
5
IPL 2024 LSG vs MI : लखनौने टॉस जिंकला! हार्दिकच्या पदरी निराशा; १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूला संधी
6
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
7
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
8
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
9
Yuzvendra Chahal wife Dhanashree Verma: युजवेंद्र चहलला टी२० वर्ल्डकपसाठी टीम इंडियात संधी; आनंदाच्या भरात पत्नी धनश्रीने काय केलं पाहा...
10
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
11
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
12
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
13
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
14
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
15
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा
16
किंग खानच्या KKR मधील प्रमुख खेळाडूवर एका सामन्याची बंदी; DC विरुद्धची चूक भोवली
17
याला म्हणतात ढासू शेअर...! 10 दिवसांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; एका वर्षात 3 पट वाढला भाव
18
Rohit Sharma throwback picture: रोहित शर्माच्या आईने वाढदिवशी शेअर केला 'हिटमॅन'चा जुना फोटो, चाहत्यांनी केल्या भन्नाट कमेंट्स
19
शरद पवार हेच महाराष्ट्राचा आत्मा, मोदींना ४ जूनला कळेल; जयंत पाटलांचा पलटवार
20
रायबरेली आणि अमेठीतून कोण निवडणूक लढवणार?; काँग्रेस नेत्याच्या दाव्याने सर्वच हैराण

बेरोजगारीने गाठला ४५ वर्षांचा उच्चांक; अहवाल दडपल्याचा विरोधकांचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2019 5:48 AM

नोटाबंदी, जीएसटीचा फटका : दर तब्बल ६.१ टक्क्यांवर; सांख्यिकी आयोगाचीच आकडेवारी

नवी दिल्ली : देशाचा यंदाचा बेरोजगारीचा दर हा गेल्या ४५ वर्षांत सर्वाधिक होता, अशी माहिती केंद्र सरकारी संघटनेच्या अहवालातूनच उघड झाली आहे. नोटाबंदीमुळे काळा पैसा कमी झाला, करदाते वाढले, महसुलात वाढ झाली, असा दावा केंद्र सरकार करीत असताना नोटाबंदीचा हा परिणामही समोर आला आहे. राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या अहवालात म्हटले आहे की, भारतातील २0१७-१८ मधील बेरोजगारीचा दर तब्बल ६.१ टक्के इतका होता.राष्ट्रीय सांख्यिकी आयोगाने हा अहवाल निती आयोगाकडे आधीच सादर केला होता. पण निती आयोगाने त्या अहवालाकडे दुर्लक्षच केले. त्यामुळे सांख्यिकी आयोगाचे प्रभारी अध्यक्ष व एक सदस्य यांनी पदाचे राजीनामे दिले होते. अर्थात निती आयोगाने वा सरकारने अद्यापही हा अहवाल जाहीर केलेला नाही. यावर अद्याप काम सुरू असल्याचे निती आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी म्हटले आहे.हा अहवाल अडचणीचा असल्यानेच तो दाबून ठेवल्याची टीका माजी अर्थमंत्री पी. चिदम्बरम यांनी केली होती. तसेच आणखी एक संस्था मोदी सरकारने मारून टाकली आहे, असे ते म्हणाले होते.देशात १९७२-७३ या काळात बेरोजगारीचे प्रमाण वाढले होते. तेव्हा महाराष्ट्रातच नव्हे, तर देशाच्या अनेक राज्यांमध्ये दुष्काळ होता. त्यामुळे शेतकरी, शेतमजूर, ग्रामीण कामगार असे सारेच रोजगाराच्या शोधात होते. त्यामुळे त्या वर्षांत बेरोजगारीचा दर ६ टक्क्यांवर गेला होता. त्यानंतर मात्र कधीही बेराजगारीचे प्रमाण इतके नव्हते.डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात काय होता दर?यूपीए सरकारच्या काळात, म्हणजेच डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधान असताना २0११-१२ साली बेरोजगारीचा दर २.२ टक्के होता. तो २0१७-१८ मध्ये ६.१ टक्क्यांवर आला आहे. म्हणजेच बेरोजगारीचे प्रमाण वाढले असून, नोव्हेंबर २0१६ मध्ये पंतप्रधान मोदी यांनी जाहीर केलेली नोटाबंदी व त्यानंतर अमलात आलेली जीएसटी करप्रणाली यामुळे बेरोजगारी वाढली, असे दिसत आहे.अनेक अर्थतज्ज्ञ तसेच अभ्यासक बेरोजगारी वाढल्याचे सातत्याने सांगत आहेत. पण सरकार मात्र रोजगारांची संख्या वाढत असल्याचा दावा करीत आहे. या पार्श्वभूमीवर सांख्यिकी आयोगाच्या अहवालातून नेमकी स्थिती स्पष्ट झाली आहे.‘मोदींनी देशासमोर संकट निर्माण केले’नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन कोटी रोजगार निर्माण करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र गेल्या पाच वर्षांत या दिशेने काहीच न करता बेरोजगारांसमोर मोठे संकट मात्र निर्माण केले, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे.राहुल गांधी यांनी टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, २०१७-१८ साली देशामध्ये ६.५ कोटी युवक बेरोजगार असल्याचे स्पष्ट झाले आहे. देशावर अशी परिस्थिती आणणाऱ्या मोदींना पंतप्रधानपदावरून घालविण्याची वेळ आता आली आहे.

टॅग्स :jobनोकरीNarendra Modiनरेंद्र मोदीGovernmentसरकार