शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
मुंबई, पुणे, कोल्हापूर, लातूरचे १०० जण अडकले नेपाळमध्ये; प्रवास टाळा, राज्यातील पर्यटकांना सरकारच्या सूचना 
3
नेपाळचं नेतृत्व करण्यास सज्ज झालेल्या सुशीला कार्की यांनी नरेंद्र मोदी आणि भारताबाबत केलं मोठं विधान, म्हणाल्या... 
4
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
5
भयंकर! ज्या प्रियकराच्या मदतीनं पतीच्या हत्येचा रचला कट; त्याचाच मृतेदह झाडाला लटकलेला आढळला
6
"त्यांचं रिलेशनशिप टॉक्झिक होतं", कुमार सानू आणि कुनिकाच्या अफेअरबद्दल लेक अयान म्हणाला- "आई आजही..."
7
"धोनीने मला 'सरडा' बनायला भाग पाडलं..."; दिनेश कार्तिकने सांगितलं टीम इंडियाचं मोठं गुपित
8
Stock Markets Today: सुस्त सुरुवातीनंतर शेअर बाजारात पुन्हा खरेदी, Nifty २५,००० च्या जवळ; Adani Ports, TCS, NTPC टॉप गेनर्स
9
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
10
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
11
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
13
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
14
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
15
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
16
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
17
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
18
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
19
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
20
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?

धक्कादायक वास्तव! "42 हजार शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची तर 15,000 शाळांमध्ये शौचालयाची नाही सोय"

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2021 12:52 IST

Government Schools in India : तब्बल 42 हजारांपेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची तसेच 15 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शौचालये नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे.

नवी दिल्ली - देशातील तब्बल 42 हजारांपेक्षा जास्त सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याची तसेच 15 हजारांपेक्षा जास्त शाळांमध्ये शौचालये नसल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली आहे. एकात्मिक जिल्हा माहिती प्रणाली शिक्षण आकडेवारीच्या आधारे त्यांनी ही माहिती दिली आहे. 

रमेश पोखरियाल निशंक यांनी पुढे दिलेल्या माहितीनुसार, 2018-19 मध्ये देशातील 10 लाख 41 हजार 327 सरकारी शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा आहे. तर 10 लाख 68 हजार 726 शाळांमध्ये शौचालये आहेत. राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सरकारी शाळांसह सर्व शाळांमध्ये मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे आणि सर्व मुलांसाठी सुरक्षित आणि पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्यात यावे अशा सूचना वारंवार दिल्या असल्याची माहिती केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी दिली आहे. 

सरकारी आकडेवारीनुसार, 42 हजार 74 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय नाही. त्यापैकी सर्वाधिक 8 हजार 522 शाळा आसाममधील आहेत. तर आंध्र प्रदेशात 3771, बिहारमध्ये 4270, जम्मू-काश्मीरमध्ये 2158, मध्यप्रदेशमध्ये 5529, झारखंडमध्ये 1840, मेघालयात 5208, राजस्थानमध्ये 2627, उत्तर प्रदेशात 3368 आणि पश्चिम बंगालमध्ये 1520 शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा नाही.

मुलांसाठी पिण्याचे पाणी आणि शौचालयाची सुविधा नसल्याच्या बाबतीतही आसाम पहिल्या क्रमांकावर आहे. आसाममधील 13,503 शाळांमध्ये मुलांसाठी स्वच्छतागृहे नाहीत. तसेच बिहारमध्ये 9471, जम्मू-काश्मीरमध्ये 1379, कर्नाटकात 1519, मध्य प्रदेशात5975, मेघालयात 1933, ओडिशामध्ये 2484, राजस्थानमधील 1061 आणि पश्चिम बंगालमध्ये 2142 शाळांचा समावेश आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Educationशिक्षणEducation Sectorशिक्षण क्षेत्रSchoolशाळाStudentविद्यार्थीWaterपाणीIndiaभारत