शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
3
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
4
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
5
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
6
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
7
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
8
काँग्रेस ५० टक्के आरक्षणाची मर्यादा हटवेल, दलित आणि मागासवर्गीयांचा कोटा वाढवेल: राहुल गांधी
9
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
10
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
11
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
12
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
13
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
14
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
15
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
16
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
17
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
18
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
19
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
20
Closing Bell: सेन्सेक्स किंचित तेजीसह तर, निफ्टी घसरणीसह बंद; टायटनमध्ये मोठी घसरण, IT शेअर्स चमकले

मोदी सरकारच्या 4 वर्षांमध्ये दहशतवाद थांबला नाहीच, हुतात्म्यांच्या संख्येत वाढ झाली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 1:11 PM

जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या कारवाया वाढल्या असल्या तरी बुरहान वाणी गँगचे उच्चाटन करण्यात सरकारला यश आले आहे.

नवी दिल्ली- 2014 साली प्रत्येक प्रचारसभेत भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असणारे नरेंद्र मोदी आपण सत्तेत येताच दहशतवादाविरोधात कडक भूमिका घेऊ असे सांगत असत. तसेच जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी पाकिस्तानची हिंमत होणार नाही असंही त्यांनी आश्वासन दिलं होतं. मात्र त्यांचं सरकार येऊन चार वर्षे पूर्ण झाल्यावरही दहशतवादी हल्ले रोखण्यात आपल्याला फारसं यश आलेलं दिसत नाही. सीमेपलिकडून गोळीबार आणि भारताच्या सीमेत दहशतवादी पाठवण्याच्या घटना तशाच असून जम्मू आणि काश्मीरमध्येही फुटिरतावादी तरुणांनी अनेक घातपाती कारवाया केल्या आहेत.अर्थात या काळामध्ये देशातील सुरक्षा दले शांत बसली आहेत असे नाही पण आपल्या जवानांना प्राणांची आहुती देऊन देशाचे रक्षण करावे लागले आहे. 2014 साली निवडणूक प्रचारामध्ये पाकिस्तानला संपुआ सरकारने धडा शिकविण्याऐवजी प्रेमपत्रे पाठवल्यासारखी निषेध खलिते पाठवण्यात धन्यता बाळगली, मी अशी प्रेमपत्रे लिहू शकणार नाही, पाकिस्तानला त्याच्या भाषेतच उत्तर द्यावे लागेल असे नरेंद्र मोदी सांगायचे. जर पंतप्रधानांच्या हातामध्ये देशाच्या सीमा, सीआरपीएफ, सर्व सुरक्षा दले,उपग्रह, मोबाइल नेटवर्क, बँका आहेत मग त्यांना दहशतवादी कारवाया थांबवण्यापासून कोण रोखतंय असे मोदी म्हणायचे पण प्रत्यक्षात सत्तेवर आल्यावर मात्र दहशतवादावर नियंत्रण आणण्यात ते यशस्वी झाल्याचे दिसत नाही. पाकिस्तानने भारतावरील हल्ल्यांमध्ये वाढच केली असून जम्मू आणि काश्मीर राज्यामध्ये अस्थिरताही निर्माण झाली आहे.डॉ. मनमोहन सिंग यांच्या पंतप्रधान कार्यकाळाच्या शेवटच्या वर्षामध्ये 2022 दहशतवादी मारले गेले तर नरेंद्र मोदी यांच्या चार वर्षांच्या कार्यकाळात 1737 दहशतवादी मारले गेले आहेत. संपुआ सरकारच्या शएवटच्या चार वर्षांमध्ये प्रतीवर्ष 505 दहशतवादी मारले गेले पण भाजपाप्रणित रालोआ2 सरकारमध्ये प्रतीवर्ष 434 दहशतवादी मारले गेले आहेत.

डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या चार वर्षांमध्ये जम्मू आणि काश्मीरमध्ये एकूण 177 जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले होते तर मोदी सरकारच्या काळामध्ये या राज्यात 4 वर्षांमध्ये 263 जवान शहिद झाले आहेत.या काळात या राज्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येत थोडी वाढ झाली आहे. तसेच नक्षली हल्ल्यांसारख्या हल्ल्यांची संख्या कमी करण्यात मात्र सरकारला यश आल्याने ईशान्य व मध्य भारतातील दहशतवादी हल्ल्यांमध्ये मारल्या जाणाऱ्या जवानांच्या संख्येत घट झाली आहे.2017 साली 860 वेळा, 2016 साली 271 वेळा तसेच 2015 मध्ये 387 आणि 2014मध्ये 405 वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन झाले आहे. यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच पाकिस्तानने गोळीबार सुरु केला असून 21 जानेवारीपर्यंत पाकिस्तानने 134 पेक्षा जास्तवेळा शस्त्रशसंधीचे उल्लंघन केले आहे.

बुरहान वाणी गँगचे संपूर्ण उच्चाटनहिजबुल मुजाहिदिन या दहशतवादी संघटनेच्या एकेक कमांडर्सना टिपून मारण्यात मोदी सरकारला यश आले आहे. बुरहान वाणीपासून सुरुवात केल्यावर 10 वरिष्ठ कमांडर्सना मारण्यात भारतीय जवानांना यश आले. यामध्ये सद्दाम पाडर, आदिल खंडे, नासिर पंडित, अश्फाक भट, सब्जार भट, अनिस, इश्फाक डार, वसीम मल्लाह, वसीम शाह यांचा समावेश आहे. बुरहानच्या गँगमधला एकूण एक दहशतवादी मारल्यामुळे मोदी सरकारचे कौतुकही होते.

टॅग्स :TerrorismदहशतवादTerror Attackदहशतवादी हल्लाterroristदहशतवादीJammu Kashmirजम्मू-काश्मीरMartyrशहीदCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघन