शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानमध्ये टोमॅटो 300 रूपये किलो; भारताकडून टॉमेटो खरेदी करणार नसल्याचं अन्न सुरक्षा मंत्र्यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 10:03 IST

पाकिस्तानात टॉमेटो 300 रूपये प्रतिकिलोने विकला जातो आहे.

ठळक मुद्देपाकिस्तान सध्या महागाईच्या भडका उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. टोमॅटो आणि कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत

लाहोर- पाकिस्तान सध्या महागाईच्या भडका उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. तेथे टोमॅटो आणि कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तरीही भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तानचे अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात बोसान यांनी ही माहिती दिली. शेजारील देशाबरोबर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने पाकिस्तानमधील सरकार कुठल्याही परिस्थितीत भाज्यांची आयात करणार नसल्याची माहिती समोर येते आहे. दरवर्षी भारतातून मागविलेल्या भाज्यांमुळे पाकिस्तानातील बाजारातील भाज्यांची मागणी पूर्ण होते. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने हे वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानच्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोची आयात कमी होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत टॉमेटो प्रतिकिलो ३०० रुपये दराने विकला जात आहे. लाहोर आणि पंजाबमध्ये 300 रूपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री होते आहे. तर रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये टोमॅटो 200 रूपये किलोने विकले जात आहेत.दरवर्षी पाकिस्तान भारताकडून टॉमेटोची आयात करतो. पण यावर्षी भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमेपलिकडून येणाऱ्या कंटेनरना देशात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मागणी असूनही त्या तुलनेत पुरवठा होत नाही. आता फक्त सिंध प्रांतातील उत्पादित मालाची प्रतीक्षा येथील स्थानिक व्यापाऱ्यांना आहे.

पाकिस्तानातील टॉमेटो आणि कांद्याच्या तुटवड्याचे संकट येत्या काही दिवसांतच संपेल. बलुचिस्तानमधून लवकरच माल बाजारात येणार असल्याचं अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात  बोसन यांनी म्हंटलं आहे. आपण भारताकडून भाज्या आयात करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. लाहोर, पंजाब प्रांतातील विविध ठिकाणच्या बाजारांमध्ये टॉमेटोचे दर प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

काही दिवसांपूर्वीच येथील बाजारांमध्ये टॉमेटो १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. तसेच सरकारने टॉमेटोचे दर १३२-१४० रुपये प्रतिकिलो निश्चित केला होता. भारताकडून टॉमेटो आयात न करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचं लाहोर चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने (LCCI) स्वागत केलं आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मदतच होणार आहे, असे एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हटलं आहे. हा निर्णय योग्यच असल्याचं  एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हंटलं आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत