शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
2
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
3
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
4
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
5
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
6
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
7
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला
8
CM देवेंद्र फडणवीसांना पाठवली कायदेशीर नोटीस, असीम सरोदे यांनी दिली माहिती; नेमके प्रकरण काय?
9
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
10
अमेरिकेनं इराणवर चालवलं 'मिडनाइट हॅमर', केला ऑपरेशनच्या नावाचा खुलास; म्हणाले, ट्रम्प बोलें तो...!
11
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
12
ENG vs IND : कायद्यात राहून फायद्यात! जड्डू-साई सुदर्शन जोडीनं रिले कॅचसह लुटली मैफिल (VIDEO)
13
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
14
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
15
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
16
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
18
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
19
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
20
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग

पाकिस्तानमध्ये टोमॅटो 300 रूपये किलो; भारताकडून टॉमेटो खरेदी करणार नसल्याचं अन्न सुरक्षा मंत्र्यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 10:03 IST

पाकिस्तानात टॉमेटो 300 रूपये प्रतिकिलोने विकला जातो आहे.

ठळक मुद्देपाकिस्तान सध्या महागाईच्या भडका उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. टोमॅटो आणि कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत

लाहोर- पाकिस्तान सध्या महागाईच्या भडका उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. तेथे टोमॅटो आणि कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तरीही भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तानचे अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात बोसान यांनी ही माहिती दिली. शेजारील देशाबरोबर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने पाकिस्तानमधील सरकार कुठल्याही परिस्थितीत भाज्यांची आयात करणार नसल्याची माहिती समोर येते आहे. दरवर्षी भारतातून मागविलेल्या भाज्यांमुळे पाकिस्तानातील बाजारातील भाज्यांची मागणी पूर्ण होते. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने हे वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानच्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोची आयात कमी होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत टॉमेटो प्रतिकिलो ३०० रुपये दराने विकला जात आहे. लाहोर आणि पंजाबमध्ये 300 रूपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री होते आहे. तर रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये टोमॅटो 200 रूपये किलोने विकले जात आहेत.दरवर्षी पाकिस्तान भारताकडून टॉमेटोची आयात करतो. पण यावर्षी भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमेपलिकडून येणाऱ्या कंटेनरना देशात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मागणी असूनही त्या तुलनेत पुरवठा होत नाही. आता फक्त सिंध प्रांतातील उत्पादित मालाची प्रतीक्षा येथील स्थानिक व्यापाऱ्यांना आहे.

पाकिस्तानातील टॉमेटो आणि कांद्याच्या तुटवड्याचे संकट येत्या काही दिवसांतच संपेल. बलुचिस्तानमधून लवकरच माल बाजारात येणार असल्याचं अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात  बोसन यांनी म्हंटलं आहे. आपण भारताकडून भाज्या आयात करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. लाहोर, पंजाब प्रांतातील विविध ठिकाणच्या बाजारांमध्ये टॉमेटोचे दर प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

काही दिवसांपूर्वीच येथील बाजारांमध्ये टॉमेटो १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. तसेच सरकारने टॉमेटोचे दर १३२-१४० रुपये प्रतिकिलो निश्चित केला होता. भारताकडून टॉमेटो आयात न करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचं लाहोर चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने (LCCI) स्वागत केलं आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मदतच होणार आहे, असे एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हटलं आहे. हा निर्णय योग्यच असल्याचं  एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हंटलं आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत