शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
कुख्यात नक्षलवाद्याला दहशतवाद विरोधी पथकाने केली अटक, ६-७ वर्षांपासून होता फरार
3
PBKS vs LSG : बॅटिंग-बॉलिंगमध्ये 'सिंग इज किंग शो'; पंतच्या लखनौसमोर श्रेयस अय्यरच्या पंजाबचा 'भांगडा'
4
"...त्यासाठी सुंदर महिलांना अमेरिकेत पाठवा’’, ज्येष्ठ पत्रकाराचा पाकिस्तानला अजब सल्ला, आता होतेय टीका   
5
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
6
विमानतळावर उतरताना भिंतीवर आदळले विमान, वैमानिकाने उडी मारून वाचवले प्राण
7
नागपुरात शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्याविरोधात विनयभंग, फसवणुकीचा गुन्हा दाखल
8
पाच लग्नं केली, सहाव्याच्या तयारीत होता, पण पीडित पत्नीने घेतली पोलिसांत धाव, पोलिसाचाच कारनामा झाला उघड
9
सेंच्युरी हुकली; फिफ्टी प्लस धावसंख्येसह प्रभसिमरन याने साधला मोठा डाव; गेलच्या विक्रमाशी बरोबरी
10
मोदी पहलगाममधील दहशतवाद्यांना धडा कधी शिकवणार? काँग्रेस नेत्याचा सवाल, राफेलला म्हटलं खेळणं  
11
अजिंक्य रहाणेनं घेतलेला कॅच भारीच! याशिवाय या दोन गोष्टींची रंगली चर्चा (VIDEO)
12
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
13
KKR vs RR : "हम तो डूबे हैं सनम तुम को भी ले डूबेंगे..." गाणं वाजलंच होतं, पण कॅसेट गुंडाळलं अन्...
14
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी चालवली रिक्षा
15
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूत सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
16
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
17
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
18
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
19
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
20
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या

पाकिस्तानमध्ये टोमॅटो 300 रूपये किलो; भारताकडून टॉमेटो खरेदी करणार नसल्याचं अन्न सुरक्षा मंत्र्यांचं वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2017 10:03 IST

पाकिस्तानात टॉमेटो 300 रूपये प्रतिकिलोने विकला जातो आहे.

ठळक मुद्देपाकिस्तान सध्या महागाईच्या भडका उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. टोमॅटो आणि कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत

लाहोर- पाकिस्तान सध्या महागाईच्या भडका उडाल्याचं पाहायला मिळतं आहे. तेथे टोमॅटो आणि कांद्यांचे भाव गगनाला भिडले आहेत. टॉमेटोचे दर ३०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. तरीही भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. पाकिस्तानचे अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात बोसान यांनी ही माहिती दिली. शेजारील देशाबरोबर तणावपूर्ण परिस्थिती असल्याने पाकिस्तानमधील सरकार कुठल्याही परिस्थितीत भाज्यांची आयात करणार नसल्याची माहिती समोर येते आहे. दरवर्षी भारतातून मागविलेल्या भाज्यांमुळे पाकिस्तानातील बाजारातील भाज्यांची मागणी पूर्ण होते. एक्स्प्रेस ट्रिब्यूनने हे वृत्त दिलं आहे.

पाकिस्तानच्या बाजारात गेल्या काही दिवसांपासून टॉमेटोची आयात कमी होत आहे. त्यामुळे देशातील अनेक भागांत टॉमेटो प्रतिकिलो ३०० रुपये दराने विकला जात आहे. लाहोर आणि पंजाबमध्ये 300 रूपये प्रतिकिलो दराने टोमॅटोची विक्री होते आहे. तर रावळपिंडी आणि इस्लामाबादमध्ये टोमॅटो 200 रूपये किलोने विकले जात आहेत.दरवर्षी पाकिस्तान भारताकडून टॉमेटोची आयात करतो. पण यावर्षी भारताकडून टॉमेटो आयात करणार नाही, अशी भूमिका पाकिस्तानने घेतली आहे. सीमेपलिकडून येणाऱ्या कंटेनरना देशात प्रवेश दिला जात नाही. त्यामुळे मागणी असूनही त्या तुलनेत पुरवठा होत नाही. आता फक्त सिंध प्रांतातील उत्पादित मालाची प्रतीक्षा येथील स्थानिक व्यापाऱ्यांना आहे.

पाकिस्तानातील टॉमेटो आणि कांद्याच्या तुटवड्याचे संकट येत्या काही दिवसांतच संपेल. बलुचिस्तानमधून लवकरच माल बाजारात येणार असल्याचं अन्न सुरक्षा मंत्री सिकंदर हयात  बोसन यांनी म्हंटलं आहे. आपण भारताकडून भाज्या आयात करणार नाही, असा पुनरुच्चार त्यांनी केला. लाहोर, पंजाब प्रांतातील विविध ठिकाणच्या बाजारांमध्ये टॉमेटोचे दर प्रतिकिलो ३०० रुपयांपर्यंत गेले आहेत.

काही दिवसांपूर्वीच येथील बाजारांमध्ये टॉमेटो १०० ते १२० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. तसेच सरकारने टॉमेटोचे दर १३२-१४० रुपये प्रतिकिलो निश्चित केला होता. भारताकडून टॉमेटो आयात न करण्याचा सरकारने घेतलेल्या निर्णयाचं लाहोर चेंबर्स ऑफ कॉमर्स अॅण्ड इंडस्ट्रीने (LCCI) स्वागत केलं आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना मदतच होणार आहे, असे एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हटलं आहे. हा निर्णय योग्यच असल्याचं  एलसीसीआयचे अध्यक्ष अब्दुल बसित यांनी म्हंटलं आहे.  

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndiaभारत