शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

बिहार: दिल्ली-कोलकाता महामार्गावर ३० किमीचा 'जम्बो ट्रॅफिक जाम'; हजारो वाहने अडकली !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 23:59 IST

Maga Traffic Jam in Bihar Highway: अन्न, पाण्यावाचून प्रवाशांला झाले हाल; २४ तासांत एक किमीही पुढे सरकली नाही वाहनांची रांग

Maga Traffic Jam in Bihar Highway: बिहारमधील कैमूर येथे दिल्ली कोलकाता महामार्गावर गेल्या २४ तासांपासून मोठी वाहतूक कोंडी झाल्याचे वृत्त आहे. हा जाम सुमारे ३० किमी लांब आहे. त्यात हजारो वाहने अडकली आहेत. यामध्ये महाकुंभाला जाणारे किंवा तेथून परतणारे लोक मोठ्या संख्येने आहेत. याशिवाय, या जाममध्ये असे अनेक रुग्ण आहेत, जे बनारसमधील BHU मध्ये उपचार घेण्यासाठी घराबाहेर पडले होते, परंतु ते या ट्रॅफिक जाममध्ये अडकले आहेत. सध्या वाहतूक पोलिस कर्मचारी आणि नागरी पोलिस एकत्रितपणे ही वाहतूककोंडी दूर करण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत.

जाममध्ये अडकलेल्या लोकांच्या मते, १२ फेब्रुवारी रोजी मौनी अमावस्येला महाकुंभात अमृत स्नान झाल्यानंतर त्यांना गर्दी कमी झाल्याचे वाटले. त्यांना रस्ते रिकामे मिळतील अशीही अपेक्षा होती. पण राष्ट्रीय महामार्ग १९ वर मोठी वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. शनिवारी दुपारपासून कैमूर जिल्ह्यात वाहतूक कोंडी सुरू झाली आणि आतापर्यंत हजारो वाहने या कोंडीत अडकली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, ही कोंडी सुमारे ३० किमी मागे आहे. कोंडीत अडकलेल्या अनेक प्रवाशांनी आणि ट्रक चालकांनी सांगितले की, काही जण रात्री उशिरापासून कोंडीत अडकले आहेत तर काहींना सकाळपासूनच अडचणी येत आहेत.

लोक अन्न, पाण्यावाचून बेहाल

एकदा कोंडीत अडकले की, लोकांना अन्न आणि पाण्याचीही वानवा होते. लोकांनी सोबत आणलेल्या पाण्याच्या बाटल्या संपल्या असल्याचे सध्याचे चित्र आहे. पोलिस कोंडी दूर करण्याचा प्रयत्न करत आहेत, परंतु आतापर्यंत कोणताही लक्षणीय परिणाम झालेला नसल्याचे बोलले जात आहे. या कोंडीत लहान-मोठ्या वाहनांसोबतच मालवाहू ट्रकही अडकले आहेत. तसेच बनारसला उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांना सर्वाधिक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जाममध्ये अडकलेले काही ट्रक ओडिशाला तर काही कोलकात्याला जात असल्याचे सांगण्यात आले आहे.

२४ तासांत वाहनांची रांग एक किमीही हलली नाही

कुंभमेळ्याला जाणाऱ्या प्रवाशांच्या मते, ते २४ तास जाममध्ये अडकलेले असतात. या जाममध्ये अडकल्यानंतर जवळ ठेवलेले अन्न आणि पाणी संपले आहे. जवळपास कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे, त्या लोकांनी आज साधे तोंडही धुतलेले नाही. दुसरीकडे, पश्चिम बंगालहून पर्यटक बसने महाकुंभला जाणाऱ्या यात्रेकरूंनी सांगितले की त्यांनी कैमूरपर्यंत आरामात प्रवास केला होता, परंतु येथे पोहोचल्यानंतर ते गेल्या दोन दिवसांपासून वाहतूक कोंडीत अडकले होते. या दोन दिवसांत ते एक किलोमीटरही प्रवास करू शकलेले नाहीत.

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाBiharबिहारTrafficवाहतूक कोंडीtraffic policeवाहतूक पोलीसPoliceपोलिसdelhiदिल्लीhighwayमहामार्ग