शहरं
Join us  
Trending Stories
1
भुवनेश्वर कुमारने शेवटच्या चेंडूवर मॅच जिंकवली, सनरायझर्स हैदराबादचा RR वर १ धावेने रोमहर्षक विजय
2
संजय निरुपम यांचं ठरलं, शिंदे गटात करणार प्रवेश
3
पालघरची जागा भाजपच्या खात्यात; राजेंद्र गावित यांना झटका, हेमंत सावरा यांना मिळाली उमेदवारी 
4
शेतमाल पिकवणारा टिकला पाहिजे; मोदी खाणाराला महत्त्व देतात पण पिकवणाराला नाही; पवारांचा हल्लाबोल 
5
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
6
...ताईंनी  हे एकच हक्काचं काम केलं, भाजप नेत्या चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळे यांच्यावर टीका
7
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
8
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
9
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
10
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
11
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
12
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
13
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
14
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
15
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
16
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
17
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
18
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
19
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
20
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य

भाजपाच्या काळात 27 रेल्वे दुर्घटनेत 259 प्रवाशांचा मृत्यू, काँग्रेसचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2017 2:25 PM

काल उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 40  हून अधिक जखमी झाले.

नवी दिल्ली, दि. 20 - काल उत्तर प्रदेशातील मुजफ्फरनगर जवळील खतौली स्टेशन येथे पुरी-उत्कल एक्स्प्रेसचे जवळपास 10 डबे रुळावरुन घसरुन झालेल्या अपघातात 23 जणांचा मृत्यू तर 40  हून अधिक जखमी झाले. काँग्रेसनं या  रेल्वे दुर्घटनेवरुन केंद्र सरकाला अडचणीत पकडले आहे. काँग्रेसनं हाच मुद्दा पकडून भाजपावर घणाघाती टीका केली आहे. 2014 ला भाजपा सरकार सतेत आल्यापासून आतापर्यंत 27वी रेल्वे दुर्घटना झाली आहे. भाजपाने रेल्वे दुर्घटनेचा रेकॉर्ड बनवल्याचा आरोप काँग्रेसनं केला आहे. 2014 पासून झालेल्या 27 दुर्घटनेत आतापर्यंत 259 प्रवाशांचा मृत्यू झाला तर 899 जण जखमी झाल्याची माहिती काँग्रेसनं दिली आहे. काँग्रेस प्रवाक्ता रणदीप सुरजेवाला यांनी ट्विट करत रेल्वे दुर्घटनेचा चांगलाच समाचार घेतला. रेल्वे दुर्घटना होत आहेत आणि लोकांचा जीव जात आहे, हे सरकार कधी जाणार असा प्रश्नही ट्विटद्वारे उपस्थित केला. काँग्रेस प्रवाक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केलेल्या एका ट्विटमध्ये असे म्हटले आहे की,  उत्कल एक्स्प्रेस दुर्घटनेत मृत पावलेल्या प्रवाशांच्या कुटुंबियाप्रति शोक संवेदना व्यक्त करतो. मृत पावलेल्या प्रवाशांच्या आत्म्याला शांती लाभो. या अपघातात अनेक निर्दोषांचा मृत्यू झाला. रेल्वे सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. सुरजेवालाने माध्यमांशी बोलातान सांगितले की, या अपघातात मृत्यू पावलेल्यांच्या कुटुंबियाना सरकार आर्थिक मदत करेल पण पैशांनी त्यांचा जीव परत येणार नाही. सतत घडणाऱ्या या रेल्वे अपघातानां रोखण्यासाठी सरकार काय उपाययोजना करत आहे. 

अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपये देण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे, तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये देण्यात येतील. तर रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले असून, दोषींविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

उत्कल एक्स्प्रेस अपघातप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात कलम '३०४ ए' अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रेल्वे रुळावर काम सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे, उद्यापासून सुरक्षा आयुक्त घटनेची चौकशी करणार आहे. आज रात्री १० वाजेपर्यंत यांनी स्पष्ट केलं आहे. 

टॅग्स :BJPभाजपाSuresh Prabhuसुरेश प्रभूIndian Railwayभारतीय रेल्वेRailway Passengerरेल्वे प्रवासी