शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सची १० वर्षांनी स्वप्नपूर्ती! गौतम गंभीरनं केला कुणालाच न जमलेला करिष्मा
2
पुण्यातून भाजपला कितीचं लीड मिळणार?; मुरलीधर मोहोळांनी सांगितला आकडा  
3
व्वा! मानलं आजी...साठीच्या वयात दिली परीक्षा अन् पटकावले ९८ टक्के गुण! 
4
केकेआरच्या बॉलर्सनी बुकींच्या तिजोरीत ओतली कोट्यवधींची गंगाजळी
5
Kavya Maran रडली, पण SRH च्या खेळाडूंचे मनोबल उंचावण्यासाठी रोखला अश्रूंचा बांध, Video 
6
मतमोजणीवेळी बीडमधील 'या' अधिकाऱ्यांना दूर ठेवा; बजरंग सोनवणेंची निवडणूक आयोगाकडे मागणी
7
हैदराबादची हाराकिरी, विराट कोहलीची चांदी! IPL इतिहासात नोंदवला विक्रम भारी 
8
आयर्लंडला जाणारी कतार एअरवेजची फ्लाइट टर्ब्युलन्समध्ये अडकली, 12 जखमी...
9
'रेमल' चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर हाय अलर्ट; पंतप्रधान मोदींनी बोलावली आढावा बैठक
10
KKR vs SRH Final : मिचेल स्टार्कने टाकला Ball of the season! हैदराबादचे ३ फलंदाज तंबूत, Video 
11
मिचेल स्टार्कमुळे जान्हवी कपूर निराश झाली; तिचा Video पाहून बेस्ट ॲक्टिंग पुरस्काराची होतेय मागणी 
12
राजस्थानमध्ये भीषण गरमी; भारत-पाक बॉर्डरवर 55 डिग्री तापमानात BSF जवानांची देशसेवा...
13
भांग पिऊन विमानात चढला अन्..., IndiGo फ्लाइटमध्ये प्रवाशाचा गोंधळ!
14
घरोघरी जात दूध विकलं; मजुरी करणाऱ्या 'त्याने' आज ८०० कोटींचा व्यवसाय उभारला
15
ओडिशात भाजपा उमेदवारावर ईव्हीएमची तोडफोड केल्याचा आरोप, तुरुंगात रवानगी
16
रिषभ पंत आनंदाने केक भरवायला गेला अन् रोहित शर्माने नकार दिला, म्हणाला... Video Viral  
17
ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांना मोठा धक्का, निवडणुकीपूर्वी 78 नेत्यांनी साथ सोडली
18
धोखेबाज नवरदेव! २ बायका फजिती ऐका; तिसरे लग्न करताना 'डाव' फसला, दोन्ही पत्नींची एन्ट्री
19
टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास मी तयार, पण...; गौतम गंभीरची BCCI समोर अट 
20
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

रिटेल क्षेत्रातील २ लाख कामगार बेकार होणार?

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2020 5:50 AM

लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्री क्षेत्रातील दोन लाख कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : कोरोना साथीच्या निर्मूलनासाठी लागू करण्यात आलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन सर्वांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असल्याने देशभरात त्याचे पालन होत आहे. असे असले, तरी त्याची दुसरी बाजूही विचार करायला लावणारी आहे. लॉकडाऊनमुळे सर्वच क्षेत्रांना फटका बसला असून, देशातल्या किरकोळ विक्री क्षेत्रातील ४० टक्के म्हणजे, दोन लाख कामगार बेकार होण्याची शक्यता रिटेलर्स असोसिएशन आॅफ इंडियाने (आरएआय) व्यक्त केली आहे.आरएआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन यांनी सांगितले की, देशातील किरकोळ विक्री क्षेत्रामध्ये ६० लाख कामगार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे किरकोळ क्षेत्रातील वस्तूंची विक्री कमी झाली असून, त्यामुळे कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. देशातील ७५ जिल्ह्यांमध्ये येत्या काही दिवसांत परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील अनेक व्यापारी कपडे, ज्वेलरी आदींची विक्री करतात. त्यांच्या उत्पन्नात टाळेबंदीमुळे ७५ टक्के घट झाल्याचा दावा राजगोपालन यांनी केला.ते म्हणाले की, लॉकडाऊनमुळे किरकोळ विक्री क्षेत्रातील दोन लाख कामगारांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता असल्याने हे टाळण्यासाठी केंद्र सरकारने त्वरित हस्तक्षेप करून परिस्थितीत सुधारणा केली पाहिजे.सरकारकडे सवलतींची मागणीकिरकोळ व्यापाऱ्यांना कर्जाचे हप्ते, तसेच जीएसटीचा भरणा करण्यात केंद्र सरकारने काही काळ सवलत द्यावी. तसे न झाल्यास या व्यापाºयांच्या उत्पन्नात आगामी सहा महिन्यांत ९० टक्के घट होईल, अशी भीती आरएआयने व्यक्त केली आहे. आरएआय या संस्थेमध्ये किरकोळ विक्री करणारे पाच लाख दुकानदार सदस्य आहेत. त्यामध्ये व्ही. मार्ट, शॉपर स्टॉप, फ्युचर ग्रुप, अ‍ॅव्हेन्यू सुपरमार्ट्स आदींचा समावेश आहे. किरकोळ विक्री क्षेत्रातील महत्त्वाच्या अन्य कंपन्यांनी कोरोना साथीमुळे आपले उत्पन्न घटल्याचे याआधीच जाहीर केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या