शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
2
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
3
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
4
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
5
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
6
"सरकार निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचे काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
7
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."
8
VIDEO: अरे देवा... माकडाने ट्रेकरला मध्येच गाठलं, आधी बॅग उचकली, मग पाठीवर चढलं अन् मग...
9
धक्कादायक! या डेटिंग ॲपवरून महिलांचे हजारो फोटो लीक, प्रायव्हसी आली धोक्यात
10
'संपत्तीचे पुरावे देतो चौकशी करा'; एकनाथ खडसे म्हणाले, 'महिलांबाबत गिरीश महाजनांचे नाव पुढे का येतं?'
11
फणस खाणं महागात पडलं, ड्रिंक अँड ड्राइव्हमध्ये पकडलं; चालकांसोबत नेमकं काय घडलं?
12
१ ऑगस्टपासून लागू होणार नवे नियम, क्रेडिट कार्ड, यूपीआय, एलपीजीसह होणार हे ६ बदल, खबरदारी न घेतल्यास खिसा होणार रिकामा
13
वाल्मिक कराडचा जेलमधून माझ्यासमोर एकाला फोन आला; अंबादास दानवेंचा खळबळजनक दावा
14
सॉवरेन गोल्ड बाँडची कमाल...! ८ वर्षांत दिला २५०% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
15
Raja Raghuvanshi : "राजाचा आत्मा अजूनही भटकतोय", भावाचा मोठा दावा; हत्येच्या ठिकाणी कुटुंबाने केलं असं काही...
16
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
17
टेलिव्हिजनवरील या अभिनेत्रीला लागला मोठा जॅकपॉट, रणबीरच्या 'रामायण'मध्ये झाली एन्ट्री
18
हृदयद्रावक! "माझी दोन्ही मुलं गेली, देवाने मला...", आईचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश
19
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
20
Shravan Somvar 2025: श्रावण सोमवारनिमित्त मित्रांना, नातेवाईकांना पाठवा श्लोकरूपी शुभेच्छा संदेश!

आजच्याच दिवशी भारतानं हाजीपीरवर रोवला होता तिरंगा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2020 18:22 IST

1965च्या युद्धावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता. भारतीय जवानांतही  जबरदस्त उत्साह संचारला होता. हे युद्ध एप्रिल 1965 ते सप्टेंबर 1965 दरम्यान लढले गेले. 

ठळक मुद्दे1965च्या युद्धाच्यावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता.भारतीय जवान पीओकेमध्ये तब्बल 8 किलोमीटर आत घुसले होते.जबरदस्त लढाईनंतर कंपनीला कब्जा करण्यात यश

आजपासून बरोबर 54 वर्षांपूर्वी भारतीय जवानांनी पाकिस्तानसोबतच्या युद्धात हाजीपीरवर कब्जा करत तेथे तिरंगा ध्वज फडकावला होता. 28 ऑगस्त, 1965 रोजी भारतीय जवान पीओकेमध्ये तब्बल 8 किलोमीटर आत घुसले होते आणि त्यांनी हाजीपीरसह इतरही अनेक पोस्टवर तिरंगा फडकावला होता. 

1965च्या युद्धावेळी देशातील बालकांपासून ते वृद्ध आणि जवानांपर्यंत प्रत्येक जण युद्धासाठी तयार झाला होता. भारतीय जवानांतही  जबरदस्त उत्साह संचारला होता. हे युद्ध एप्रिल 1965 ते सप्टेंबर 1965 दरम्यान लढले गेले. या युद्धाचे वैशिष्ट्य म्हणजे, दुसऱ्या महायुद्धानंतर याच युद्धात रणगाड्यांचा सर्वाधिक वापर करण्यात आला होता. 

या युद्धावेळी, मेजर रंजीत सिंह दयाल हे 1 पॅराच्या जवानांचे नेतृत्व करत होते. ते हैदराबाद नाल्याच्या दिशेने कूच करत होते. यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता आणि त्यांच्याकडे खाण्यासाठी केवळ शंकरपाळे आणि बिस्किट एवढेच साहित्य होते. मात्र, त्यांचे अंतिम लक्ष होते, हाजीपीर पास.

तेव्हा भारत आणि पाकिस्तान दोघेही हाजीपीर पासला अभेद्य मानत होते. हा पास अशा ठिकाणी होता, जेथे अगदी कमी जवानांसह प्रबळातील प्रबळ शत्रूपासूनही बचाव करणे सहज शक्य होते. कारण हाजीपीर पासवर चढण्याचा मार्ग निसरडा, खोल आणि लांब होता. केवळ अंधाऱ्या रात्रीच तेथपर्यंत पोहोचण्याचा विचार केला जाऊ शकत होता. 

धो-धो बरसणारा पाऊस आणि काळोखाची रात्र, अशा परिस्थितीत मेजर दयाल यांना सकाळपर्यंत हाजीपीर पासच्या शिखरावर पोहोचायचे होते. या ऑपरेशनला उशीर झाला असता आणि दिवस उजाडला असता, तर हे सर्व जवान अगदी सहजपणे शिखरावर असलेल्या पाकिस्तानी सैनिकांची शिकार ठरले असते.

...म्हणून महत्वाचे होते हाजीपीर -पहाडांतील लढाई नेहमीच शिखरांवर लढली जाते. यामुळे रणनीतीच्या  दृष्टीने शिखरांवर कब्जा असने महत्वाचे असते. कारण शिखरांवर शत्रू असेल तर त्याच्यापासून स्वतःचा बचाव करणे अत्यंत अवघड असते.

हाजीपीरवर कब्जा असेल, तर तेथून पुंछ ते श्रीनगर अंतर केवळ 50 ते 55 किलो मीटर एवढे आहे. मात्र, हाजीपीरवर कब्जा नसेल, तर पुंछ येथून श्रीनगरला जाण्यासाठी जम्मूला जावे लागते आणि मग तेथून श्रीनगर आणि नंतर उरीला जावे लागते. हा रस्ता जवळपास 600 ते 650 किलोमीटर एवढा लांब आहे. 

दोन बाजूंनी हल्ला करण्याची योजना -युद्धाच्या वेळी या हाजीपीरवर कब्जा करण्यासाठी दोन बाजूंनी हल्ला करण्याची योजना तयार करण्यात आली होती. यात, पश्चिमेकडून 1 पॅराला शिखरावर कब्जा करण्याचा आदेश देण्यात आला होता. तर पंजाब रेजिमेंटला हल्ला करण्याचा आदेश देण्यात आला होता. 

जबरदस्त लढाईनंतर कंपनीला कब्जा करण्यात यश -येथे जबरदस्त लढाई झाल्यानंतर अरविंदर सिंह यांच्या कंपनीला कब्जा करण्यात यश मिळाले. यानंतर त्यांचे येथील काम संपले. हाजीपीरवर दुसरीच कंपनी हल्ला करणार होती. मात्र, मेजर दयाल यांनी आपल्या कंपनीला हाजीपीरवर हल्ला करण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली. त्यांच्या समोर जवळपास 1500 फुटांची सरळ चढाई होती. मात्र, परवानगी मिळाल्यानंतर दयाल यांच्या कंपनीने चढाईला सुरुवात केली. यावेळी त्यांना रस्त्यातच एक झोपडी दिसली. त्यातून आवाज येत होता. त्यात 11 पाकिस्तानी सैनिक होते. त्यांना भारतीय जवानांनी घेरून ताब्यात घेतले. 

यानंतर, सकाळी 8 वाजता दयाल यांची कंपनी शिखरावर पोहोचली. तोपर्यंत पाकिस्तानी सैनिकांनी दारूगोळा सोडून तेथून पळ काढला होता. यासंपूर्ण काळात बंदी केलेल्या सैनिकांचा भारतीय सैनिकांनी आपल्याकडील साहित्य उचलण्यासाठी वापर केला. हाजीपीर येथील पराक्रमासाठी मेजर आरएस दयाल यांना नंतर महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

केवळ 65 जवानांसह केला हल्ला -  यासंदर्भात मेजर अरविंदर सिंग यांनी सांगितले आहे, की त्यांनी तेथे जे पाहिले, ते पाहून त्यांच्या पायाखालची मातीच सरकली. कारण तेथे मोठ्या प्रमाणावर पाकिस्तानी सैनिक भारतीय जवानांवर हल्ला करण्याच्या तयारीत होते. पण अरविंदर यांच्याकडे केवळ 65 जवन होते. अरविंदर यांनी सांगितले आहे, की आमची पाकिस्तानी सैनिकांशी हातानेच लढाई झाली. यात भारताच्या 23 जवानांचे नुकसान झाले. मात्र आम्ही हाजीपीरवर पूर्णपणे नियंत्रण मिळवते. यानंतर भारतीय जवानांत पायावर उभे राहण्याचेही त्राण उरले नव्हते.माझ्यावरही ग्रेनेट हल्ला झाला होता. यात माझ्या पायाचा एक भागही उडाला होता. गंभीर दुखापत झाली होती. मात्र, तरीही मला वेदना होत नव्हती, असेही अरविंदर यांनी सांगितले आहे.

महत्त्वाच्या बातम्या -

घरमालक अन् भाडेकरूंच्या दादागिरीचे दिवस संपणार! मोदी सरकार एका महिन्यात 'हा' नवा कायदा आणणार

कर्नाटकात पुन्हा वाद पेटला, रात्रीतूनच छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बसवला रायन्नांचा पुतळा

मोठं यश! वैज्ञानिकांनी शोधून काढली कोरोनापासून बचाव करणारी अँटीबॉडी, असं रोखते संक्रमण

आता अमेरिकेतील शाळा-महाविद्यालयांत पसरला कोरोना, हजारो विद्यार्थ्यांसह शिक्षकही क्वारंटाइन

खूशखबर! देशात लवकरच स्वस्त होऊ शकतात बाइक्स अन् मोपेड, हे आहे कारण

CoronaVaccine News: जबरदस्त! रशियानं तयार केली दुसरी कोरोना लस, कुठलेही साइड इफेक्‍ट नसल्याचा दावा

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानSoldierसैनिकIndiaभारतPakistanपाकिस्तान