शहरं
Join us  
Trending Stories
1
कलिंगड आणि बिर्याणीची 'निर्दोष' मुक्तता! फॉरेन्सिक रिपोर्टमध्ये मोठं सत्य उघड; मृत्यूचं नेमकं कारण काय?
2
Eknath Shinde Helicopter : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर वादळामुळे भरकटले; पायलटने प्रसंगावधान राखत केले यशस्वी लँडिंग
3
Hantavirus Outbreak : जगावर नवं संकट! 'हंटा व्हायरस'चा भीषण उद्रेक; जहाजावरील प्रवाशांचे पलायन, आता संसर्गाचा मोठा धोका
4
Ashok Kharat ED Action: भोंदूबाबाचं घबाड उघड! अशोक खरातच्या लॉकरमध्ये सापडला सोन्याचा डोंगर; ईडीने ३ कोटींचे दागिने केले जप्त
5
पार्किंगचा दर ऐकून गाडी घरीच ठेवाल! ४० टक्के दरवाढीचा झटका; सर्व प्रकारच्या वाहनांसाठी नवे दर लागू
6
कलेक्टरच निघाला घोटाळ्याचा मास्टरमाईंड! बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक अटकेत; ७३ कोटींचा असा झाला गोलमाल
7
विजयसमोर बहुमताचे त्रांगडे, तामिळनाडूत अडले सत्तेचे घोडे : बहुमतच नसताना सरकारसाठी पाचारण करणार कसे?
8
मोठी बातमी! नाशिक TCS प्रकरणातील मुख्य संशयित निदा खानला अटक; २५ दिवसांपासून होती फरार
9
“...तर सामूहिक राजीनामे देऊ”, TVK आमदारांचा थेट इशारा; विजयसमोर मोठाच पेच, घडामोडींना वेग!
10
IPL 2026 : LSG अभी जिंदा है...! गत चॅम्पियन RCB च्या संघाने पराभवासह 'नंबर वन'ची संधी गमावली
11
जगापासून लपवले, सॅटेलाइटने सगळे टिपले; इराण हल्ल्यात अमेरिकेची १५ तळावरील २२८ ठिकाणे बेचिराख
12
“भारत-व्हिएतनाम संबंध अधिक दृढ करण्यासाठी महाराष्ट्र कटिबद्ध”: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
13
धक्कादायक! काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याचा महिला आमदाराला जबरदस्ती मिठी मारण्याचा प्रयत्न; धक्का देत केलं दूर, VIDEO व्हायरल
14
प्रिन्ससमोर 'किंग' चारीमुंड्याचित! अचूक टप्पा अन् काही कळण्याआधीच विराट कोहलीचा त्रिफळा उडला (VIDEO)
15
पश्चिम बंगालमध्ये ममता राज संपुष्टात! राज्यपालांकडून मंत्रिमंडळ बरखास्त; आता होणार भाजप युगाची सुरुवात
16
मिचेल मार्शचं वादळी शतक! LSG नं २०९ धावा केल्यावर RCB ला मिळालं २१३ धावांचं लक्ष्य; कारण...
17
गुंतवणूकदारांची चांदी! देशातील सर्वात महागड्या शेअरकडून 'डिविडेंड' जाहीर, एका स्टॉकची किंमत १३००००; किती मिळणार लाभांश?
18
Mitchell Marsh Fastest Century: मिचेल मार्शचा मोठा पराक्रम; जलद शतकी खेळीसह रिषभ पंतचा विक्रम मोडला
19
“२०२९ला सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपद अन् बारामतीच्या उमेदवार असतील”; जय पवारांचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

१९... पेंच

By admin | Updated: December 19, 2014 22:56 IST

(फोटो)

(फोटो)
पेंच प्रकल्पाच्या दुरुस्तीवर अत्यल्प खर्च
नवेगावखैरीतील पेंचप्रकल्प जलाशय वार्धक्याकडे झुकला
* ४५ वर्षांत कोट्यवधींच्या नफ्यातूनही दुरुस्तीवर खर्च नाही
चंद्रशेखर गिरडकर ० पारशिवनी
तालुक्यातील नवेगाव (खैरी) येथील पेंच प्रकल्प नागपूर व भंडारा जिल्ह्यासाठी वरदान ठरला आहे. या जलाशयाच्या निर्मितीला ४५ वर्षे पूर्ण झाली आहेत. या काळात या प्रकल्पाने कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवून दिले. तुलनेत प्रकल्पाच्या दुरुस्तीवर फारसा खर्च करण्यात आला नाही.
पेंच प्रकल्पाला ऑगस्ट १९६९ मध्ये मंजुरी देण्यात आली. पेंचप्रकल्प ते तोतलाडोहपर्यंतचे ४६६१.५ चौ.कि.मी १८०० चौरस मैलाएवढी व्याप्ती असलेला हा परिसर आहे. सुरुवातीला मातीचे धरण १६३९ मीटर लांब, महत्तम उंची २६.८ मीटर धरणाचे बांधकाम प्रस्तावित होते. या बांधकामासाठी सन १९७९ मध्ये २५० कोटी रुपये खर्च प्रस्तावित होता. या परिसरातील सरासरी पर्जन्यमान १२०० मि.मी. व पेंच जलाशयातील पाणी साठवण्याची क्षमता २.३० दशलक्ष घनमीटरएवढी अंदाजित होती. प्रकल्पबाधित १२ गावापैकी पारशिवनी तालुक्यातील पाच गावे आहेत.
या प्रकल्पाच्या पाण्यावर नागपूर तालुक्यातील ३८३ हेक्टर, कामठी - १९.२०७ हेक्टर, सावनेर - ३.९०७ हेक्टर, पारशिवनी - १९.७१२ हेक्टर, रामटेक व मौदा - ३४.४६२ हेक्टर, भंडारा-९.३७७ हेक्टर, मोहाडी - १२.0२३ हेक्टर असे एकूण १, ०४,४७६ हेक्टर शेतीचे ओलित केले जाते. दरवर्षी मध्य प्रदेश व महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या तोतलाडोह येथील जलाशयातील पाण्यातून ९६५ दशलक्ष घनमीटर पाणी पेंचप्रकल्प जलाशयात सोडल्या जाते. त्यापैकी ६८९ दशलक्ष घनमीटर पाणी शेतीसाठी दिले जाते. ज्यापासून सहा कोटी रुपये पाणसारा दरवर्षी शासनाला मिळतो.
नागपूर शहरासाठी ११२ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठ्यापासून ५० ते ६० हजार रुपये प्रति दिवस महसूल मिळतो. कोराडी व खापरखेडा येथील वीजनिर्मिती केंद्राला १२७ दशलक्ष घनमीटर पाणीपुरवठा केला जातो. नवेगावखैरी येथील मत्स्यबीज प्रजनन केंद्राला दोन दशलक्ष घनमीटर व भंडारा येथील सनफ्लॅग कंपनीला दोन दशलक्ष घनमीटर एवढा पाणीपुरवठा केला जातो. त्यापासून दरवर्षी पाटबंधारे विभागाला १७ ते १८ कोटी रुपयांचा महसूल मिळतो. जमा झालेल्या रकमेपैकी २० टक्के महसूल नागपूर जिल्हा परिषदेच्या सेसफंडात जमा केला जातो. लाभक्षेत्र कालव्यांच्या असंख्य जलवाहिन्यांच्या जाळ्यांच्या माध्यमातून शेतीसाठी पाणीपुरवठा करण्यात येतो. खरीप व रब्बी हंगामात विक्रमी उत्पादन घेतल्या जाते.