शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीय महामार्गासाठी १६ हजार ५८२ कोटी मंजूर रक्षा खडसे व ए.टी. पाटील यांची माहिती: २५ जानेवारी रोजी नितीन गडकरी करणार कामांचा शुभारंभ

By admin | Updated: January 11, 2016 00:23 IST

महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून १६ हजार ५८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.

जळगाव: जिल्‘ातून जाणारे राष्ट्रीय व राज्य महामार्गाच्या कामासाठी केंद्र सरकारकडून १६ हजार ५८२ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. यात काही राज्य मार्गांचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर करण्यात आले आहे. या कामांचा शुभारंभ २५ जानेवारी रोजी केंद्रीय वाहतूक व रस्ते मंत्री नितीन गडकरी यांच्याहस्ते होणार असल्याची माहिती खासदार रक्षा खडसे व ए.टी.पाटील यांनी रविवारी दिली.सागर पार्कवर होणार सभाभाजप कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेला आमदार सुरेश भोळे, आमदार स्मिता वाघ, भाजपा जिल्हाध्यक्ष उदय वाघ व सरचिटणीस दीपक फालक आदी उपस्थित होते. या कामांच्या शुभारंभांसाठी सागर पार्कवर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. निवडणुकीच्या काळात दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यात आल्याचे यावेळी खासदारांनी सांगितले. राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतरपहूर, बोदवड, मुक्ताईनगर, बर्‍हाणपूर, अंकलेश्वर, सिल्लोड, औरंगाबाद आदी राज्य मार्गाचे राष्ट्रीय महामार्गात रुपांतर झाले आहे.शहरात तीन ठिकाणी उड्डाणपूलया निधीतूनच जळगाव शहरातून जाणार्‍या रस्त्यावर बांभोरी ते नशिराबाद नाक्यापर्यंत १७ कि.मी.च्या अंतरात तीन उड्डाणपुल उभारण्यात येणारआहेत. कालिंका माता ते अजिंठा चौक, इच्छादेवी ते आकाशवाणी चौक व बांभोरी अभियांत्रिकी महाविद्यालय या ठिकाणी हे उड्डाणपुल असतील. त्यासाठी ४१५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत,अशी माहिती खासदारांनी दिली. 

भुसावळला प्लॉस्टिक पार्कजिल्‘ातील प्लास्टीक उद्योगाला चालना देण्यासाठी भुसावळला एमआयडीसीत प्लॉस्टिक पार्कचाही प्रस्ताव आहे. हे काम अंतिम टप्यात आले आहे. केंद्र सरकारने देशात अहमदाबाद, वाराणसी व जळगाव अशी तीन जिल्‘ांची निवड केली आहे. टेक्सटाईल्स पार्क हा जामनेर तालुक्यातच होणार असल्याचा पुनरुच्चार खासदारांनी केला.असा आहे मार्ग व निधीपहूर, जामनेर,बोदवड, मुक्ताईनगर,बर्‍हाणपूर या ७५ कि.मी.रस्त्यासाठी ७५० कोटी रुपये, नांदुरा-बर्‍हाणपूर या महाराष्ट्र सिमेला जोडणार्‍या १४५ कि.मी.च्या रस्त्यासाठी १४५० कोटी, इंदूर, बर्‍हाणपूर, पिंप्री, मुक्ताईनगर या ४०१ कि.मी.साठी ३२६० कोटी, बोदवड, जामनेर, पहुर, अजिंठा, सिल्लोड, औरंगाबाद ४०१ कि.मी.च्या मार्गासाठी ३२६० कोटी, औरंगाबाद, फुलंब्री,जळगाव या १५५ कि.मी.साठी ४००० कोटी,बर्‍हाणपूर, रावेर,चोपडा, शिरपूर, सावदा, नंदुरबार, देडीपाडा, अंकलेश्वर या ५५५ कि.मी.साठी ४३५० यासह राष्ट्रीय महागार्ग २११ औरंगाबाद, चाळीसगाव ,धुळे या १५३ कि.मी.साठी २१७६ कोटी, चाळीसगाव घाटात १४ कि.मी. रस्ते व रेल्वेचा संयुक्त प्रकल्पासाठी १७५० कोटी रुपये मंजूर झाले असल्याचीमाहितीखासदारांनीदिली.