शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर; 15 जणांचा मृत्यू; 133 इमारती कोसळल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2019 11:42 AM

उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

ठळक मुद्देसलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वादळी वारा आणि वीज पडल्यामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे.तब्बल 133 इमारती कोसळल्या असल्याने अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

लखनऊ - उत्तर प्रदेशमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. सलग तीन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. 14 जिल्ह्यांना या जोरदार पावसाचा फटका बसला आहे. वादळी वारा आणि वीज पडल्यामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहेत तर अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. तब्बल 133 इमारती कोसळल्या असल्याने अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन दिवसांपासून उत्तर प्रदेशमधील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पाऊस पडत आहे. एकंदरीत पावसामुळे आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. जोरदार पावसाचा फटका हा जनावरांना देखील मोठ्या प्रमाणात बसला आहे. 133 इमारती कोसळल्या आहेत. अनेकजण जखमी झाले असून  सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जनजीवन विस्कळीत झाले आहे. नागरिकांची घरं आणि सार्वजनिक मालमत्ता यांचे मोठे नुकसान झाले आहे. 

उन्नाव, आंबेडकर नगर, प्रयागराज, बाराबंकी, हरदोई, लखीमपूर खीरी, गोरखपूर, कानपूर नगर, पीलीभीत, सोनभद्र, चंदौली, फिरोजाबाद, मऊ आणि सुल्तानपूर या जिल्ह्यांना जोरदार पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. रस्त्यावरील झाडं उन्मळून पडली आहेत. तसेच परिसराचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने येत्या काही दिवसांत अशाच पद्धतीचा जोरदार पाऊस पडेल असा अंदाज व्यक्त केला आहे. तसेच पुढच्या पाच दिवसांत उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

आसाममध्ये देखील मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माम झाली आहे. ब्रह्मपुत्रा नदीला आलेल्या पुरामुळे अनेक जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. जवळपास चार लाख लोकांना जोरदार पावसाचा फटका बसला आहे. आसामच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाने  धेमाजी, लखीमपूर, विश्वनाथ, नलबारी, चिरांग, गोलाघाट, मजुली, जोरहाट, दिब्रुगड, नागाव, मोरीगाव, कोक्राझर, बोंगाईगाव, बाकसा, सोनितपूर, दरांग आणि बारपेटा हे जिल्ह्यांना पावसाचा फटका बसल्याची माहिती दिली आहे. पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 

 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशRainपाऊसDeathमृत्यू