शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
2
बेपर्वाईचे १४ बळी,७८ जखमी; घाटकोपरला पेट्रोल पंपावर होर्डिंग कोसळले, अवकाळी पावसाचा तडाखा
3
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता
4
महामुंबईला अवकाळीचा तडाखा; मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, रायगड, पालघरला पावसाने झोडपले
5
राज्यभरातील होर्डिंगचे स्ट्रक्चरल ऑडिट करा: CM एकनाथ शिंदे, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
6
“मुझे बचाव, मैं शेड के नीचे फस गया हूँ”; होर्डिंगखाली दबलेल्या जखमीची सुटका
7
...तर पाकला हातात बांगड्या घालायला लावू! अणुशक्तीवरुन इंडिया आघाडीवर PM मोदींचा घणाघात
8
महाराष्ट्रात टक्का वाढेना; देशातील ९६ मतदारसंघात सरासरी ६६ टक्के मतदान
9
खिचडी सरकारकडून १२ लाख कोटींचा घोटाळा; अमित शाह यांचा महाआघाडीवर आरोप
10
प्रश्न: विवाह कधी करणार? राहुल गांधी म्हणाले, आता लवकरच करावा लागेल...
11
चुका नेहरूंच्या, मोदींना दोष कशासाठी? परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, काँग्रेसकडून जनतेची दिशाभूल
12
सकाळी लोकलने, संध्याकाळी पावसाने मुंबईकरांना झोडपले; मध्य रेल्वेवर लोकल गोंधळामुळे तारांबळ
13
वादळी पावसाने मुंबईची अवस्था वाईट; हवामान खाते म्हणते, “आम्ही अलर्ट दिला होता”
14
जैन समाजाच्या समस्या सोडवण्यास नेहमीच तत्पर राहू; देवेंद्र फडणवीस, प्रमोद सावंत यांची हमी
15
“पीयूष गोयल मुंबईसह राज्याच्या विकासासाठी प्रयत्न करतील”; CM एकनाथ शिंदे यांना विश्वास
16
नरेंद्र मोदींनाही ७५ वर्षांनंतर राजकारणातून निवृत्त करणार का?: रमेश चेन्नीथला यांचा सवाल
17
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
18
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
19
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
20
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा

पाक सीमेलगत भारत बांधणार १४ हजार बंकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 08, 2018 1:06 AM

पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणारा गोळीबार व तोफगोळ््यांचा मारा यांपासून सीमाभागात राहणाºया नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळील गावांमध्ये १४ हजार भूमीगत आश्रयस्थळे (बंकर) बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.

जम्मू : पाकिस्तानी लष्कराकडून वारंवार होणारा गोळीबार व तोफगोळ््यांचा मारा यांपासून सीमाभागात राहणाºया नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी जम्मू विभागातील आंतरराष्ट्रीय सीमा व प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळील गावांमध्ये १४ हजार भूमीगत आश्रयस्थळे (बंकर) बांधण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे.यासंदर्भात सूत्रांनी सांगितले की, पूँछ व राजौरी या दोन जिल्ह्यांमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत ७,२९८ बंकर बांधण्यात येणार आहेत. तर जम्मू, कठुआ व सांबा जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेलगत ७,१६२ भूमीगत बंकर बांधण्यात येतील. भारत व पाकिस्तान दरम्यान ३३२३ किमी लांबीची सीमा आहे. त्यातील जम्मू-काश्मिर भागामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेचे क्षेत्र ७४० किमी व आंतरराष्ट्रीय सीमेचे क्षेत्र २२१ किमी आहे. गेल्या वर्षी शस्त्रसंधी मोडून पाकिस्तानी लष्कराने केलेल्या गोळीबारात ३५ जण ठार झाले होते. त्यामध्ये २३ जवान शहीद व १२ नागरिक ठार झाले होते. सीमेलगत बंकर बांधण्याचा निर्णयाचे भाजपा नेते जुगल किशोर शर्मा यांनी स्वागत केले आहे. जम्मू भागातील सीमेलगत बंकर बांधावेत अशी सीमावर्ती भागातील नागरिकांची मागणी होती. तिची तत्परतेने दखल घेतल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांचे जुगलकिशोर शर्मा यांनी आभार मानले आहेत.  

टॅग्स :Indian Armyभारतीय जवानPakistanपाकिस्तानIndiaभारत