शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

Atal Bihari Vajpayee Death: ...म्हणून वाजपेयींच्या आयुष्यात 13 क्रमांकाला होतं महत्त्वपूर्ण स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2018 18:29 IST

वाजपेयींच्या राजकीय कारकिर्दीत 13 क्रमांकाला अनन्यसाधारण महत्त्व

नवी दिल्ली: माजी पंतप्रधानअटलबिहारी वाजपेयी यांच्या राजकीय आयुष्यात 13 या क्रमाकांला अनन्यसाधारण महत्त्व आहे. अटलबिहारी यांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण घडामोडी या आकड्याभोवतीच फिरताना दिसतात. अनेकदा या क्रमांकामुळे वाजपेयींना फटका बसला. मात्र वाजपेयी याच आकड्याच्या मदतीनं त्यांनी अनेक संकटांवर मातही केली.अटलबिहारी वाजपेयींनी 13 मे 1996 रोजी पहिल्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. मात्र त्यांना बहुमत सिद्ध करता आलं नाही. त्यामुळे 13 दिवसांमध्ये त्यांना पंतप्रधानपद सोडावं लागलं. वाजपेयी दुसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी त्यांचं सरकार 13 महिन्यांमध्ये कोसळलं. वाजपेयी तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले, त्यावेळी 13 पक्षांनी त्यांना पाठिंबा दिला होता. 13 ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घ्यायची असं त्यांनी ठरवलं होतं. मात्र त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. 13 क्रमांक तुमच्यासाठी अशुभ आहे, असं सहकाऱ्यांनी वाजपेयींना सांगितलं. मात्र तरीही वाजपेयींनी ऑक्टोबर 1999 रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतली. यावेळी त्यांना पाच वर्षांचा कालावधी पूर्ण केला. हिंदू धर्मात 13 आकडा महत्त्वपूर्णहिंदू धर्मातील मान्यतेनुसार, 13 आकड्याला मोठं महत्त्व आहे. हिंदू दिनदर्शिकेनुसार, तेरावा दिवस त्रयोदशीचा असतो. त्रयोदशी पवित्र समजली जाते. त्रयोदशीला शंकरासाठी उपवास केला जातो. सुखसमृद्धी आणि ऐश्वर्य प्राप्तीसाठी या दिवशी व्रत केलं जातं. त्यामुळेच 13 या आकड्याला हिंदू धर्मात मोठं महत्त्व आहे. 

टॅग्स :Atal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीDeathमृत्यूprime ministerपंतप्रधानBJPभाजपाAIIMS hospitalएम्स रुग्णालय