शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
4
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
5
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
6
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
7
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
8
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
9
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
10
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
11
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
12
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
13
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
14
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
15
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
16
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
17
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
18
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
19
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
20
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI

देशात तीन वर्षांत १३ लाख मुली आणि महिला बेपत्ता, 'या' राज्यातून सर्वाधिक; केंद्र सरकारची संसदेत माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 18:19 IST

२०१९ ते २०२१ या तीन वर्षांत देशभरातून १३.१३ लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.

नवी दिल्ली : देशातील विविध राज्यांतून दरवर्षी हजारो मुली व महिला बेपत्ता होत आहेत. त्या कुठे जात आहे, काय करत आहे, त्यांच्यासोबत काय होत आहे, यासंदर्भात कोणालाच माहीत नाही. गेल्या आठवड्यात केंद्रीय गृह मंत्रालयाने संसदेत यासंबंधी काही आकडेवारी सादर केली आहे, ज्यावरून असे दिसून येते की २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत देशभरातून १३.१३ लाखांहून अधिक मुली आणि महिला बेपत्ता झाल्या आहेत.

सरकारने संसदेत दिलेल्या माहितीनुसार, बेपत्ता झालेल्या १०,६१,६४८ मुली आणि महिला १८ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या होत्या. तर २,५१,४३० या १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या होत्या. बेपत्ता मुलींच्या बाबतीत मध्य प्रदेश पहिल्या तर पश्चिम बंगाल दुसऱ्या क्रमांकावर आहे. या यादीत राजधानी दिल्लीचेही नाव आहे. आकडेवारीवर नजर टाकल्यास, २०१९ ते २०२१ या कालावधीत मध्य प्रदेशात एकूण १,६०,१८० महिला आणि ३८,२३४ मुली बेपत्ता झाल्या आहेत. 

याचबरोबर, पश्चिम बंगालमध्ये याच कालावधीत एकूण १,५६,९०५ महिला आणि ३६,६०६ मुली बेपत्ता झाल्या आहेत. तर महाराष्ट्रात हरवलेल्या मुली आणि महिलांची संख्या अनुक्रमे १३,०३३ आणि १,७८,४०० आहे. याशिवाय, २०१९ ते २०२१ दरम्यान ओडिशात एकूण ७०,२२२ महिला आणि ६१,६४९ मुली बेपत्ता झाल्याची नोंद झाली आहे. तर छत्तीसगडमध्ये ४९,११६ महिला आणि १०,८१७ मुली बेपत्ता झाल्या आहेत. 

दिल्लीत सुद्धा अनेक मुली व महिला बेपत्ता झाल्याची नोंद आहे. देशातील इतर केंद्रशासित प्रदेशांच्या तुलनेत दिल्लीत सर्वाधिक मुली बेपत्ता झाल्या आहेत. दिल्लीत २०१९ ते २०२१ या तीन वर्षांत ६१,०५४ महिला आणि २२,९१९ मुली बेपत्ता झाल्या. तर जम्मू-काश्मीरमध्ये ८,६१७ महिला आणि १,१४८ मुली बेपत्ता झाल्याची नोंद आहे.

महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम हाती - केंद्र सरकारदेशभरात महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक उपक्रम हाती घेण्यात आल्याचे केंद्र सरकारने संसदेत सांगितले आहे. ज्यामध्ये लैंगिक गुन्हे रोखण्यासाठी पूर्वीचे कायदे दुरुस्त करून ते अधिक कडक करण्यात आले आहेत. यासोबतच १२ वर्षांखालील मुलींवर झालेल्या बलात्काराच्या घटनेत दोषींना फाशीच्या शिक्षेसह इतर अनेक कठोर शिक्षेच्या तरतुदीही निश्चित करण्यात आल्या आहेत. 

टॅग्स :IndiaभारतCrime Newsगुन्हेगारी