शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

12000 जवान, 10000 CCTV आणि AI मॉनिटरिंग...अयोध्येत 'अशी' असेल सुरक्षा व्यवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 5:38 PM

अनेक दशकांच्या प्रदीर्घ प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीराम अयोध्येत विराजमान होत आहेत.

अयोध्या : शेकडो रामभक्तांचे बलिदान आणि अनेक दशकांच्या प्रतिक्षेनंतर प्रभू श्रीराम आपल्या जन्मभूमी अयोध्येत विराजमान होत आहेत. 22 जानेवारी रोजी लाखो लोकांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि रामललाची प्राणप्रतिष्ठा होईल. या भव्यदिव्य सोहळ्यात चोख सुरक्षा व्यवस्था राखणे, हे पोलिस प्रशासनासमोरील सर्वात मोठे आव्हान आहे. अयोध्येतील प्रत्येक कानाकोपऱ्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. रामभक्तांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षा व्यवस्थेत कोणतीही चूक होऊ नये यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स-एआयचाही वापर केला जातोय.

22 जानेवारीला राम मंदिराच्या उद्घाटनापूर्वी अयोध्येत सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. सुरक्षा भंगाच्या संशयास्पद इनपुटनंतर गृह मंत्रालयाने एक अलर्ट देखील जारी केला आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनीअयोध्या आणि आसपास सुमारे 12000 सुरक्षा कर्मचारी तैनात केले आहेत. 10000 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. याशिवाय सुरक्षेचे उल्लंघन आणि संबंधित धोक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही समावेश करण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश पोलिसांचे कायदा आणि सुव्यवस्थेचे महासंचालक प्रशांत कुमार यांनी मीडियाला सांगितले की, "रामललाच्या प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमापूर्वी सायबर धोक्याचा सामना करण्यासाठी गृह मंत्रालयाने एक उच्चस्तरीय सायबर तज्ञ टीम अयोध्येत पाठवली आहे. यासाठी नियंत्रण कक्षही स्थापन करण्यात आले आहेत, जिथे वेगवेगळ्या एजन्सी कथित धोक्यांवर रिअल-टाइम आधारावर लक्ष ठेवत आहेत. याशिवाय शहरातील कानाकोपऱ्यात सुरक्षा यंत्रणा तैनात असतील."

मंदिराभोवती 400 कॅमेरेप्रशांत कुमार यांनी सांगितले की, "अयोध्या शहरात आणि आसपास सुमारे 10,000 सीसीटीव्ही कॅमेरे बसवले आहेत. त्यापैकी सुमारे 400 मंदिराभोवती आणि यलो झोनमध्ये आहेत. यलो झोनमध्ये संशयास्पद चेहरे ओळखण्यासाठी, गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी आणि रेकॉर्डशी जुळवून घेण्यासाठी एआयचा वापर केला जाईल. एआय-आधारित सीसीटीव्ही मॉनिटरिंग सिस्टीम चेहरे ओळखण्यात मदत करेल," असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ram Mandirराम मंदिरAyodhyaअयोध्याPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशHome Ministryगृह मंत्रालय