शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
2
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
3
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
4
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
5
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
6
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
7
भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान
8
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
9
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
10
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
11
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
12
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन
13
Maneka Gandhi : "मला वाटत नाही विकास झालाय..."; राहुल आणि प्रियंका गांधींबद्दल काय म्हणाल्या मनेका गांधी?
14
कोस्टल रोड आणि सी-लिंकला जोडणारा दुसरा महाकाय गर्डर यशस्वीरित्या बसवला! 
15
'फुलेरा'मध्ये निवडणुकीचं वातावरण, कोण होणार नवा सचिव? 'पंचायत 3' चा ट्रेलर बघाच
16
Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"
17
TBO Tek IPO Listing : लिस्ट होताच गुंतवणूकदार मालामाल, ₹१४०० पार पोहोचला 'हा' शेअर; ५५ टक्क्यांचा तगडा नफा
18
सचिन तेंडुलकर यांच्याकडे अंगरक्षक असलेल्या सीआरपीएफ जवानाची गोळी झाडून आत्महत्या
19
Gautam Adani साठी 'अच्छे दिन', शेअर्सवर गुतवणूकदार तुटून पडले; बनला कमाईचा विक्रम
20
Sita Navami 2024: सीता माई जनकाला मिळाली तो दिवस सीता नवमी; या दिवशी उपास का करावा? वाचा!

वर्षभरात ८२२ दंगलींत १११ जण ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2018 4:13 AM

देशामध्ये २०१७ साली ८२२ जातीय दंगलींमध्ये १११ जण ठार व २३८४ जण जखमी झाल्याची माहिती लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. सर्वाधिक दंगली उत्तर प्रदेशात झाल्या आणि मृतांची संख्याही त्याच राज्यात अधिक आहे.

नवी दिल्ली : देशामध्ये २०१७ साली ८२२ जातीय दंगलींमध्ये १११ जण ठार व २३८४ जण जखमी झाल्याची माहिती लोकसभेत केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी दिली. सर्वाधिक दंगली उत्तर प्रदेशात झाल्या आणि मृतांची संख्याही त्याच राज्यात अधिक आहे.अहीर यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले की, गेल्या वर्षी उत्तर प्रदेशमध्ये सर्वात जास्त जातीय दंगली झाल्या. या राज्यात १९५ दंगलींमध्ये ४४ जण ठार व ५४२ जण जखमी झाले. कर्नाटकमध्ये १०० जातीय दंगली झाल्या. त्यात नऊ लोक ठार व २२९ जण जखमी झाले. राजस्थानमध्ये ९१ जातीय दंगलींमध्ये १२ जण ठार व १७५ जण जखमी झाले. बिहारमध्ये गेल्या वर्षी ८५ जातीय दंगलींमध्ये तीन जण ठार व ३२१ जण जखमी झाले. त्याखालोखाल मध्य प्रदेशमध्ये अशा ६० दंगलींमध्ये नऊ जण ठार व १९१ जण जखमी झाले. पश्चिम बंगालमध्ये झालेल्या ५८ जातीय दंगलींमध्ये नऊ जण ठार व २३० जण जखमी झाले. गुजरातमध्ये गेल्या वर्षी ५० जातीय दंगलींमध्ये आठ जण ठार व १२५ जण जखमी झाले.>जातीय दंगलींत झाली वाढहंसराज अहीर म्हणाले की, २०१५ साली ७५१ जातीय दंगलींमध्ये ९७ जण ठार व २२६४ जण जखमी झाले होते.२०१६ साली देशामध्ये ७०३ जातीय दंगलींमध्ये ८६ जण ठार व २३२१ जण जखमी झाले होते.२०१५ व २०१६ या दोन वर्षांपेक्षा २०१७ साली देशात जातीय दंगलींचे प्रमाण वाढलेले आहे.