शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

झारखंडमध्ये भीषण अपघात, 11 जणांचा मृत्यू, 25 जण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2019 12:29 IST

झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी (10 जून) एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देझारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी एका बसचा भीषण अपघात झाला.अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

हजारीबाग - झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत सोमवारी (10 जून) एका बसचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात बसमधील 11 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 25 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मदतकार्य सुरू आहे. बसचे ब्रेक फेल झाल्याने हा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी पहाटे झारखंडच्या हजारीबाग जिल्ह्यातील दानुआ घाटीत एका खासगी बसचा भीषण अपघात झाला. अपघातात 11 जणांचा जागीच मृत्यू झाला. बसचे ब्रेक फेल झाल्याने अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. जखमींवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जखमींपैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

बिहारच्या दिशेने बस जात असताना हा भीषण अपघात झाला. लोखंडी रॉडने भरलेला ट्रेलर आणि बसची जोरदार धडक झाली. ब्रेक फेल झाल्याने चालकाचा बसवरील ताबा सुटला. पहाटे 3.30 वाजता हो अपघात झाला. अपघात झाला त्यावेळी बसमधील सर्व प्रवासी झोपेत होते. हजारीबागचे उपायुक्त रविशंकर शुक्ला यांच्या देखरेखीखाली घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू आहे. सर्व जखमींना चौपारण येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच बसमध्ये अडकलेले मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू आहे. 

 

टॅग्स :AccidentअपघातJharkhandझारखंडDeathमृत्यू